शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

हिरव्या चाऱ्याचे भाव भिडले गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 18:11 IST

मे महिन्याला सुरुवात होऊन आठ दिवस झाले असून, आता शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबर चाराटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. आता बºयाच शेतकºयांकडे अल्प चारा असल्यामुळे चारा संपला आहे. विकतचा चारा विकत घेऊन जनावरे सांभाळणे मुश्कील झाले आहे. तेव्हा जनावरांसाठी चारा उपलब्ध होतो की नाही यांची चिंता पडली आहे.

ठळक मुद्देविकतच्या चाºयावर जनावरांना पोसणे अवघड

खामखेडा : मे महिन्याला सुरुवात होऊन आठ दिवस झाले असून, आता शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबर चाराटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. आता बºयाच शेतकºयांकडे अल्प चारा असल्यामुळे चारा संपला आहे. विकतचा चारा विकत घेऊन जनावरे सांभाळणे मुश्कील झाले आहे. तेव्हा जनावरांसाठी चारा उपलब्ध होतो की नाही यांची चिंता पडली आहे.गेल्या वर्षी खामखेडा परिसरात सुरुवातीला जेमतेम पावसावर रब्बी पिकांची पेरणी केली होती. नंतर पावसाने दीड महिने दांडी मारल्याने पाहिजे त्याप्रमाणात पिके आली नाही. ऐन कापणीच्या वेळेस पावसाने धुमाकूळ घातल्याने मका, बाजरीचा कडबा खराब झाला होता. त्यामुळे चाºयाचे प्रमाण कमी झाले. शेतकºयांकडे साधारण मे महिन्यापर्यंत जनावारांना पुरेल एवढा चारा असतो. मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडल्यानंतर साधारण पंधरा दिवसानंतर सर्वत्र हिरवा चारा शिवारात उपलब्ध होत असतो.परंतु चालू वर्षी अल्प पाऊस झाल्याने शेतकºयांकडील चारा एप्रिल महिन्यात संपला आहे. त्यामुळे जनावरांवर उपासमाराची वेळ आली आहे. तसेच दरवर्षी परतीचा पाऊस पडत असे. त्यामुळे विहिरीचे पाणी एप्रिल महिन्यापर्यंत ठिकून राहत असे. पाण्यामुळे ज्वारीचा चारा मे महिन्यापर्यंत जनावरांसाठी पुरत असे. या पाण्यावर शेतकरी जनावरांसाठी हिरव्या चाºयासाठी भुईमूग, ज्वारी, मका यांची पेरणी करीत असे. आणि हा चारा नेमका यावेळेस या वेळेत जनावरांना खाण्यासाठी उपलब्ध होत असे. मात्र चालू वर्षी परतीचा पाऊस न पडल्यामुळे विहिरींना पाणी उतरले नाही. त्यामुळे काही अल्पशा शेतकºयांनी ज्वारीच्या कडब्याची पेरणी केली. त्या हिरव्या कडब्याचे चाºयाचे भाव गगनाला भिडले आहे.साधारण एक ओळीचे भाव चार-पाच हजार रुपये झाला आहे. या एका ओळीत एक ट्रक्टर ट्रॉंलीभर चारा येतो. एका वीस गुंंंठे तुकड्यात साधारण पाच ओळी असता आणि या एका एका तुकड्याची किंमत वीस हजार रु पयापर्यंत आहे. काही तुरळक शेतकºयांकडे उसाचा चारा आहे. या उसाच्या एका सरीचा भाव (याला ग्रामीण भागात बेले म्हणतात.) हजार ते पंधराशे रुपये झाला आहे.उसाच्या एका सरित साधारण एक बैलगाडी भर चार येतो. त्यामुळे सततच्या पडणाºया दुष्काळामुळे शेतकºयाला आपले महगडे पशुधन जगविणे मुश्कील झाले आहे. हिरव्या चाºयाचा भाव गगनाला भिडले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती