शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

हरित क्रांती...

By किरण अग्रवाल | Updated: July 29, 2018 01:16 IST

सरकारी उपक्रमांच्या उद्दिष्टपूर्तीकडे नेहमीच संशयाने बघितले जाते, कारण यंत्रणांच्या आकडेमोडीत फसवा-फसवीच अधिक असल्याचा अनेकदा अनुभव येतो. परंतु ज्या उपक्रमात लोकसहभाग मिळवण्यात यश येते, त्यात तशी वा तेवढी शंका न राहता बऱ्यापैकी उद्दिष्टपूर्ती साधणे शक्य होते. हरित महाराष्ट साकारण्यासंदर्भातही तेच घडून येताना दिसत आहे. यातील आकडेवारीच्या पडताळणीत न पडताही सदर उपक्रमाचे यश दिसून येणारे आहे.

ठळक मुद्देयंत्रणांच्या आकडेमोडीत फसवा-फसवीच अधिक वृक्षलागवड मोहिमेला सर्वत्रच उत्स्फूर्त प्रतिसाद टॅँकरद्वारे पाणी घालून वृक्ष जगविण्याची, वाढविण्याची संबंधितांची धडपड

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यात १३ कोटी वृक्षलागवड करून हरित महाराष्ट साकारण्याचा संकल्प सोडला होता. त्यानुसार राज्यभर मोहीम राबविण्यात आली. विशेष म्हणजे, ही मोहीम केवळ सरकारी पातळीवर किंवा वनविभागापुरती मर्यादित न राहता लोकांचा सहभाग त्यात मिळवण्यात यंत्रणांना यश आले. पर्यावरण रक्षणाबाबतची एकूणच जाणीवजागृती पाहता वृक्षलागवड मोहिमेला सर्वत्रच उत्स्फूर्त प्रतिसाद लाभताना दिसतो आहे. ठिकठिकाणच्या सामाजिक संस्थाच नव्हे तर, शाळा-शाळांमधील विद्यार्थीही या मोहिमेत हिरिरीने सहभागी होत आहेत. त्यामुळेच जुलै महिना संपायला आठवडा शिल्लक असताना राज्यात सुमारे १२ कोटी वृक्षलागवड झाल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे. हा वेग अगर प्रतिसाद पाहता जुलैअखेर उद्दिष्टापेक्षाही अधिकच आकडा गाठला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, यात नांदेड जिल्हा आघाडीवर असून, नाशिक दुसºयास्थानी आहे. नाशिक जिल्ह्यात ६७ लाख १७ हजार रोपे लावली गेल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले. यातील आकडेवारी अचाट असली तरी, शासकीय यंत्रणांखेरीज विविध संस्थांतर्फे तसेच उद्योग समूहांतर्फे यासाठी चालविले जात असलेले प्रयत्न मात्र नक्कीच नजरेत भरणारे आहेत. जनसामान्यांमध्ये यासंदर्भात जागलेली सजगता यातून अधोरेखित होणारी असून, तीच महत्त्वाची तसेच आश्वासक दिलासा देणारी आहे. ‘लोकमत’ माध्यम समूहानेही यात खारीचा वाटा उचलत चालू शैक्षणिक वर्षात शाळांच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील निवडक शाळांमध्ये रोपे वाटप केलीत. विविध मोहिमांतर्गत ही वृक्षलागवड होत आहेच; परंतु काही उद्योग समूहांनीही त्याकरिता पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे केवळ लागवडीपुरता ही मोहीम न उरता पाऊस नसल्यास टॅँकरद्वारे पाणी घालून वृक्ष जगविण्याची, वाढविण्याची संबंधितांची धडपड कौतुकास्पद ठरली आहे. अर्थात, शासकीय जागांवर वृक्षारोपण करताना उद्योगसमूहांना विविध निकषांच्या अडथळ्यांचा सामना करावा लागत असण्याच्या तक्रारी आहेत; पण सामाजिक जबाबदारीचे भान बाळगणारे समूह त्या दिव्यालाही सामोरे जात नेटाने आपले काम करीत आहेत. वनमंत्री मुनगंटीवार यांच्या ध्येयपूर्तीला असे असंख्य हात लागलेले आहेत. यातून नव्याने हरित क्रांती घडवून आणणारी मोठी चळवळच उभी राहिल्याचे समाधान त्यातील आकडेवारीपेक्षा कितीतरी मोठे मानता यावे, असेच आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग