शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

हरित क्रांती...

By किरण अग्रवाल | Updated: July 29, 2018 01:16 IST

सरकारी उपक्रमांच्या उद्दिष्टपूर्तीकडे नेहमीच संशयाने बघितले जाते, कारण यंत्रणांच्या आकडेमोडीत फसवा-फसवीच अधिक असल्याचा अनेकदा अनुभव येतो. परंतु ज्या उपक्रमात लोकसहभाग मिळवण्यात यश येते, त्यात तशी वा तेवढी शंका न राहता बऱ्यापैकी उद्दिष्टपूर्ती साधणे शक्य होते. हरित महाराष्ट साकारण्यासंदर्भातही तेच घडून येताना दिसत आहे. यातील आकडेवारीच्या पडताळणीत न पडताही सदर उपक्रमाचे यश दिसून येणारे आहे.

ठळक मुद्देयंत्रणांच्या आकडेमोडीत फसवा-फसवीच अधिक वृक्षलागवड मोहिमेला सर्वत्रच उत्स्फूर्त प्रतिसाद टॅँकरद्वारे पाणी घालून वृक्ष जगविण्याची, वाढविण्याची संबंधितांची धडपड

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यात १३ कोटी वृक्षलागवड करून हरित महाराष्ट साकारण्याचा संकल्प सोडला होता. त्यानुसार राज्यभर मोहीम राबविण्यात आली. विशेष म्हणजे, ही मोहीम केवळ सरकारी पातळीवर किंवा वनविभागापुरती मर्यादित न राहता लोकांचा सहभाग त्यात मिळवण्यात यंत्रणांना यश आले. पर्यावरण रक्षणाबाबतची एकूणच जाणीवजागृती पाहता वृक्षलागवड मोहिमेला सर्वत्रच उत्स्फूर्त प्रतिसाद लाभताना दिसतो आहे. ठिकठिकाणच्या सामाजिक संस्थाच नव्हे तर, शाळा-शाळांमधील विद्यार्थीही या मोहिमेत हिरिरीने सहभागी होत आहेत. त्यामुळेच जुलै महिना संपायला आठवडा शिल्लक असताना राज्यात सुमारे १२ कोटी वृक्षलागवड झाल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे. हा वेग अगर प्रतिसाद पाहता जुलैअखेर उद्दिष्टापेक्षाही अधिकच आकडा गाठला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, यात नांदेड जिल्हा आघाडीवर असून, नाशिक दुसºयास्थानी आहे. नाशिक जिल्ह्यात ६७ लाख १७ हजार रोपे लावली गेल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले. यातील आकडेवारी अचाट असली तरी, शासकीय यंत्रणांखेरीज विविध संस्थांतर्फे तसेच उद्योग समूहांतर्फे यासाठी चालविले जात असलेले प्रयत्न मात्र नक्कीच नजरेत भरणारे आहेत. जनसामान्यांमध्ये यासंदर्भात जागलेली सजगता यातून अधोरेखित होणारी असून, तीच महत्त्वाची तसेच आश्वासक दिलासा देणारी आहे. ‘लोकमत’ माध्यम समूहानेही यात खारीचा वाटा उचलत चालू शैक्षणिक वर्षात शाळांच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील निवडक शाळांमध्ये रोपे वाटप केलीत. विविध मोहिमांतर्गत ही वृक्षलागवड होत आहेच; परंतु काही उद्योग समूहांनीही त्याकरिता पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे केवळ लागवडीपुरता ही मोहीम न उरता पाऊस नसल्यास टॅँकरद्वारे पाणी घालून वृक्ष जगविण्याची, वाढविण्याची संबंधितांची धडपड कौतुकास्पद ठरली आहे. अर्थात, शासकीय जागांवर वृक्षारोपण करताना उद्योगसमूहांना विविध निकषांच्या अडथळ्यांचा सामना करावा लागत असण्याच्या तक्रारी आहेत; पण सामाजिक जबाबदारीचे भान बाळगणारे समूह त्या दिव्यालाही सामोरे जात नेटाने आपले काम करीत आहेत. वनमंत्री मुनगंटीवार यांच्या ध्येयपूर्तीला असे असंख्य हात लागलेले आहेत. यातून नव्याने हरित क्रांती घडवून आणणारी मोठी चळवळच उभी राहिल्याचे समाधान त्यातील आकडेवारीपेक्षा कितीतरी मोठे मानता यावे, असेच आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग