शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
2
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
3
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
4
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
5
"तैवानला चीनशी पुन्हा जोडणे हे आमचे ऐतिहासिक ध्येय...", चीनने बेटाच्या सीमेवर रॉकेटने केला बॉम्बहल्ला
6
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
7
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
8
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
9
VHT 2025 : सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
10
‘अगं, भाजीला काय आणू’... उत्तर येण्यापूर्वीच किंकाळी कानी पडली; पत्नीशी बोलता बोलता प्रशांत शिंदेने सोडला प्राण
11
मुंबईवरून निघालेल्या खासगी बसचा सोलापूर-पुणे महामार्गावर अपघात; वाहनांच्या एक किलोमीटरपर्यंत रांगा
12
'जबाबदारीने काम करायचे नसेल तर घरी बसा'; अजित पवारांचा नेत्यांना इशारा
13
घरगड्याच्या उमेदवारीसाठी सुरेश वरपूडकरांनी युती तोडण्याचे पाप केले; शिंदेसेनेचा आरोप
14
शिल्पा शिंदेनंतर 'अनिता भाभी'ही मालिकेत परतणार? 'धुरंधर' फेम सौम्या टंडन म्हणाली...
15
धातू बाजारात 'भूकंप'! चांदी १९ हजार रुपयांनी कोसळली, तर सोने १ हजाराने स्वस्त; किंमत अजून कमी होणार?
16
अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार
17
Navi Mumbai: इन्स्टाग्रामवरुन जडले प्रेम, 'तिने' भेटायला बोलावलं; १५ वर्षाचा मुलगा कॅबमधून उतरला अन् घडला थरार
18
२०२६ला गणपती कधी? यंदा १० नाही १२ दिवसांचा गणेशोत्सव; पाहा, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी तारीख
19
तो म्हणतो, हॅण्डब्रेक काढताच बस उडाली; बसचालक रमेश सावंतला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक; ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
20
जगायचं कसं? नळाला येत होतं गटाराचं पाणी; इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव, ३ अधिकारी तडकाफडकी निलंबित
Daily Top 2Weekly Top 5

हरित क्रांती...

By किरण अग्रवाल | Updated: July 29, 2018 01:16 IST

सरकारी उपक्रमांच्या उद्दिष्टपूर्तीकडे नेहमीच संशयाने बघितले जाते, कारण यंत्रणांच्या आकडेमोडीत फसवा-फसवीच अधिक असल्याचा अनेकदा अनुभव येतो. परंतु ज्या उपक्रमात लोकसहभाग मिळवण्यात यश येते, त्यात तशी वा तेवढी शंका न राहता बऱ्यापैकी उद्दिष्टपूर्ती साधणे शक्य होते. हरित महाराष्ट साकारण्यासंदर्भातही तेच घडून येताना दिसत आहे. यातील आकडेवारीच्या पडताळणीत न पडताही सदर उपक्रमाचे यश दिसून येणारे आहे.

ठळक मुद्देयंत्रणांच्या आकडेमोडीत फसवा-फसवीच अधिक वृक्षलागवड मोहिमेला सर्वत्रच उत्स्फूर्त प्रतिसाद टॅँकरद्वारे पाणी घालून वृक्ष जगविण्याची, वाढविण्याची संबंधितांची धडपड

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यात १३ कोटी वृक्षलागवड करून हरित महाराष्ट साकारण्याचा संकल्प सोडला होता. त्यानुसार राज्यभर मोहीम राबविण्यात आली. विशेष म्हणजे, ही मोहीम केवळ सरकारी पातळीवर किंवा वनविभागापुरती मर्यादित न राहता लोकांचा सहभाग त्यात मिळवण्यात यंत्रणांना यश आले. पर्यावरण रक्षणाबाबतची एकूणच जाणीवजागृती पाहता वृक्षलागवड मोहिमेला सर्वत्रच उत्स्फूर्त प्रतिसाद लाभताना दिसतो आहे. ठिकठिकाणच्या सामाजिक संस्थाच नव्हे तर, शाळा-शाळांमधील विद्यार्थीही या मोहिमेत हिरिरीने सहभागी होत आहेत. त्यामुळेच जुलै महिना संपायला आठवडा शिल्लक असताना राज्यात सुमारे १२ कोटी वृक्षलागवड झाल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे. हा वेग अगर प्रतिसाद पाहता जुलैअखेर उद्दिष्टापेक्षाही अधिकच आकडा गाठला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, यात नांदेड जिल्हा आघाडीवर असून, नाशिक दुसºयास्थानी आहे. नाशिक जिल्ह्यात ६७ लाख १७ हजार रोपे लावली गेल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले. यातील आकडेवारी अचाट असली तरी, शासकीय यंत्रणांखेरीज विविध संस्थांतर्फे तसेच उद्योग समूहांतर्फे यासाठी चालविले जात असलेले प्रयत्न मात्र नक्कीच नजरेत भरणारे आहेत. जनसामान्यांमध्ये यासंदर्भात जागलेली सजगता यातून अधोरेखित होणारी असून, तीच महत्त्वाची तसेच आश्वासक दिलासा देणारी आहे. ‘लोकमत’ माध्यम समूहानेही यात खारीचा वाटा उचलत चालू शैक्षणिक वर्षात शाळांच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील निवडक शाळांमध्ये रोपे वाटप केलीत. विविध मोहिमांतर्गत ही वृक्षलागवड होत आहेच; परंतु काही उद्योग समूहांनीही त्याकरिता पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे केवळ लागवडीपुरता ही मोहीम न उरता पाऊस नसल्यास टॅँकरद्वारे पाणी घालून वृक्ष जगविण्याची, वाढविण्याची संबंधितांची धडपड कौतुकास्पद ठरली आहे. अर्थात, शासकीय जागांवर वृक्षारोपण करताना उद्योगसमूहांना विविध निकषांच्या अडथळ्यांचा सामना करावा लागत असण्याच्या तक्रारी आहेत; पण सामाजिक जबाबदारीचे भान बाळगणारे समूह त्या दिव्यालाही सामोरे जात नेटाने आपले काम करीत आहेत. वनमंत्री मुनगंटीवार यांच्या ध्येयपूर्तीला असे असंख्य हात लागलेले आहेत. यातून नव्याने हरित क्रांती घडवून आणणारी मोठी चळवळच उभी राहिल्याचे समाधान त्यातील आकडेवारीपेक्षा कितीतरी मोठे मानता यावे, असेच आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग