शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 01:10 IST

मानोरी : तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण, दाट धुके पडत असून, सोमवारी ( दि.१४ ) सकाळी सात वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाच्या तुरळक हलक्या सरी बरसल्यानंतर रब्बी हंगामातील गहू, हरभरा , लाल कांदा लागवड, द्राक्ष उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांवर सातत्याने औषध फवारणी करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देयेवला : कांदा लागवड दाट धुक्याच्या कचाट्यात

मानोरी : तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण, दाट धुके पडत असून, सोमवारी ( दि.१४ ) सकाळी सात वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाच्या तुरळक हलक्या सरी बरसल्यानंतर रब्बी हंगामातील गहू, हरभरा , लाल कांदा लागवड, द्राक्ष उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांवर सातत्याने औषध फवारणी करण्याची वेळ आली आहे.येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, देशमाने, मुखेड, जळगाव नेऊर, शिरसगाव, पिंपळगाव लेप , जऊळके आदी परिसरात मुसळधार पावसामुळे रोपांचे अतोनात नुकसान झाल्यानंतर नव्याने रोपे विकत घेऊन उशिरा उन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकरी व्यस्त आहेत; मात्र ही नव्याने केलेली कांदा लागवडदेखील ढगाळ वातावरण आणि दाट धुक्याच्या कचाट्यात सापडली आहे. कांद्याचे शेंडे पिवळसर पडण्याच्या भीतीने शेतकरी वर्गाकडून औषध फवारणी केली जात असून, मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. दरम्यान, या ढगाळ वातावरणामुळे आणि अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांबरोबर द्राक्ष उत्पादक शेतकरी पूर्णतः धास्तावला आहे. मोठ्या मेहनतीने घेतलेल्या द्राक्ष बागेला काही दिवसांपूर्वी चांगल्या प्रकारे फळे लागली आहेत; मात्र तुरळक पडणाऱ्या अवकाळी पावसाने आणि पहाटे पडणाऱ्या धुक्यामुळे द्राक्ष फळांवर पाणी साचून काळे डाग पडत आहेत. वर्षाकाठी लाखो रुपये खर्चून द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते; मात्र ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाच्या सरींनी तीन दिवसांपासून शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. या हवामान बदलाचा द्राक्ष उत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याचे उत्पादकांकडून सांगितले जात आहे.तीन दिवसांच्या ढगाळ वातावरणामुळे द्राक्षांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, दररोज औषध फवारणी करावी लागत आहे. पुढचे काही दिवस वातावरण असेच ढगाळ राहिल्यास द्राक्ष बागा वाचविण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करावी लागेल.- कल्याण कोटकर, द्राक्ष उत्पादक, शिरसगाव लौकी.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी