शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

गुजरात महामार्ग खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 01:09 IST

पेठ : पेठ-नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग ८४८ चे सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामात ठेकेदारांकडून योग्य नियोजन न झाल्याने ऐन पावसाळ्यात राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यात गेल्याने प्रवाशांसह वाहनधारकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्दे खोळंबा : नियोजनाअभावी प्रवाशांचे हाल, उमराळेजवळ वाहतूक कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : पेठ-नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग ८४८ चे सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामात ठेकेदारांकडून योग्य नियोजन न झाल्याने ऐन पावसाळ्यात राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यात गेल्याने प्रवाशांसह वाहनधारकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.पेठ व दिंडोरी तालुक्यातील पावसाच्या प्रमाणाचा अंदाज घेऊन महत्त्वाची ती कामे पावसाळ्यापूर्वीच करून घेणे आवश्यक असताना कासवगतीने सुरू असलेले काम पाऊस सुरू झाला तरी पूर्ण होऊ शकले नाही.लहान-मोठे पूल तयार करताना पर्यायी व्यवस्था केली नसल्याने उमराळे गावाजवळ तसेच सावळघाट ते पेठपर्यंत अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असते. पेठ तालुक्यातील तिघांनी गमावला जीवरासेगाव ते आशेवाडी दरम्यानच्या पुलाचे व रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने एकेरी वाहतुकीत खासगी जीप व ट्रकच्या अपघातात पेठ तालुक्यातील तीन जणांना आपला जीव गमवावा लागला. जवळपास तीन वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू असताना कोणत्याही प्रकारचे सूचनाफलक लावलेले दिसून येत नाही. रस्त्याच्या मध्यभागी दगड मातीचे मोठमोठे ढिगारे टाकून रस्ता अडविण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.साइडपट्ट्या कमकुवतरस्त्याच्या दोन्ही बाजूला मातीचे टाकलेले भराव पहिल्याच पावसात वाहून गेल्याने साइडपट्ट्या कमकुवत झाल्या आहेत. वाहनांची गर्दी झाल्यास अवजड वाहने याच साइडपट्ट्यावर रूतून बसतात. त्यामुळे तासन्तास वाहतुकीला अडथळे निर्माण होताना दिसून येत असून, पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत असल्याने मोठ मोठ्या खडु्यातून वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. सावळघाट, कोटंबीघाट, शनिमंदिर, करंजाळी, बोरवठ फाटा आदी ठिकाणी प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, त्यामुळे वाहनांचे नुकसान होत असताना प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.