शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

अपंग शेतकर्‍याची  द्राक्ष युरोपच्या बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:32 IST

शरीराने अपंग असले तरी दुर्दम्य इच्छाशक्ती प्रचंड आत्मविश्वास असेल तर पांगळा मनुष्यदेखील पर्वत ओलांडून जाऊ शकतो. वरील सुभाषित भेंडाळी येथील अपंग शेतकरी हरिदास सातपुते यांना योग्य प्रकारे लागू पडते. अपंगावर मात करून दीड एकर क्षेत्रावर द्राक्षबागेची लागवड करून सलग दोन वर्षे आंतराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्ष निर्यात करून लाखो रुपयांचे उत्पन्न त्यांनी मिळविले असून, तिसºया वर्षीदेखील त्यांची त्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

बाजीराव कमानकरमुकं करोती वाचालम:पंगुं लंगे यते गिरींयत कृपा तमहं वंदे:परमा नंद माधवा..शरीराने अपंग असले तरी दुर्दम्य इच्छाशक्ती प्रचंड आत्मविश्वास असेल तर पांगळा मनुष्यदेखील पर्वत ओलांडून जाऊ शकतो. वरील सुभाषित भेंडाळी येथील अपंग शेतकरी हरिदास सातपुते यांना योग्य प्रकारे लागू पडते. अपंगावर मात करून दीड एकर क्षेत्रावर द्राक्षबागेची लागवड करून सलग दोन वर्षे आंतराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्ष निर्यात करून लाखो रुपयांचे उत्पन्न त्यांनी मिळविले असून, तिसºया वर्षीदेखील त्यांची त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. बालपणात पोलिओग्रस्त सातपुते यांच्यावर गरिबीमुळे कोणतेही उपचार होऊ शकले नाही. एका पायाने कायमचे अपंगत्व आलेले सातपुते यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज केले. अपंग असूनही त्यांना नोकरी मिळाली नाही. आई-वडील यांनी संपूर्ण आयुष्य सायखेडा येथे कांदा गुदामांची राखण करून घालविले.नोकरी-धंदा नसल्याने खचून न जाता हरिदास यांनी वडिलांची वर्षानुवर्षे पडीत जमिनीवर शेती करण्याचा निर्णय घेऊन शेतीला सुरुवात केली. काही वर्षे पारंपरिक पद्धतीने शेती करून कुटुंब सावरले. तरी काहीतरी वेगळे करण्याची उमेद हरिदास सातपुते यांना स्वस्त बसू देत नव्हती. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपल्या दीड एकर क्षेत्रावर त्यांनी द्राक्ष लागवड केली. मुबलक पाणी, कष्ट करण्याची प्रवृत्ती, प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास यामुळे पहिल्याच वर्षी द्राक्ष पीक जोरात आले. नशिबाची साथ मिळाल्याने त्यांच्या बागेतील द्राक्ष युरोपच्या बाजारपेठेत पोहचली. सलग दुसºया वर्षीदेखील एक्सपोर्ट द्राक्ष झाल्याने त्यांचा आणि कुटुंबाचा आत्मविश्वास वाढला. दोन वर्षे दीड एकर क्षेत्रात सातपुते यांना अनुक्रमे दहा लाख व नऊ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. मागील वर्षी इंग्लंड येथील द्राक्ष व्यापाºयांनी बागेला भेट देऊन समाधान व्यक्त केले होते.  यंदा ओखी वादळ, प्रचंड थंडी ,बेमोसमी पाऊस यासारखी नैसिर्गक आपत्ती येऊन देखील योग्य प्रकारे नियोजन करून त्यांनी आपली बाग वाचवली आहे. परिसरातील द्राक्ष बागेत भुरी, कुज यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असला तरी सातपुते यांचे पीक जोमात आहे. यंदा देखील द्राक्ष निर्यात होतील असा विश्वास त्यांना आहे. कर्जबाजारीपनामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करतात. त्यांनी हरिदास सातपुते यांच्याकडुन आदर्श घ्यायला हवा. तालुक्यातील अनेक शेतकरी सातपुते यांचे निर्यातक्षम द्राक्ष पाहण्यासाठी येत असतात. अपंग सातपुते यांना पाहिल्यानंतर उत्तम नियोजन केले तर शेती तोट्यात नाही आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीत भरघोस उत्पन्न मिळते नोकरी मिळाली नाही तर खचून न जाता आत्मविश्वासाने उभे राहिले पाहिजे . असा संदेश सातपुते देत आहेत. 

 

 

टॅग्स :Farmerशेतकरी