शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

द्राक्ष उत्पादकांना फुटला बदलत्या हवामानाने घाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 22:26 IST

लासलगावसह निफाड तालुक्यात वातावरणातील बदलांमुळे तसेच ढगाळ हवामानामुळे द्राक्ष उत्पादकांना घाम फुटला आहे. आणखी दोन-तीन दिवस असे वातावरण राहणार असून, अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देलासलगाव : फवारणीचा खर्च वाढल्याने आर्थिक संकट

लासलगाव : लासलगावसह निफाड तालुक्यात वातावरणातील बदलांमुळे तसेच ढगाळ हवामानामुळे द्राक्ष उत्पादकांना घाम फुटला आहे. आणखी दोन-तीन दिवस असे वातावरण राहणार असून, अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.फुलोेºयात असणाºया द्राक्षबागांना ढगाळ हवामानाचा व अवकाळी पावसाचा जबर फटका बसला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात छाटण्या घेतलेल्या बागांत सध्या द्राक्षमणी तयार होऊ लागल्याचे चित्र आहे. एकदा द्राक्षमणी सेट झाले की वातावरणातील बदलाची फारशी काळजी रहात नाही. परंतु अशा बागांचे प्रमाण किती यावर एकूण उत्पादन अवलंबून असेल. द्राक्ष उत्पादक औषधांच्या फवारण्या करून बाग वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ढगाळ हवामानाने फुलोरा स्थितीमधील बागांना नुकसानकारक ठरणार आहे. तसेच द्राक्षमणी तडकण्याचे प्रमाण वाढत आहे. याशिवाय या वातावरणात डावण्या रोगाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे.ढगाळ वातावरण जर असेच राहिले तर बागांवर प्रचंड प्रमाणात औषधांची फवारणी करून डावण्या आटोक्यात आणावा लागेल. परिणामी द्राक्ष बागायतदारांनी शेती औषधांच्या दुकानांमध्ये औषध खरेदीसाठी गर्दी करत असून, आर्थिक संकत गडद झाले आहे. सध्या औषधांच्या फवारणीशिवाय काहीच पर्यायनाही. त्यामुळे डावण्याचे प्रमाणबघून तज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषधाची मात्रा ठरवून फवारणी सुरू केलीआहे.कर्ज काढून फवारणीलासलगाव, टाकळी, कोटमगाव, खडक माळेगाव, उगाव, वनसगाव, सारोळे, नैताळे या भागातील द्राक्ष बागायतदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भागात दोन दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणाबरोबर काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामुळे फळकूज होण्याची भीती निर्माण झाली आहे. या वातावरणाचा फाटक बसला आहे. महागडी औषधे तसेच कर्जे काढून द्राक्षबागा जतन करून द्राक्षबागेवर औषध फवारणी सुरू आहे.द्राक्ष उत्पादक हे औषधांच्या फवारण्या करून बाग वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. हे ढगाळतसेच पावसाळी वातावरण द्राक्षबागांना नुकसानकारक ठरणार आहे. निर्यातक्षम द्राक्षांना आता मोठ्या प्रमाणात हानी पोहोचणार आहे. ढगाळ वातावरण जर असेच राहिले तर द्राक्ष उत्पादक मोठ्या आर्थिक संकटात सापडणार आहे. - संदीप ठोंबरे, द्राक्ष उत्पादक

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती