शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

व्यवसायाच्या वाढीची हाव,  झाडांवर घाव..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:42 IST

शहरातील झाडे ही शहराची गरज असली तरी गेल्या काही वर्षांपासून झाडे तोडण्याइतक्याच विकृत पद्धतीने झाडांवर खिळे ठोकून त्यांना जायबंदी करण्याचे प्रकार सुरू आहेत.

आॅन दी स्पॉटनाशिक : शहरातील झाडे ही शहराची गरज असली तरी गेल्या काही वर्षांपासून झाडे तोडण्याइतक्याच विकृत पद्धतीने झाडांवर खिळे ठोकून त्यांना जायबंदी करण्याचे प्रकार सुरू आहेत. रस्त्याच्या कडेला असलेली वृक्षे ही सावली देण्यासाठी असली तरी अनेक व्यावसायिकांच्या दृष्टीने ते जाहिरात बाजीसाठीच असल्याच्या आविर्भावात झाडांवर जाहिराती लावण्यात येतात, परंतु त्याकडे महापालिकेचे लक्ष नाही की वृक्षप्रेमींचे!सिमेंटच्या वाढत्या जंगलात हिरवळीचे महत्त्व अधिक आहे, त्याची जाण असल्यानेच शासनाने वृक्ष तोडीसंदर्भातील कायदे कडक केले आहेत. एक झाड लावायचे असेल तर त्या बदल्यात पाच झाडे लावली पाहिजे, असा कायदेशीर दंडक आहे. इतकेच नव्हे तर मध्यंतरी कुंभमेळ्याच्या नावाखाली शहरातील झाडे तोडण्याचा मुद्दा पुढे आला तेव्हा रस्त्यालगतची झाडे तोडू नये यासाठी वृक्षप्रेमी नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन अनेक प्रकारच्या कडक सूचना दिल्या आहेत. वड, पिंपळासारखी झाडे असलीच तर ती रस्त्यात असूनही तोडू नये अशाप्रकारच्या कडक सूचना दिल्या आहेत, परंतु तरीही वृक्षाच्या विरोधात असलेले नागरिकांना स्वस्थ बसवत नाही.शहरात कोणाला व्यवसाय करण्यास किंवा त्याची जाहिरात करण्यास कोणाचा नकार नाही, मात्र त्यासाठी वैध साधने उपलब्ध आहेत. अगदी पथदीपांवर जाहिराती करायच्या असतील तरीही महापालिका शुल्क आकारणी करून परवानगी देते, परंतु अशाप्रकारची परवानगी न घेता आणि शुल्क न भरताच पोस्टर किंवा लोखंडी प्लेट््स कोठेही लावल्या जातात. विशेषत: झाडांवर खिळे ठोकून जाहिराती लावल्या जात असून, त्यामुळे हजारो वृक्षांवर घाव बसत आहेत. महापालिकेच्या वतीने त्याकडे लक्ष पुरवले जात नाही. परिणामी व्यावसायिकांचे फावले आहे.वृक्षप्राधीकरण समिती नावालाच...महापालिकेच्या क्षेत्रात वृक्ष जतन करणे आणि संवर्धन करणे यासाठी महापालिकेच्या वृक्षप्राधीकरण समितीला खूप अधिकार आहेत. परंतु घोळात अडकलेली समिती सध्या कायदेशीरदृष्ट्या गठीत नाही. समितीवर जाण्यास सत्तेचे पद म्हणून अनेक जण इच्छुकअसतात. परंतु प्रत्यक्षात वृक्षांसाठी असे तळात जाऊन काम करणे अपवादानेच घडते. आयुक्त हे समितीचे अध्यक्ष असल्याने सध्या तेच सर्वेसर्वा आहेत. त्यामुळे त्यांनी ठरवले तर कारवाई होऊ शकते.आकाशचिन्ह धोरण कागदावरचमहापालिकेच्या वतीने जाहिरात आणि आकाशचिन्ह धोरण आखण्यात आले आहे. ते सरकारने अद्याप मंजूर केलेले नसले तरी नियमाधीन राहून महापालिकेला कारवाई करता येणे शक्य आहे. महापालिकेच्या जाहिरात आणि आकाशचिन्ह धोरणात तर दुकानांवर असलेल्या उत्पादनांच्या जाहिरातीच्या खाली कोठे तरी दुकानाचे नाव लिहिलेले असते त्यालादेखील मनाई आहे. परंतु त्याचेदेखील भान महापालिकेला राहिलेले नाही.माहीत असूनही कारवाई नाही...झाडांवर फलक लावणाऱ्यांच्या पोस्टरवर त्यांचे संपर्क क्रमांकदेखील असतात. विशेषत: काही व्यावसायिकांनी केवळ आपल्या व्यवसायाचे नाव आणि फोन नंबर अशाच प्रकारची जाहिरात केली असल्याने महापालिकेला संबंधितांना शोधून कारवाई करणे शक्य आहे, परंतु त्यासंदर्भातील मानसिकताच नाही ही खरी अडचण आहे.कायदा आहे, पण...झाडांवर खिळे ठोकणे हे वृक्ष विदु्रपीकरण कायद्याअंतर्गत येते. त्यानुसार संबंधित खिळे ठोकणाºयांवर कठोर कारवाईची आणि दंडाची तरतूद आहे, परंतु त्यावर महापालिका मात्र अंमल करीत नाही. वृक्षलागवडीपेक्षा वृक्षसंवर्धन महत्त्वाचे आहे, परंतु त्याहीपेक्षा अनेक वर्षे टिकतील अशाप्रकारच्या झाडांचे रक्षण व जतन करणे यासाठी अधिनियमच आहे, परंतु तरीही त्याची अंमलबजावणी केली जात नाही.हीदेखील विकृतीच...शहरात गोदाकाठी असलेली मखलाबाद शिवारातील तसेच म्हसरूळ परिसरातील झाडे तोडण्यासाठी बुंध्यांना आग लावणे किंवा झाडांची साल काढून घेणे यांसारखे प्रकार केले गेले होते. त्याच धर्तीवर झाडांना जाहिराती ठोकणे हा प्रकार आहे. एकाच झाडाला अनेक बाजूने खिळे ठोकून प्लेट लटकवल्याचे शहरात सर्वत्रच आढळते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी