शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
2
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
3
बँक, आधार ते GST पर्यंत..., आजपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; तुमच्या खिशावर अन् जीवनावर थेट परिणाम होणार!
4
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
5
LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?
6
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
7
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
8
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
9
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
10
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
11
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
12
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
13
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
14
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
15
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
16
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
17
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
18
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
19
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
20
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम

जमीन खचल्याने पुलाला मोठा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 00:58 IST

एकलहरे: तालुक्याच्या पूर्व भागात सातत्याने कोसळलेल्या पावसामुळे काही ठिकाणी जमिन खचून, तर काही ठिकाणी पिकांची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जाखोरीच्या पुलाजवळ जमिन खचल्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला असून, सरकारी यंत्रणेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने मोठा अनर्थ घडण्याची शक्यता ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

ठळक मुद्देजाखोरीच्या शेतकऱ्याचे नुकसान: भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कएकलहरे: तालुक्याच्या पूर्व भागात सातत्याने कोसळलेल्या पावसामुळे काही ठिकाणी जमिन खचून, तर काही ठिकाणी पिकांची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जाखोरीच्या पुलाजवळ जमिन खचल्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला असून, सरकारी यंत्रणेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने मोठा अनर्थ घडण्याची शक्यता ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.दारणा नदिवर जाखोरी गावाजवळ पुल बांधलेला आहे. हा रस्ता शिंदे येथील पुणा हायवेपासून ओझरच्या दहावा मैलाजवळ आग्रा हायवेला मिळतो. जाखोरी गावालगत असलेल्या शेतालगत रस्ता होण्यापूर्वी मोठा नाला होता. त्यामुळे उताराने पाणी वाहत येऊन या नाल्यामधून नदीला मिळत असे. मात्र या हायवेचे काम सुरु झाले. रस्ता तयार झाला. त्यामुळे मुळ नाला बुजला गेला.पर्यायाने पावसाळ्यात शेतांमधून उताºयाने वाहून येणारे पाणी पुला लगतच्या विठोबा महिपती जगळे यांच्या गट नंबर 536 मधून वाहत असल्याने दरवर्षी पिकांचे मोठे नुकसान होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे सुमारे आठ ते दहा किलोमिटर परिसरातील उतारावरचे पाणी वाहत आल्याने दारणा नदीवरील पुलालगत असलेल्या जगळे यांच्या शेतातील माती खचून वाहून जाऊन सुमारे दोन गुंठे जागेत मोठे भगदाड पडले.त्यामुळे शेजारील पुलालाही धोका निर्माण झाला आहे. या भगदाडापासून दहा- पंधरा फुटाच्या अंतरावर महापारेषण कंपनीचा मोठा टॉवर आहे. जमिन भुसभुसित असल्याने अजुन एखादा मोठा पाऊस पडला तर जमिन खचत जाऊन या टॉवरलाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे एकिकडे पुल आणि दुसरीकडे टॉवर अशा दुहेरी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.या रस्त्याचे काम सुरु असतांना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाºयांनी नाला पूर्ववत करुन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र वारंवार पाठपुरावा करुनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.वरच्या बाजुला जाखोरी ब्राम्हणवाडे रस्त्याच्या पलीकडून उतावर असलेल्या संतोष ताजणे, तुकाराम कटाळे, किशोर कटाळे, नारायण ताजणे, शरद ताजणे, सैय्यद, शेलार, जगळे, पगारे, बागुल यांच्या शेतातून पावसाचे पाणी वाहत येऊन विठोबा महिपत जगळे यांच्या शेतात साचल्याने तेथील माती झिजून नदीत प्रवाहित झाल्याने मोठे भगदाड पडले आहे.या भगदाडात सुमारे 40-45 ट्रक माती भरावी लागेल.या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने नाली तयार करुन रस्त्याला कठडे तयार करावेत अशी मागणी स्वप्नील जगळे यांनी केली आहे.दारणेच्या पुलालगत आमची शेती आहे. पूर्वी येथे मोठा नाला असल्याने पाणी वाहून जात होतो. मात्र रस्त्याच्या कामामुळे नाला बुजला गेला.त्यामुळे दरवर्षी पावसाचे पाणी आमच्या शेतात शिरुन नुकसान होते.वारंवार पाठपुरावा करुनही नाला पूर्ववत केला जात नाही. पावसाने गट नंबर 536 मध्ये मोठे भगदाड पडले. बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई मिळावी.-परशराम विठोबा जगळे, जाखोरी.

 

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागroad safetyरस्ते सुरक्षा