शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
4
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
5
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
6
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
7
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
8
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
9
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
10
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
11
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
12
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
13
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
14
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
15
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
16
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
17
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
18
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
19
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
20
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...

व्यवसायाच्या वाढीची हाव,  झाडांवर घाव..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:41 AM

शहरातील झाडे ही शहराची गरज असली तरी गेल्या काही वर्षांपासून झाडे तोडण्याइतक्याच विकृत पद्धतीने झाडांवर खिळे ठोकून त्यांना जायबंदी करण्याचे प्रकार सुरू आहेत.

आॅन दी स्पॉटनाशिक : शहरातील झाडे ही शहराची गरज असली तरी गेल्या काही वर्षांपासून झाडे तोडण्याइतक्याच विकृत पद्धतीने झाडांवर खिळे ठोकून त्यांना जायबंदी करण्याचे प्रकार सुरू आहेत. रस्त्याच्या कडेला असलेली वृक्षे ही सावली देण्यासाठी असली तरी अनेक व्यावसायिकांच्या दृष्टीने ते जाहिरात बाजीसाठीच असल्याच्या आविर्भावात झाडांवर जाहिराती लावण्यात येतात, परंतु त्याकडे महापालिकेचे लक्ष नाही की वृक्षप्रेमींचे!सिमेंटच्या वाढत्या जंगलात हिरवळीचे महत्त्व अधिक आहे, त्याची जाण असल्यानेच शासनाने वृक्ष तोडीसंदर्भातील कायदे कडक केले आहेत. एक झाड लावायचे असेल तर त्या बदल्यात पाच झाडे लावली पाहिजे, असा कायदेशीर दंडक आहे. इतकेच नव्हे तर मध्यंतरी कुंभमेळ्याच्या नावाखाली शहरातील झाडे तोडण्याचा मुद्दा पुढे आला तेव्हा रस्त्यालगतची झाडे तोडू नये यासाठी वृक्षप्रेमी नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन अनेक प्रकारच्या कडक सूचना दिल्या आहेत. वड, पिंपळासारखी झाडे असलीच तर ती रस्त्यात असूनही तोडू नये अशाप्रकारच्या कडक सूचना दिल्या आहेत, परंतु तरीही वृक्षाच्या विरोधात असलेले नागरिकांना स्वस्थ बसवत नाही.शहरात कोणाला व्यवसाय करण्यास किंवा त्याची जाहिरात करण्यास कोणाचा नकार नाही, मात्र त्यासाठी वैध साधने उपलब्ध आहेत. अगदी पथदीपांवर जाहिराती करायच्या असतील तरीही महापालिका शुल्क आकारणी करून परवानगी देते, परंतु अशाप्रकारची परवानगी न घेता आणि शुल्क न भरताच पोस्टर किंवा लोखंडी प्लेट््स कोठेही लावल्या जातात. विशेषत: झाडांवर खिळे ठोकून जाहिराती लावल्या जात असून, त्यामुळे हजारो वृक्षांवर घाव बसत आहेत. महापालिकेच्या वतीने त्याकडे लक्ष पुरवले जात नाही. परिणामी व्यावसायिकांचे फावले आहे.वृक्षप्राधीकरण समिती नावालाच...महापालिकेच्या क्षेत्रात वृक्ष जतन करणे आणि संवर्धन करणे यासाठी महापालिकेच्या वृक्षप्राधीकरण समितीला खूप अधिकार आहेत. परंतु घोळात अडकलेली समिती सध्या कायदेशीरदृष्ट्या गठीत नाही. समितीवर जाण्यास सत्तेचे पद म्हणून अनेक जण इच्छुकअसतात. परंतु प्रत्यक्षात वृक्षांसाठी असे तळात जाऊन काम करणे अपवादानेच घडते. आयुक्त हे समितीचे अध्यक्ष असल्याने सध्या तेच सर्वेसर्वा आहेत. त्यामुळे त्यांनी ठरवले तर कारवाई होऊ शकते.आकाशचिन्ह धोरण कागदावरचमहापालिकेच्या वतीने जाहिरात आणि आकाशचिन्ह धोरण आखण्यात आले आहे. ते सरकारने अद्याप मंजूर केलेले नसले तरी नियमाधीन राहून महापालिकेला कारवाई करता येणे शक्य आहे. महापालिकेच्या जाहिरात आणि आकाशचिन्ह धोरणात तर दुकानांवर असलेल्या उत्पादनांच्या जाहिरातीच्या खाली कोठे तरी दुकानाचे नाव लिहिलेले असते त्यालादेखील मनाई आहे. परंतु त्याचेदेखील भान महापालिकेला राहिलेले नाही.माहीत असूनही कारवाई नाही...झाडांवर फलक लावणाऱ्यांच्या पोस्टरवर त्यांचे संपर्क क्रमांकदेखील असतात. विशेषत: काही व्यावसायिकांनी केवळ आपल्या व्यवसायाचे नाव आणि फोन नंबर अशाच प्रकारची जाहिरात केली असल्याने महापालिकेला संबंधितांना शोधून कारवाई करणे शक्य आहे, परंतु त्यासंदर्भातील मानसिकताच नाही ही खरी अडचण आहे.कायदा आहे, पण...झाडांवर खिळे ठोकणे हे वृक्ष विदु्रपीकरण कायद्याअंतर्गत येते. त्यानुसार संबंधित खिळे ठोकणाºयांवर कठोर कारवाईची आणि दंडाची तरतूद आहे, परंतु त्यावर महापालिका मात्र अंमल करीत नाही. वृक्षलागवडीपेक्षा वृक्षसंवर्धन महत्त्वाचे आहे, परंतु त्याहीपेक्षा अनेक वर्षे टिकतील अशाप्रकारच्या झाडांचे रक्षण व जतन करणे यासाठी अधिनियमच आहे, परंतु तरीही त्याची अंमलबजावणी केली जात नाही.हीदेखील विकृतीच...शहरात गोदाकाठी असलेली मखलाबाद शिवारातील तसेच म्हसरूळ परिसरातील झाडे तोडण्यासाठी बुंध्यांना आग लावणे किंवा झाडांची साल काढून घेणे यांसारखे प्रकार केले गेले होते. त्याच धर्तीवर झाडांना जाहिराती ठोकणे हा प्रकार आहे. एकाच झाडाला अनेक बाजूने खिळे ठोकून प्लेट लटकवल्याचे शहरात सर्वत्रच आढळते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी