शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

द्राक्ष, कांद्याला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 22:46 IST

सायखेडा : दक्षिणेकडील अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने बुधवारी पहाटेपासून वातावरणात अचानक बदल झाला असून, ढगाळ वातावरणामुळे अखेरच्या टप्प्यात सुरू असलेल्या द्राक्षबागा, काढणीसाठी आलेला कांदा, गहू ही पिके धोक्यात आली आहेत; शिवाय पाऊस पडतो की काय, या भीतीने शेतकरी धास्तावला आहे.

ठळक मुद्देढगाळ वातावरण शेतकरी धास्तावले, गव्हालाही भीती

सायखेडा : दक्षिणेकडील अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने बुधवारी पहाटेपासून वातावरणात अचानक बदल झाला असून, ढगाळ वातावरणामुळे अखेरच्या टप्प्यात सुरू असलेल्या द्राक्षबागा, काढणीसाठी आलेला कांदा, गहू ही पिके धोक्यात आली आहेत; शिवाय पाऊस पडतो की काय, या भीतीने शेतकरी धास्तावला आहे.कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकटांचा सामना करावा लागणारा शेतकरी चार पैसे मिळतील या आशेत असताना ढगाळ वातावरणामुळे हाती आलेले पीक वाया जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.आठ ते दहा दिवसांपासून द्राक्षांची आवक घटल्याने बाजारभावात काहीशी सुधारणा झाली आहे. बेभाव विकणारी द्राक्षे किमान ३५ ते कमाल ४० रु पये विकली जात आहेत. मात्र द्राक्ष सेटिंगच्या वेळी पाऊस पडला होता. त्यामुळे गळ आणि कुज झाल्याने उत्पादन घटले आहे. पर्यायाने बाजारपेठेत द्राक्ष आवक नसल्याने दोन रुपये जास्त भाव शेतकऱ्यांना मिळत असला तरी ढगाळ वातावरणामुळे व्यापारी भाव कमी करतात किंवा अचानक पाऊस पडला तर तोंडाजवळ आलेला घास निसर्ग हिसकावून घेतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.कांदा आणि गहू पीक ९० टक्के काढणीच्या प्रतीक्षेत असल्याने ढगाळ वातावरण आणि पावसाची भीती यामुळे पूर्ण वाया जाऊ शकते. कांदा नाशवंत असल्याने खराब हवामानातसुद्धा पिकावर परिणाम होतो. पात करपून जाते, शिवाय मावा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. जमिनीत कांदा पोसत नाही त्यामुळे उत्पादनात घट होत असते. त्यासाठी आवश्यक असलेले वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकºयांनी काही प्रमाणात शेतात कांदा काढून टाकला आहे. साठवणीचा कालावधी पुढे असल्याने शेतात पोळ घालून पसरलेला कांदा खराब होऊ शकतो. अस्मानी, सुलतानी संकटकधी सरकारी धोरण तर कधी निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकºयाचे सातत्याने कंबरडे मोडत आहे. वाढते कर्ज, मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न, शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान यांना लागणार पैसा कसा उभा करावा, असा प्रश्न निर्माण होत आहे.वातावरणात सतत बदल होत असल्याने शेतात कोणता शेतमाल पिकवावा आणि त्याचा सांभाळ कसा करावा, असा प्रश्न निर्माण होत आहे. द्राक्ष, कांदा, गहू पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तोंडाजवळ आलेला घास निसर्ग हिरावून घेण्याची भीती वाटत आहे.- दत्तू मुरकुटे, शेतकरी, म्हाळसाकोरे