शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

जमीन खचल्याने पुलाला मोठा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 00:58 IST

एकलहरे: तालुक्याच्या पूर्व भागात सातत्याने कोसळलेल्या पावसामुळे काही ठिकाणी जमिन खचून, तर काही ठिकाणी पिकांची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जाखोरीच्या पुलाजवळ जमिन खचल्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला असून, सरकारी यंत्रणेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने मोठा अनर्थ घडण्याची शक्यता ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

ठळक मुद्देजाखोरीच्या शेतकऱ्याचे नुकसान: भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कएकलहरे: तालुक्याच्या पूर्व भागात सातत्याने कोसळलेल्या पावसामुळे काही ठिकाणी जमिन खचून, तर काही ठिकाणी पिकांची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जाखोरीच्या पुलाजवळ जमिन खचल्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला असून, सरकारी यंत्रणेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने मोठा अनर्थ घडण्याची शक्यता ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.दारणा नदिवर जाखोरी गावाजवळ पुल बांधलेला आहे. हा रस्ता शिंदे येथील पुणा हायवेपासून ओझरच्या दहावा मैलाजवळ आग्रा हायवेला मिळतो. जाखोरी गावालगत असलेल्या शेतालगत रस्ता होण्यापूर्वी मोठा नाला होता. त्यामुळे उताराने पाणी वाहत येऊन या नाल्यामधून नदीला मिळत असे. मात्र या हायवेचे काम सुरु झाले. रस्ता तयार झाला. त्यामुळे मुळ नाला बुजला गेला.पर्यायाने पावसाळ्यात शेतांमधून उताºयाने वाहून येणारे पाणी पुला लगतच्या विठोबा महिपती जगळे यांच्या गट नंबर 536 मधून वाहत असल्याने दरवर्षी पिकांचे मोठे नुकसान होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे सुमारे आठ ते दहा किलोमिटर परिसरातील उतारावरचे पाणी वाहत आल्याने दारणा नदीवरील पुलालगत असलेल्या जगळे यांच्या शेतातील माती खचून वाहून जाऊन सुमारे दोन गुंठे जागेत मोठे भगदाड पडले.त्यामुळे शेजारील पुलालाही धोका निर्माण झाला आहे. या भगदाडापासून दहा- पंधरा फुटाच्या अंतरावर महापारेषण कंपनीचा मोठा टॉवर आहे. जमिन भुसभुसित असल्याने अजुन एखादा मोठा पाऊस पडला तर जमिन खचत जाऊन या टॉवरलाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे एकिकडे पुल आणि दुसरीकडे टॉवर अशा दुहेरी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.या रस्त्याचे काम सुरु असतांना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाºयांनी नाला पूर्ववत करुन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र वारंवार पाठपुरावा करुनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.वरच्या बाजुला जाखोरी ब्राम्हणवाडे रस्त्याच्या पलीकडून उतावर असलेल्या संतोष ताजणे, तुकाराम कटाळे, किशोर कटाळे, नारायण ताजणे, शरद ताजणे, सैय्यद, शेलार, जगळे, पगारे, बागुल यांच्या शेतातून पावसाचे पाणी वाहत येऊन विठोबा महिपत जगळे यांच्या शेतात साचल्याने तेथील माती झिजून नदीत प्रवाहित झाल्याने मोठे भगदाड पडले आहे.या भगदाडात सुमारे 40-45 ट्रक माती भरावी लागेल.या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने नाली तयार करुन रस्त्याला कठडे तयार करावेत अशी मागणी स्वप्नील जगळे यांनी केली आहे.दारणेच्या पुलालगत आमची शेती आहे. पूर्वी येथे मोठा नाला असल्याने पाणी वाहून जात होतो. मात्र रस्त्याच्या कामामुळे नाला बुजला गेला.त्यामुळे दरवर्षी पावसाचे पाणी आमच्या शेतात शिरुन नुकसान होते.वारंवार पाठपुरावा करुनही नाला पूर्ववत केला जात नाही. पावसाने गट नंबर 536 मध्ये मोठे भगदाड पडले. बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई मिळावी.-परशराम विठोबा जगळे, जाखोरी.

 

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागroad safetyरस्ते सुरक्षा