शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

हिरव्या चाऱ्याचे भाव भिडले गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 18:11 IST

मे महिन्याला सुरुवात होऊन आठ दिवस झाले असून, आता शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबर चाराटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. आता बºयाच शेतकºयांकडे अल्प चारा असल्यामुळे चारा संपला आहे. विकतचा चारा विकत घेऊन जनावरे सांभाळणे मुश्कील झाले आहे. तेव्हा जनावरांसाठी चारा उपलब्ध होतो की नाही यांची चिंता पडली आहे.

ठळक मुद्देविकतच्या चाºयावर जनावरांना पोसणे अवघड

खामखेडा : मे महिन्याला सुरुवात होऊन आठ दिवस झाले असून, आता शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबर चाराटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. आता बºयाच शेतकºयांकडे अल्प चारा असल्यामुळे चारा संपला आहे. विकतचा चारा विकत घेऊन जनावरे सांभाळणे मुश्कील झाले आहे. तेव्हा जनावरांसाठी चारा उपलब्ध होतो की नाही यांची चिंता पडली आहे.गेल्या वर्षी खामखेडा परिसरात सुरुवातीला जेमतेम पावसावर रब्बी पिकांची पेरणी केली होती. नंतर पावसाने दीड महिने दांडी मारल्याने पाहिजे त्याप्रमाणात पिके आली नाही. ऐन कापणीच्या वेळेस पावसाने धुमाकूळ घातल्याने मका, बाजरीचा कडबा खराब झाला होता. त्यामुळे चाºयाचे प्रमाण कमी झाले. शेतकºयांकडे साधारण मे महिन्यापर्यंत जनावारांना पुरेल एवढा चारा असतो. मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडल्यानंतर साधारण पंधरा दिवसानंतर सर्वत्र हिरवा चारा शिवारात उपलब्ध होत असतो.परंतु चालू वर्षी अल्प पाऊस झाल्याने शेतकºयांकडील चारा एप्रिल महिन्यात संपला आहे. त्यामुळे जनावरांवर उपासमाराची वेळ आली आहे. तसेच दरवर्षी परतीचा पाऊस पडत असे. त्यामुळे विहिरीचे पाणी एप्रिल महिन्यापर्यंत ठिकून राहत असे. पाण्यामुळे ज्वारीचा चारा मे महिन्यापर्यंत जनावरांसाठी पुरत असे. या पाण्यावर शेतकरी जनावरांसाठी हिरव्या चाºयासाठी भुईमूग, ज्वारी, मका यांची पेरणी करीत असे. आणि हा चारा नेमका यावेळेस या वेळेत जनावरांना खाण्यासाठी उपलब्ध होत असे. मात्र चालू वर्षी परतीचा पाऊस न पडल्यामुळे विहिरींना पाणी उतरले नाही. त्यामुळे काही अल्पशा शेतकºयांनी ज्वारीच्या कडब्याची पेरणी केली. त्या हिरव्या कडब्याचे चाºयाचे भाव गगनाला भिडले आहे.साधारण एक ओळीचे भाव चार-पाच हजार रुपये झाला आहे. या एका ओळीत एक ट्रक्टर ट्रॉंलीभर चारा येतो. एका वीस गुंंंठे तुकड्यात साधारण पाच ओळी असता आणि या एका एका तुकड्याची किंमत वीस हजार रु पयापर्यंत आहे. काही तुरळक शेतकºयांकडे उसाचा चारा आहे. या उसाच्या एका सरीचा भाव (याला ग्रामीण भागात बेले म्हणतात.) हजार ते पंधराशे रुपये झाला आहे.उसाच्या एका सरित साधारण एक बैलगाडी भर चार येतो. त्यामुळे सततच्या पडणाºया दुष्काळामुळे शेतकºयाला आपले महगडे पशुधन जगविणे मुश्कील झाले आहे. हिरव्या चाºयाचा भाव गगनाला भिडले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती