शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

जमीन खचल्याने पुलाला मोठा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 00:58 IST

एकलहरे: तालुक्याच्या पूर्व भागात सातत्याने कोसळलेल्या पावसामुळे काही ठिकाणी जमिन खचून, तर काही ठिकाणी पिकांची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जाखोरीच्या पुलाजवळ जमिन खचल्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला असून, सरकारी यंत्रणेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने मोठा अनर्थ घडण्याची शक्यता ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

ठळक मुद्देजाखोरीच्या शेतकऱ्याचे नुकसान: भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कएकलहरे: तालुक्याच्या पूर्व भागात सातत्याने कोसळलेल्या पावसामुळे काही ठिकाणी जमिन खचून, तर काही ठिकाणी पिकांची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जाखोरीच्या पुलाजवळ जमिन खचल्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला असून, सरकारी यंत्रणेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने मोठा अनर्थ घडण्याची शक्यता ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.दारणा नदिवर जाखोरी गावाजवळ पुल बांधलेला आहे. हा रस्ता शिंदे येथील पुणा हायवेपासून ओझरच्या दहावा मैलाजवळ आग्रा हायवेला मिळतो. जाखोरी गावालगत असलेल्या शेतालगत रस्ता होण्यापूर्वी मोठा नाला होता. त्यामुळे उताराने पाणी वाहत येऊन या नाल्यामधून नदीला मिळत असे. मात्र या हायवेचे काम सुरु झाले. रस्ता तयार झाला. त्यामुळे मुळ नाला बुजला गेला.पर्यायाने पावसाळ्यात शेतांमधून उताºयाने वाहून येणारे पाणी पुला लगतच्या विठोबा महिपती जगळे यांच्या गट नंबर 536 मधून वाहत असल्याने दरवर्षी पिकांचे मोठे नुकसान होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे सुमारे आठ ते दहा किलोमिटर परिसरातील उतारावरचे पाणी वाहत आल्याने दारणा नदीवरील पुलालगत असलेल्या जगळे यांच्या शेतातील माती खचून वाहून जाऊन सुमारे दोन गुंठे जागेत मोठे भगदाड पडले.त्यामुळे शेजारील पुलालाही धोका निर्माण झाला आहे. या भगदाडापासून दहा- पंधरा फुटाच्या अंतरावर महापारेषण कंपनीचा मोठा टॉवर आहे. जमिन भुसभुसित असल्याने अजुन एखादा मोठा पाऊस पडला तर जमिन खचत जाऊन या टॉवरलाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे एकिकडे पुल आणि दुसरीकडे टॉवर अशा दुहेरी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.या रस्त्याचे काम सुरु असतांना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाºयांनी नाला पूर्ववत करुन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र वारंवार पाठपुरावा करुनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.वरच्या बाजुला जाखोरी ब्राम्हणवाडे रस्त्याच्या पलीकडून उतावर असलेल्या संतोष ताजणे, तुकाराम कटाळे, किशोर कटाळे, नारायण ताजणे, शरद ताजणे, सैय्यद, शेलार, जगळे, पगारे, बागुल यांच्या शेतातून पावसाचे पाणी वाहत येऊन विठोबा महिपत जगळे यांच्या शेतात साचल्याने तेथील माती झिजून नदीत प्रवाहित झाल्याने मोठे भगदाड पडले आहे.या भगदाडात सुमारे 40-45 ट्रक माती भरावी लागेल.या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने नाली तयार करुन रस्त्याला कठडे तयार करावेत अशी मागणी स्वप्नील जगळे यांनी केली आहे.दारणेच्या पुलालगत आमची शेती आहे. पूर्वी येथे मोठा नाला असल्याने पाणी वाहून जात होतो. मात्र रस्त्याच्या कामामुळे नाला बुजला गेला.त्यामुळे दरवर्षी पावसाचे पाणी आमच्या शेतात शिरुन नुकसान होते.वारंवार पाठपुरावा करुनही नाला पूर्ववत केला जात नाही. पावसाने गट नंबर 536 मध्ये मोठे भगदाड पडले. बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई मिळावी.-परशराम विठोबा जगळे, जाखोरी.

 

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागroad safetyरस्ते सुरक्षा