शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षाला मिळतोय कवडीमोल भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:37 IST

जळगाव नेऊर : दर्जेदार द्राक्ष मालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या असून अनेकांनी नैराश्यपोटी द्राक्षबागांवर कुऱ्हाड चालविण्याची मानसिकता केली आहे.

ठळक मुद्देदर्जेदार द्राक्षबागेला १९८० सालचा दर

जळगाव नेऊर : दर्जेदार द्राक्ष मालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या असून अनेकांनी नैराश्यपोटी द्राक्षबागांवर कुऱ्हाड चालविण्याची मानसिकता केली आहे.शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या दर्जेदार द्राक्षबागेला १९८० सालचा दर मिळत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांचा दुसरा हंगामही कोरोनाच्या सावटाखाली सापडल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. जुन्याजाणत्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९८० सालातसुद्धा दहा ते पंधरा रुपये दराने द्राक्ष विकली जात होती पण त्यावेळेस औषधांचा खर्च कमी होता. आता मात्र खते, औषधांचे वाढलेले दर, मजुरीचे वाढलेले दर पाहता शेतकरी ऐन हंगामात संकटात सापडला आहे. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा व्यापाऱ्यांअभावी, तर कधी वाहतूक बंदमुळे अडचणीत आल्या. अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागेवर मनुके तयार झाले. मागील वर्ष कोरोना संकटात गेलेले असतानाच दुसरे वर्ष ही कोरोना संसर्ग साथीच्या सावटाखाली चालल्याने शेतकरी द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालविण्याच्या मानसिकतेत आहेत.अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा या पाच महिन्याच्या होत असल्याने आहे त्या भावात द्राक्षबागा द्याव्या लागत आहेत. पुढील वर्षासाठी काडी चांगली होण्यासाठी थोडी विश्रांती देऊन छाटणी करावी लागणार आहे. सध्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या सप्ताहात दहा रुपयांपासून द्राक्ष विक्री करावी लागली असून निर्यातक्षम मालाला ३५ रुपयांपर्यंत दर मिळत आहे.फोटो - १० ग्रेप्सजळगाव नेऊर परिसरात कडाक्याच्या उन्हात सुरू असलेला द्राक्ष बागेचा खुडा.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती