शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

अवकाळीमुळे द्राक्ष उत्पादनात घट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 12:53 IST

पाटोदा - अवकाळी पाऊस व त्यानंतर वातावरणातील सततच्या बदलाने द्राक्ष बागांवर विपरीत परिणाम झाल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत तीन ते चार पट जादा खर्चकरूनही उत्पन्न ७० ते ८० टक्कयांनी घटल्याने शेतकऱ्यांना कोट्यवधी रु पयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

पाटोदा ( गोरख घुसळे ):- अवकाळी पाऊस व त्यानंतर वातावरणातील सततच्या बदलाने द्राक्ष बागांवर विपरीत परिणाम झाल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत तीन ते चार पट जादा खर्चकरूनही उत्पन्न ७० ते ८० टक्कयांनी घटल्याने शेतकऱ्यांना कोट्यवधी रु पयांचा तोटा सहन करावा लागत आहे. केलेला खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसत नसल्याने येवला तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. द्राक्ष हंगाम वाया गेल्याने तालुक्यातील अर्थकारणाची पूर्ण गतीच मंदावली आहे.संकटे , शेतकरी आणि शेती हे समीकरण सध्याच्या घडीला निर्माण झाले आहे. अवकाळी पाऊस तर कधी ढगाळ हवामान धुके, दव यामुळे द्राक्षबागा रोगाच्या बळी ठरल्या आहे.अशाही परिस्थितीत शेतकºयांनी औषध फवारणी करून बागा जागविल्या मात्र गेल्या चार पाच दिवसांपासून पडत असलेल्या कडाक्याची थंडी व बागांवर साचणारे दविबंदू द्राक्ष मण्यांना तडे जात असल्याने सध्या काढणीसाठी तयार असलेल्या द्राक्ष बागा खरेदीसाठीही व्यापारी धजावत नाही जरी व्यापारी खरेदी साठी आला तरी अत्यल्प दराने मागणी होत असल्याने शेतकºयांची धाकधूक वाढली असून तो पूर्णता मेटाकुटीला आला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून सतत दुष्काळाशी दोन हात करणाºया येवला तालुक्यात या वर्षी वेळेवर व समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी वर्गाने मोठया आनंदाने उधार उसनवार तसेच कारभारणीचे सौभाग्याचे लेणे बँका तसेच सावकाराकडे गहाण ठेवून खरीप हंगामाची पेरणी तसेच द्राक्ष बागांची तयारी केली .काही दिवसात पिके चांगली आली मात्र आॅक्टोबर व नोव्हेंबर मिहन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांच्या आनंदावर विरजण पडले हातातोंडाशी आलेली सर्व पिके खराब झाली.या अवकाळी पावसाने सप्टेंबर ,आॅक्टोबर मिहन्यात छाटणी केलेल्या संपूर्ण द्राक्ष बागा वाया गेल्या आहे .ज्या थोडयाफार बागा अवकाळीच्या तडाख्यातून वाचल्या आहे आशा बागांनाही उत्पन्नाचा मोठा फटका बसला असल्याने अवस्था बिकट झाली आहे. द्राक्ष उत्पादक शेतकर्यांनी एकरी सुमारे अडीच लाखापेक्षा जास्त खर्च केलेला असून एकरी सरासरी वीस टन उत्पन्न निघणे अपेक्षित होते मात्र या अवकाळी पावसामुळे फक्त पाच ते सात टन इतके अत्यल्प उत्पन्न निघत असून सरासरी बाजारभाव पंचवीस ते पन्नास रु पये दरम्यान मिळत असल्याने शेतकर्यांनी केलेल्या खर्चापेक्षा कितीतरी पटीने तोटा होत असल्याने शेतकरी मोठया प्रमाणात कर्ज बाजरी झाला असून घेतलेले कर्ज व औषध दुकानदारांची देनेदारी कशी फेडायची या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक