शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भव्य कार्यासाठी मन:शांती आवश्यक :  श्रीश्री रविशंकरजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 00:11 IST

ज्यांचे मन शांत आणि डोके शीतल असते, त्याच व्यक्ती जगात काही भव्य-दिव्य कार्य उभे करू शकतात. भडक डोक्याची माणसे अधिक विचार करू शकत नाहीत. त्याउलट शांत चित्त असणारी माणसे कोणत्याही प्रसंगात अधिक विचार करून मार्ग शोधतात. त्यामुळे मन शांत ठेवून उत्साहाने कार्य करा.

नाशिक : ज्यांचे मन शांत आणि डोके शीतल असते, त्याच व्यक्ती जगात काही भव्य-दिव्य कार्य उभे करू शकतात. भडक डोक्याची माणसे अधिक विचार करू शकत नाहीत. त्याउलट शांत चित्त असणारी माणसे कोणत्याही प्रसंगात अधिक विचार करून मार्ग शोधतात. त्यामुळे मन शांत ठेवून उत्साहाने कार्य करा. अशाप्रकारे मन शांत ठेवणे ध्यानाद्वारे शक्य असल्याचे प्रतिपादन आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते आध्यात्मिक गुरू श्रीश्री रविशंकरजी यांनी केले.आर्ट आॅफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने तपोवनात बुधवारी अमृतवर्षा या प्रवचनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीश्री यांनी यावेळी उपस्थित हजारो अनुयायांना मार्गदर्शन केले. श्रीश्री यांनी आपणा सगळ्यांना संपूर्ण देशात आध्यात्माची एक लाट निर्माण करायची असल्याचे सांगितले. अशी आध्यात्मिक लाट निर्माण झाल्यास जनतेमधील अनिष्ट विचार, वाईट सवयी आपसूकपणे कमी होतील, असेही त्यांनी नमूद केले. स्वच्छ, सुंदर, सुशिक्षित समाज आपल्यालाच घडवायचा आहे. आपल्या आसपास सातत्याने चांगल्या-वाईट गोष्टी घडत असतात. त्या प्रत्येक बाबीवर आपल्याला काही करता येईलच असे नाही. सारंच काही ठीक करता येईल, असे नाही. अशावेळी शक्य तेवढे चांगले करून अन्य सर्व बाबी ईश्वरावर सोडून द्या, असेही श्रीश्री यांनी नमूद केले. ध्यानामुळे अनेक गोष्टी साध्य होत असल्याने दररोज काही मिनिटे तरी ध्यानधारणा करणे आवश्यक असल्याचे सांगितले. कोणत्याही धार्मिक, सांस्कृतिक कार्यात कर्मकांड नव्हे तर ध्यान आणि मंत्रोच्चार महत्त्वाचे असतात, असेही त्यांनी नमूद केले. प्रारंभी विक्रम हाजरा यांनी गोविंद कृष्ण हरी ओम, जीवन खेल है सगुण ब्रह्म का ही भक्तिगीते सादर केली...तर जीवनात आनंदवर्षा !जीवनात गुरूंचे सान्निध्य लाभले तर चेहऱ्यावरील हास्य कमी होत नाही. अनेक अनावश्यक बाबी आपला मेंदू विसरून जातो. त्याप्रमाणेच जीवनात घडलेल्या सर्व अनिष्ट बाबी, राग, लोभ झटकून टाका. त्यांना आपल्या आतमध्ये ठाण मांडू देऊ नका. तुम्हाला अध्यात्मातून मिळालेला आनंद, जीवनातून मिळालेले ज्ञान इतरांना वाटा. जीवन हे एखाद्या स्वप्नासारखे वाटले तरच जीवनात आनंद वर्षा होत राहते, असेही श्रीश्री रवीशंकरजी यांनी अनुयायांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक