शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
4
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
5
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
6
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
7
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
8
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
9
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
10
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
11
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
12
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
13
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
14
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
15
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
17
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
18
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
19
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
20
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'

द्राक्षे गेली कांदा चाळीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 11:02 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्यात थांबल्याने द्राक्षबागायतदारांचे मोठे नुकसान होत असून, अवकाळी पावसानंतर द्राक्ष बागांवर आता अनेकांकडून कुºहाड चालविली जात आहे. त्यातच द्राक्षे फेकून देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील द्राक्ष बागायतदार वसंत दामू जाधव यांनी तर लाखो रुपयांचा द्राक्षमाल फेकायचा कुठे या विवंचनेत तो चक्क कांदा चाळीत, घराच्या गच्चीवर तसेच शेतात पसरून दिला आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा तडाखा : बेदाणाही करणे बनले अवघड

लासलगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्यात थांबल्याने द्राक्षबागायतदारांचे मोठे नुकसान होत असून, अवकाळी पावसानंतर द्राक्ष बागांवर आता अनेकांकडून कुºहाड चालविली जात आहे. त्यातच द्राक्षे फेकून देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील द्राक्ष बागायतदार वसंत दामू जाधव यांनी तर लाखो रुपयांचा द्राक्षमाल फेकायचा कुठे या विवंचनेत तो चक्क कांदा चाळीत, घराच्या गच्चीवर तसेच शेतात पसरून दिला आहे.व्यापारी खरेदी बंद असल्याने द्राक्षे पिक काढणी करून पडून आहे. त्याला व्यापाऱ्यांकडूनही प्रतिसाद मिळेनासा झाला आहे, तर कवडीमोल दर मिळत असल्याने त्याचा वाहतूक खर्चही परवडेनासा झाला आहे. त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांकडून खुडव्याला आलेल्या द्राक्षांच्या बागांवर कुºहाड चालवली जात आहे, तर काही शेतकºयांनी त्याच्या बेदाणा तयार करण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. परंतु, त्यासाठी लागणाºया साधनांचीही अनुलब्धता असल्याने बेदाणा करणेही अवघड होऊन बसले आहे. निफाड तालुक्यातील द्राक्ष बागायतदार वसंत दामू जाधव यांनी आपल्या शेतातील द्राक्षे शेतात, कांदा चाळीत व घराच्या छतावर टाकून दिली आहेत.या पिकाची इतरत्र विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याने ते वेलीवर पाच महिने ठेवले तर त्याचा परिणाम पुढील वर्षीच्या पिकास मुकावे लागणार आहे. त्यामुळे वेलीवरून पीक काढून टाकण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.सदर पीक तयार करणेस अंदाजे पाच ते सहा लाख रुपये खर्च झाल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात ४० टक्के द्राक्षे शिल्लक असल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे.

शासनाच्या निर्णया मुळे निर्यात व्यवस्था अडचणीत आली आहे. वास्तविक शासन ज्या सुरक्षिततेच्या उपाय योजना सांगत आहे त्या निर्यातदार गेल्या काही दशकांपासून करत आहे. कोरोना काही दिवसांत संपेल मात्र अवघ्या काही दिवसांचा शिल्लक असलेला द्राक्ष हंगाम पुन्हा सुरु होणार नाही व याचा फटका शेतकºयांना अनेक वर्ष सोसावा लागणार आहे.- सुरेश कळमकर, द्राक्ष निर्यातदारद्राक्षबागांवर चालविली कुºहाडदिंडोरी : मोहाडी येथील नारायण एकनाथ जाधव या शेतकºयाने सुमारे तीनशे क्विंटल द्राक्ष असलेली दोन एकर द्राक्षबाग पंधरा दिवसांपासून विक्र ीसाठी तयार ठेवली होती. मात्र कोरोनाच्या हाहाकारामुळे द्राक्ष खरेदीसाठी व्यापारी फिरकत नाही. त्यातच बेदाणे बनविण्याचा विचार समोर आला तर त्यासाठी आवश्यक असणारी औषधे मिळत नसल्याने शेवटी जड अंत:करणाने मोठ्या कष्टाने उभी केलीली द्राक्षबाग जाधव यांनी उभ्या पिकासह तोडून टाकली आहे. नारायण जाधव यांची एक बाग वीस दिवसांपूर्वीच बेदाण्याला दिली आहे. त्याचीही एक दमडीही त्यांना आजपर्यंत मिळालेली नाही. यामुळे आता त्यांच्यावर असलेले सुमारे दहा लाखांचे कर्ज, हातउसने, पावडरवाल्याची उधारी, द्राक्ष मजुरांची मजुरी व पाच-सहा जणांचे कुटुंब यांचा चरितार्थ कसा चालवायचा, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAgriculture Sectorशेती क्षेत्र