शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

भव्य कार्यासाठी मन:शांती आवश्यक :  श्रीश्री रविशंकरजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 00:11 IST

ज्यांचे मन शांत आणि डोके शीतल असते, त्याच व्यक्ती जगात काही भव्य-दिव्य कार्य उभे करू शकतात. भडक डोक्याची माणसे अधिक विचार करू शकत नाहीत. त्याउलट शांत चित्त असणारी माणसे कोणत्याही प्रसंगात अधिक विचार करून मार्ग शोधतात. त्यामुळे मन शांत ठेवून उत्साहाने कार्य करा.

नाशिक : ज्यांचे मन शांत आणि डोके शीतल असते, त्याच व्यक्ती जगात काही भव्य-दिव्य कार्य उभे करू शकतात. भडक डोक्याची माणसे अधिक विचार करू शकत नाहीत. त्याउलट शांत चित्त असणारी माणसे कोणत्याही प्रसंगात अधिक विचार करून मार्ग शोधतात. त्यामुळे मन शांत ठेवून उत्साहाने कार्य करा. अशाप्रकारे मन शांत ठेवणे ध्यानाद्वारे शक्य असल्याचे प्रतिपादन आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते आध्यात्मिक गुरू श्रीश्री रविशंकरजी यांनी केले.आर्ट आॅफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने तपोवनात बुधवारी अमृतवर्षा या प्रवचनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीश्री यांनी यावेळी उपस्थित हजारो अनुयायांना मार्गदर्शन केले. श्रीश्री यांनी आपणा सगळ्यांना संपूर्ण देशात आध्यात्माची एक लाट निर्माण करायची असल्याचे सांगितले. अशी आध्यात्मिक लाट निर्माण झाल्यास जनतेमधील अनिष्ट विचार, वाईट सवयी आपसूकपणे कमी होतील, असेही त्यांनी नमूद केले. स्वच्छ, सुंदर, सुशिक्षित समाज आपल्यालाच घडवायचा आहे. आपल्या आसपास सातत्याने चांगल्या-वाईट गोष्टी घडत असतात. त्या प्रत्येक बाबीवर आपल्याला काही करता येईलच असे नाही. सारंच काही ठीक करता येईल, असे नाही. अशावेळी शक्य तेवढे चांगले करून अन्य सर्व बाबी ईश्वरावर सोडून द्या, असेही श्रीश्री यांनी नमूद केले. ध्यानामुळे अनेक गोष्टी साध्य होत असल्याने दररोज काही मिनिटे तरी ध्यानधारणा करणे आवश्यक असल्याचे सांगितले. कोणत्याही धार्मिक, सांस्कृतिक कार्यात कर्मकांड नव्हे तर ध्यान आणि मंत्रोच्चार महत्त्वाचे असतात, असेही त्यांनी नमूद केले. प्रारंभी विक्रम हाजरा यांनी गोविंद कृष्ण हरी ओम, जीवन खेल है सगुण ब्रह्म का ही भक्तिगीते सादर केली...तर जीवनात आनंदवर्षा !जीवनात गुरूंचे सान्निध्य लाभले तर चेहऱ्यावरील हास्य कमी होत नाही. अनेक अनावश्यक बाबी आपला मेंदू विसरून जातो. त्याप्रमाणेच जीवनात घडलेल्या सर्व अनिष्ट बाबी, राग, लोभ झटकून टाका. त्यांना आपल्या आतमध्ये ठाण मांडू देऊ नका. तुम्हाला अध्यात्मातून मिळालेला आनंद, जीवनातून मिळालेले ज्ञान इतरांना वाटा. जीवन हे एखाद्या स्वप्नासारखे वाटले तरच जीवनात आनंद वर्षा होत राहते, असेही श्रीश्री रवीशंकरजी यांनी अनुयायांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक