शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

अपंग शेतकर्‍याची  द्राक्ष युरोपच्या बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:32 IST

शरीराने अपंग असले तरी दुर्दम्य इच्छाशक्ती प्रचंड आत्मविश्वास असेल तर पांगळा मनुष्यदेखील पर्वत ओलांडून जाऊ शकतो. वरील सुभाषित भेंडाळी येथील अपंग शेतकरी हरिदास सातपुते यांना योग्य प्रकारे लागू पडते. अपंगावर मात करून दीड एकर क्षेत्रावर द्राक्षबागेची लागवड करून सलग दोन वर्षे आंतराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्ष निर्यात करून लाखो रुपयांचे उत्पन्न त्यांनी मिळविले असून, तिसºया वर्षीदेखील त्यांची त्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

बाजीराव कमानकरमुकं करोती वाचालम:पंगुं लंगे यते गिरींयत कृपा तमहं वंदे:परमा नंद माधवा..शरीराने अपंग असले तरी दुर्दम्य इच्छाशक्ती प्रचंड आत्मविश्वास असेल तर पांगळा मनुष्यदेखील पर्वत ओलांडून जाऊ शकतो. वरील सुभाषित भेंडाळी येथील अपंग शेतकरी हरिदास सातपुते यांना योग्य प्रकारे लागू पडते. अपंगावर मात करून दीड एकर क्षेत्रावर द्राक्षबागेची लागवड करून सलग दोन वर्षे आंतराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्ष निर्यात करून लाखो रुपयांचे उत्पन्न त्यांनी मिळविले असून, तिसºया वर्षीदेखील त्यांची त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. बालपणात पोलिओग्रस्त सातपुते यांच्यावर गरिबीमुळे कोणतेही उपचार होऊ शकले नाही. एका पायाने कायमचे अपंगत्व आलेले सातपुते यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज केले. अपंग असूनही त्यांना नोकरी मिळाली नाही. आई-वडील यांनी संपूर्ण आयुष्य सायखेडा येथे कांदा गुदामांची राखण करून घालविले.नोकरी-धंदा नसल्याने खचून न जाता हरिदास यांनी वडिलांची वर्षानुवर्षे पडीत जमिनीवर शेती करण्याचा निर्णय घेऊन शेतीला सुरुवात केली. काही वर्षे पारंपरिक पद्धतीने शेती करून कुटुंब सावरले. तरी काहीतरी वेगळे करण्याची उमेद हरिदास सातपुते यांना स्वस्त बसू देत नव्हती. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपल्या दीड एकर क्षेत्रावर त्यांनी द्राक्ष लागवड केली. मुबलक पाणी, कष्ट करण्याची प्रवृत्ती, प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास यामुळे पहिल्याच वर्षी द्राक्ष पीक जोरात आले. नशिबाची साथ मिळाल्याने त्यांच्या बागेतील द्राक्ष युरोपच्या बाजारपेठेत पोहचली. सलग दुसºया वर्षीदेखील एक्सपोर्ट द्राक्ष झाल्याने त्यांचा आणि कुटुंबाचा आत्मविश्वास वाढला. दोन वर्षे दीड एकर क्षेत्रात सातपुते यांना अनुक्रमे दहा लाख व नऊ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. मागील वर्षी इंग्लंड येथील द्राक्ष व्यापाºयांनी बागेला भेट देऊन समाधान व्यक्त केले होते.  यंदा ओखी वादळ, प्रचंड थंडी ,बेमोसमी पाऊस यासारखी नैसिर्गक आपत्ती येऊन देखील योग्य प्रकारे नियोजन करून त्यांनी आपली बाग वाचवली आहे. परिसरातील द्राक्ष बागेत भुरी, कुज यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असला तरी सातपुते यांचे पीक जोमात आहे. यंदा देखील द्राक्ष निर्यात होतील असा विश्वास त्यांना आहे. कर्जबाजारीपनामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करतात. त्यांनी हरिदास सातपुते यांच्याकडुन आदर्श घ्यायला हवा. तालुक्यातील अनेक शेतकरी सातपुते यांचे निर्यातक्षम द्राक्ष पाहण्यासाठी येत असतात. अपंग सातपुते यांना पाहिल्यानंतर उत्तम नियोजन केले तर शेती तोट्यात नाही आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीत भरघोस उत्पन्न मिळते नोकरी मिळाली नाही तर खचून न जाता आत्मविश्वासाने उभे राहिले पाहिजे . असा संदेश सातपुते देत आहेत. 

 

 

टॅग्स :Farmerशेतकरी