शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

द्राक्षाचे मनुके, कांद्याचा झाला वांधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 18:45 IST

भाजीपाल्यावर नांगर : खरीपासाठी भांडवलाची चिंता

ठळक मुद्देकोरोनाचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादक शेतक-यांना

जळगाव नेऊर : दोन महिन्यंपासून शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरू आहे. कोरोनाच्या विळख्यात शेतमालही सापडल्याने शेतकऱ्यांपुढे ऐन खरीपात भांडवलाची चिंता उभी ठाकली आहे. अनेक शेतक-यांच्या द्राक्षाची झाडावरच मनुके तयार झाली तर अनेकांचा कांदा कवडीमोल दराने विकला जात असून, भाजीपाल्यावर नांगर फिरविण्याची वेळ शेतक-यांवर आल्याचे विदारक चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.कोरोनाचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादक शेतक-यांना बसला. वर्षभर मेहनत घेऊन पिकवलेली द्राक्षे मातीमोल भावाने विकावी लागली. यामुळे झालेला खर्च देखील वसूल झाला नाही. काही शेतक-यांच्या द्राक्षबागेत झाडावरच मनुके तयार झाली, तर अनेक शेतक-यांनी आहे त्या द्राक्षबागा खाली केल्या. द्राक्षांपाठोपाठ कांदा भाव कोसळले. निर्यात खुली होण्याच्या आशेवर अनेक शेतक-यांनी कांदा साठवला आणि ऐन वेळेसच कोरोनाचा प्रकोप वाढला. लॉकडाऊन, संचारबंदीत बाजार समिती चालू-बंद राहिल्याने कांदा उत्पादक शेतक-यांना मिळेल त्या दराने कांदा विक्र ी करावा लागला. आता, बाजार समित्या सुरु झाल्या पण मिळणा-या भावाने शेतक-यांचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. भाजीपाल्याचीही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. अनेक शेतकºयांनी आपल्या भाजीपाला पिकावर नांगर फिरवला तर काही शेतक-यांनी भाजीपाला शेतात जनावरे सोडून दिली. कोरोनाने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतक-यांपुढे खरीपाच्या भांडवलाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक