शहरं
Join us  
Trending Stories
1
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
2
भाजपला कोणत्या राज्यात मिळणार सर्वात मोठं यश? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं, केली मोठी 'भविष्यवाणी'!
3
मुलगी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
4
४ जूननंतर नितीश कुमार घेऊ शकतात मोठा निर्णय; तेजस्वी यादवांच्या नव्या दाव्यामुळे उडाली खळबळ
5
१० दिग्गजांनी जाहीर केले वर्ल्ड कपचे सेमीफायनलिस्ट; टीम इंडियावर सर्वांनी दाखवला विश्वास
6
"आमदार टिंगरे कोणाच्या सांगण्यावरुन पोलीस ठाण्यात गेले? अजित पवारांची नार्को टेस्ट करा"; अंजली दमानियांची मागणी
7
“संजय राऊतांमुळे शरद पवारांनी ठाकरे गटाला आपलेसे केले, आता ही अवस्था झाली”; शिंदे गटाची टीका
8
पूर्व तिमोर देश कोणता? बांगलादेशचे तुकडे करून वेगळा देश निर्माण करण्याचा कट; शेख हसीनांच्या दाव्याने खळबळ
9
IPL गाजवणाऱ्या स्टार भारतीय खेळाडूची हिस्ट्री लीक; स्टार किड्सबद्दल काय केलं सर्च?
10
डॉ. तावरेंच्या शिफारसीबाबत अखेर टिंगरेंचे स्पष्टीकरण; म्हणाले,"मी लोकप्रतिनिधी असल्याने..."
11
“राज्यात भाजपाविरोधी लाटेचे चित्र दिसले, पण सांगलीत तर...”; रोहित पाटील यांचा मोठा दावा
12
लोकसभेची खदखद, विधानसभेची चिंता, महायुतीत ठिणगी पडली? "भुजबळांना आवरा"; निलेश राणे संतापले
13
ENG vs PAK : इंग्लंडच्या धरतीवर बाबरची सटकली; पाकिस्तानी कर्णधार अन् चाहत्यामध्ये जुंपली
14
Arvind Kejriwal : "प्रेमाने मागितलं असतं तर एखाद-दुसरी जागा दिली असती, पण..."; केजरीवालांची अमित शाहांवर टीका
15
जगप्रसिद्ध पण पुण्यात बदनाम झालेल्या पोर्शे कारच्या टीमने डेटा मिळविला; बिल्डर 'बाळा'ची कुंडली मिळणार...
16
"मी काय मूर्ख नाही, भाजपच मोठा भाऊ"; विधानसभेच्या जागांवरुन भुजबळांची नरमाईची भूमिका
17
१५० भारतीयांची फसवणूक, प्रसिद्ध युट्यूबर बॉबी कटारियाला अटक, किती कोटींचा मालक?
18
"आधी मी ५-१० रूपयांसाठी तरसायचो आता...", रिंकूची 'मन की बात', रोहितचे कौतुक
19
IPL 2024 : सोशल मीडियावर कोणाचा कल्ला? धोनी आणि मुंबई इंडियन्सचा जलवा कायम!
20
RBI नंतर LIC भरणार सरकारी खजाना, ₹३,६६२ कोटींचा डिविडेंड देण्याची केली घोषणा

हुतात्मा शेतकऱ्यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 1:15 AM

गेल्यावर्षी राज्यात १ जून पासून झालेल्या शेतकरी संपानंतर मध्य प्रदेशातील मंदसौर येथे शेतकºयांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या शेतकºयांसोबतच आजपर्यंत शेतकºयांच्या विविध प्रश्नांसाठी बलिदान देणाºया शेतकºयांना शुक्रवारी (दि.१) नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीतर्फे हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करण्यात आले.

नाशिक : गेल्यावर्षी राज्यात १ जून पासून झालेल्या शेतकरी संपानंतर मध्य प्रदेशातील मंदसौर येथे शेतकºयांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या शेतकºयांसोबतच आजपर्यंत शेतकºयांच्या विविध प्रश्नांसाठी बलिदान देणाºया शेतकºयांना शुक्रवारी (दि.१) नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीतर्फे हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करण्यात आले.  शेतकºयांना संपूर्ण कर्जमुक्तीचे आश्वासन देऊनही महाराष्ट्र शासनाने ते पाळले नाही. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभर आंदोलन उभे राहिले. यात शहीद झालेल्या शेतक-यांना अभिवादन करतानाच शेतमालाला हमी भाव द्यावा, दुधाला हमीभाव द्यावा, स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संसदेत विधेयक मंजूर करून कायदेशीर मार्गाने शेतकºयांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी लढा देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. एकीकडे संपूर्ण देशभरात राष्ट्रीय किसान महासंघ आणि किसान एकता मंचाने १ जूनपासून देशव्यापी संप पुकारला असला तरी नाशिक जिल्हा शेतकरी सुकाणू समितीने या संपात सहभागी न होता शेतकºयांच्या प्रश्नासाठी बलिदान देणाºया शेतकºयांना श्रद्धांजली वाहून अभिवादन करण्यात करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी हुतात्मा स्मारकात झालेल्या या अभिवादन सभेप्रसंगी समिती सदस्य अमृता पवार, चंद्रकांत बनकर, हंसराज वडघुले, राजू दसले, समाधान भारतीय, प्रभाकर वायचळे, कैलास खांडबहाले, वैभव देशमुख, नाना बच्छाव, नितीन रोटे पाटील, योगेश कापसे, वैशाली डुंबरे, वैशाली पाटील, चारुशीला देशमुख, संपत जाधव, सोमनाथ बोराडे, डॉ. अनुपमा मराठे, अभय सूर्यवंशी आदी पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.  सध्या खरिपाची तयारी सुरू असून, यंदा समाधानकारक पाउस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे चांगले उत्पादन होऊन शेतकºयांना दोन पैसे मिळण्याची अपेक्षा असल्याने शेतकºयांचे नुकसान होऊ नये याकरिता आम्ही संपात सहभागी झालेलो नाही. शेतक-यांच्या प्रश्नासंदर्भात लोकसभेत विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर पूर्वतयारी झाली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या प्रश्नांवर सरकारने विशेष संसदीय अधिवेशन बोलवावे यासाठी आमचा कायद्याने लढा सुरूच राहणार आहे.  -हंसराज वडघुले, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी संघटनाप्रत्येक जण आपापल्या पद्धतीने शेतकºयांच्या प्रश्नांवर लढा देत आहे. गेल्यावेळी आम्ही रस्त्यावर उतरलो होतो. परंतु आता शेतक-यांच्या हमीभावासह इतर मुद्द्यांवर लोकसभेत विधेयक मांडून याविषयावर विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज आहे. त्यामुळे शेतक -यांना त्यांचे हक्क कायदेशीर मार्गाने मिळावेत यासाठी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीचा लढा सुरूच राहील.-अमृता पवार, जिल्हा परिषद सदस्य

टॅग्स :Farmerशेतकरी