शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन १५ दिवस कायम ठेवण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 14:36 IST

विंचूर : पालखेड डाव्या कालव्यास पिण्याच्या पाण्यासाठी सुरु असलेले सात दिवसाचे आवर्तन पुढे १५ दिवस कायम सुरु ठेवण्याचे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येथील शिष्टमंडळास दिले.

विंचूर : पालखेड डाव्या कालव्यास पिण्याच्या पाण्यासाठी सुरु असलेले सात दिवसाचे आवर्तन पुढे १५ दिवस कायम सुरु ठेवण्याचे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येथील शिष्टमंडळास दिले. तत्संबंधीचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. महाजन हे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी नाशिक दौºयावर आले असता भा.ज.पा.ओ.बी.सी.मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महाजन यांची भेट घेतली व निवेदन दिले.यावेळी महाजन यांनी शिष्टमंडळास आश्वासन दिले. निवेदनात पावसाळा सुरु होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये निफाड व येवला या दोन्ही तालुक्यांंमध्ये जेमतेम १५५ मि. मि.पावसाची नोंद झाली आहे. पाण्याअभावी खरिपाची पिके करपू लागली आहे. त्याचबरोबर द्राक्षबागा,पेरू, डाळिंंब या फळबागा संकटात आल्या असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. यासर्व पिकांना पाण्याची नितांत गरज आहे.सध्या पालखेड डाव्या कालव्यास पिण्याच्या पाण्याचे सात दिवसाचे आवर्तन सुरु आहे. तेच आवर्तन पुढे १५ दिवस कायम सुरू ठेवावे अशा मागणीचा उल्लेख करण्यात आला आहे.या शिष्टमंडळात प्रदेश उपाध्यक्ष कैलास सोनवणे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव वाघ, निफाड पंंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, निफाड पंचायत समितीचे माजी सभापती विलास गोरे, निलेश सालकाडे, सोपान दरेकर, भारत कानडे,अमोल निकम, अरविंद पाटील, विलास पाटील आदींचा समावेश होता.

टॅग्स :Nashikनाशिक