शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

अवकाळीमुळे द्राक्ष उत्पादनात घट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 12:53 IST

पाटोदा - अवकाळी पाऊस व त्यानंतर वातावरणातील सततच्या बदलाने द्राक्ष बागांवर विपरीत परिणाम झाल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत तीन ते चार पट जादा खर्चकरूनही उत्पन्न ७० ते ८० टक्कयांनी घटल्याने शेतकऱ्यांना कोट्यवधी रु पयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

पाटोदा ( गोरख घुसळे ):- अवकाळी पाऊस व त्यानंतर वातावरणातील सततच्या बदलाने द्राक्ष बागांवर विपरीत परिणाम झाल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत तीन ते चार पट जादा खर्चकरूनही उत्पन्न ७० ते ८० टक्कयांनी घटल्याने शेतकऱ्यांना कोट्यवधी रु पयांचा तोटा सहन करावा लागत आहे. केलेला खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसत नसल्याने येवला तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. द्राक्ष हंगाम वाया गेल्याने तालुक्यातील अर्थकारणाची पूर्ण गतीच मंदावली आहे.संकटे , शेतकरी आणि शेती हे समीकरण सध्याच्या घडीला निर्माण झाले आहे. अवकाळी पाऊस तर कधी ढगाळ हवामान धुके, दव यामुळे द्राक्षबागा रोगाच्या बळी ठरल्या आहे.अशाही परिस्थितीत शेतकºयांनी औषध फवारणी करून बागा जागविल्या मात्र गेल्या चार पाच दिवसांपासून पडत असलेल्या कडाक्याची थंडी व बागांवर साचणारे दविबंदू द्राक्ष मण्यांना तडे जात असल्याने सध्या काढणीसाठी तयार असलेल्या द्राक्ष बागा खरेदीसाठीही व्यापारी धजावत नाही जरी व्यापारी खरेदी साठी आला तरी अत्यल्प दराने मागणी होत असल्याने शेतकºयांची धाकधूक वाढली असून तो पूर्णता मेटाकुटीला आला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून सतत दुष्काळाशी दोन हात करणाºया येवला तालुक्यात या वर्षी वेळेवर व समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी वर्गाने मोठया आनंदाने उधार उसनवार तसेच कारभारणीचे सौभाग्याचे लेणे बँका तसेच सावकाराकडे गहाण ठेवून खरीप हंगामाची पेरणी तसेच द्राक्ष बागांची तयारी केली .काही दिवसात पिके चांगली आली मात्र आॅक्टोबर व नोव्हेंबर मिहन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांच्या आनंदावर विरजण पडले हातातोंडाशी आलेली सर्व पिके खराब झाली.या अवकाळी पावसाने सप्टेंबर ,आॅक्टोबर मिहन्यात छाटणी केलेल्या संपूर्ण द्राक्ष बागा वाया गेल्या आहे .ज्या थोडयाफार बागा अवकाळीच्या तडाख्यातून वाचल्या आहे आशा बागांनाही उत्पन्नाचा मोठा फटका बसला असल्याने अवस्था बिकट झाली आहे. द्राक्ष उत्पादक शेतकर्यांनी एकरी सुमारे अडीच लाखापेक्षा जास्त खर्च केलेला असून एकरी सरासरी वीस टन उत्पन्न निघणे अपेक्षित होते मात्र या अवकाळी पावसामुळे फक्त पाच ते सात टन इतके अत्यल्प उत्पन्न निघत असून सरासरी बाजारभाव पंचवीस ते पन्नास रु पये दरम्यान मिळत असल्याने शेतकर्यांनी केलेल्या खर्चापेक्षा कितीतरी पटीने तोटा होत असल्याने शेतकरी मोठया प्रमाणात कर्ज बाजरी झाला असून घेतलेले कर्ज व औषध दुकानदारांची देनेदारी कशी फेडायची या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक