शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षाचे मनुके, कांद्याचा झाला वांधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 18:45 IST

भाजीपाल्यावर नांगर : खरीपासाठी भांडवलाची चिंता

ठळक मुद्देकोरोनाचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादक शेतक-यांना

जळगाव नेऊर : दोन महिन्यंपासून शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरू आहे. कोरोनाच्या विळख्यात शेतमालही सापडल्याने शेतकऱ्यांपुढे ऐन खरीपात भांडवलाची चिंता उभी ठाकली आहे. अनेक शेतक-यांच्या द्राक्षाची झाडावरच मनुके तयार झाली तर अनेकांचा कांदा कवडीमोल दराने विकला जात असून, भाजीपाल्यावर नांगर फिरविण्याची वेळ शेतक-यांवर आल्याचे विदारक चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.कोरोनाचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादक शेतक-यांना बसला. वर्षभर मेहनत घेऊन पिकवलेली द्राक्षे मातीमोल भावाने विकावी लागली. यामुळे झालेला खर्च देखील वसूल झाला नाही. काही शेतक-यांच्या द्राक्षबागेत झाडावरच मनुके तयार झाली, तर अनेक शेतक-यांनी आहे त्या द्राक्षबागा खाली केल्या. द्राक्षांपाठोपाठ कांदा भाव कोसळले. निर्यात खुली होण्याच्या आशेवर अनेक शेतक-यांनी कांदा साठवला आणि ऐन वेळेसच कोरोनाचा प्रकोप वाढला. लॉकडाऊन, संचारबंदीत बाजार समिती चालू-बंद राहिल्याने कांदा उत्पादक शेतक-यांना मिळेल त्या दराने कांदा विक्र ी करावा लागला. आता, बाजार समित्या सुरु झाल्या पण मिळणा-या भावाने शेतक-यांचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. भाजीपाल्याचीही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. अनेक शेतकºयांनी आपल्या भाजीपाला पिकावर नांगर फिरवला तर काही शेतक-यांनी भाजीपाला शेतात जनावरे सोडून दिली. कोरोनाने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतक-यांपुढे खरीपाच्या भांडवलाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक