शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन १५ दिवस कायम ठेवण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 14:36 IST

विंचूर : पालखेड डाव्या कालव्यास पिण्याच्या पाण्यासाठी सुरु असलेले सात दिवसाचे आवर्तन पुढे १५ दिवस कायम सुरु ठेवण्याचे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येथील शिष्टमंडळास दिले.

विंचूर : पालखेड डाव्या कालव्यास पिण्याच्या पाण्यासाठी सुरु असलेले सात दिवसाचे आवर्तन पुढे १५ दिवस कायम सुरु ठेवण्याचे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येथील शिष्टमंडळास दिले. तत्संबंधीचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. महाजन हे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी नाशिक दौºयावर आले असता भा.ज.पा.ओ.बी.सी.मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महाजन यांची भेट घेतली व निवेदन दिले.यावेळी महाजन यांनी शिष्टमंडळास आश्वासन दिले. निवेदनात पावसाळा सुरु होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये निफाड व येवला या दोन्ही तालुक्यांंमध्ये जेमतेम १५५ मि. मि.पावसाची नोंद झाली आहे. पाण्याअभावी खरिपाची पिके करपू लागली आहे. त्याचबरोबर द्राक्षबागा,पेरू, डाळिंंब या फळबागा संकटात आल्या असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. यासर्व पिकांना पाण्याची नितांत गरज आहे.सध्या पालखेड डाव्या कालव्यास पिण्याच्या पाण्याचे सात दिवसाचे आवर्तन सुरु आहे. तेच आवर्तन पुढे १५ दिवस कायम सुरू ठेवावे अशा मागणीचा उल्लेख करण्यात आला आहे.या शिष्टमंडळात प्रदेश उपाध्यक्ष कैलास सोनवणे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव वाघ, निफाड पंंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, निफाड पंचायत समितीचे माजी सभापती विलास गोरे, निलेश सालकाडे, सोपान दरेकर, भारत कानडे,अमोल निकम, अरविंद पाटील, विलास पाटील आदींचा समावेश होता.

टॅग्स :Nashikनाशिक