शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

द्राक्ष, कांद्याला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 22:46 IST

सायखेडा : दक्षिणेकडील अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने बुधवारी पहाटेपासून वातावरणात अचानक बदल झाला असून, ढगाळ वातावरणामुळे अखेरच्या टप्प्यात सुरू असलेल्या द्राक्षबागा, काढणीसाठी आलेला कांदा, गहू ही पिके धोक्यात आली आहेत; शिवाय पाऊस पडतो की काय, या भीतीने शेतकरी धास्तावला आहे.

ठळक मुद्देढगाळ वातावरण शेतकरी धास्तावले, गव्हालाही भीती

सायखेडा : दक्षिणेकडील अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने बुधवारी पहाटेपासून वातावरणात अचानक बदल झाला असून, ढगाळ वातावरणामुळे अखेरच्या टप्प्यात सुरू असलेल्या द्राक्षबागा, काढणीसाठी आलेला कांदा, गहू ही पिके धोक्यात आली आहेत; शिवाय पाऊस पडतो की काय, या भीतीने शेतकरी धास्तावला आहे.कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकटांचा सामना करावा लागणारा शेतकरी चार पैसे मिळतील या आशेत असताना ढगाळ वातावरणामुळे हाती आलेले पीक वाया जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.आठ ते दहा दिवसांपासून द्राक्षांची आवक घटल्याने बाजारभावात काहीशी सुधारणा झाली आहे. बेभाव विकणारी द्राक्षे किमान ३५ ते कमाल ४० रु पये विकली जात आहेत. मात्र द्राक्ष सेटिंगच्या वेळी पाऊस पडला होता. त्यामुळे गळ आणि कुज झाल्याने उत्पादन घटले आहे. पर्यायाने बाजारपेठेत द्राक्ष आवक नसल्याने दोन रुपये जास्त भाव शेतकऱ्यांना मिळत असला तरी ढगाळ वातावरणामुळे व्यापारी भाव कमी करतात किंवा अचानक पाऊस पडला तर तोंडाजवळ आलेला घास निसर्ग हिसकावून घेतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.कांदा आणि गहू पीक ९० टक्के काढणीच्या प्रतीक्षेत असल्याने ढगाळ वातावरण आणि पावसाची भीती यामुळे पूर्ण वाया जाऊ शकते. कांदा नाशवंत असल्याने खराब हवामानातसुद्धा पिकावर परिणाम होतो. पात करपून जाते, शिवाय मावा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. जमिनीत कांदा पोसत नाही त्यामुळे उत्पादनात घट होत असते. त्यासाठी आवश्यक असलेले वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकºयांनी काही प्रमाणात शेतात कांदा काढून टाकला आहे. साठवणीचा कालावधी पुढे असल्याने शेतात पोळ घालून पसरलेला कांदा खराब होऊ शकतो. अस्मानी, सुलतानी संकटकधी सरकारी धोरण तर कधी निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकºयाचे सातत्याने कंबरडे मोडत आहे. वाढते कर्ज, मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न, शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान यांना लागणार पैसा कसा उभा करावा, असा प्रश्न निर्माण होत आहे.वातावरणात सतत बदल होत असल्याने शेतात कोणता शेतमाल पिकवावा आणि त्याचा सांभाळ कसा करावा, असा प्रश्न निर्माण होत आहे. द्राक्ष, कांदा, गहू पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तोंडाजवळ आलेला घास निसर्ग हिरावून घेण्याची भीती वाटत आहे.- दत्तू मुरकुटे, शेतकरी, म्हाळसाकोरे