शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
5
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
6
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
7
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
8
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
9
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
10
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
11
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
12
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
13
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
14
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
15
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
16
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
17
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
18
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
19
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
20
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...

द्राक्ष उत्पादकांना फुटला बदलत्या हवामानाने घाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 22:26 IST

लासलगावसह निफाड तालुक्यात वातावरणातील बदलांमुळे तसेच ढगाळ हवामानामुळे द्राक्ष उत्पादकांना घाम फुटला आहे. आणखी दोन-तीन दिवस असे वातावरण राहणार असून, अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देलासलगाव : फवारणीचा खर्च वाढल्याने आर्थिक संकट

लासलगाव : लासलगावसह निफाड तालुक्यात वातावरणातील बदलांमुळे तसेच ढगाळ हवामानामुळे द्राक्ष उत्पादकांना घाम फुटला आहे. आणखी दोन-तीन दिवस असे वातावरण राहणार असून, अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.फुलोेºयात असणाºया द्राक्षबागांना ढगाळ हवामानाचा व अवकाळी पावसाचा जबर फटका बसला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात छाटण्या घेतलेल्या बागांत सध्या द्राक्षमणी तयार होऊ लागल्याचे चित्र आहे. एकदा द्राक्षमणी सेट झाले की वातावरणातील बदलाची फारशी काळजी रहात नाही. परंतु अशा बागांचे प्रमाण किती यावर एकूण उत्पादन अवलंबून असेल. द्राक्ष उत्पादक औषधांच्या फवारण्या करून बाग वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ढगाळ हवामानाने फुलोरा स्थितीमधील बागांना नुकसानकारक ठरणार आहे. तसेच द्राक्षमणी तडकण्याचे प्रमाण वाढत आहे. याशिवाय या वातावरणात डावण्या रोगाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे.ढगाळ वातावरण जर असेच राहिले तर बागांवर प्रचंड प्रमाणात औषधांची फवारणी करून डावण्या आटोक्यात आणावा लागेल. परिणामी द्राक्ष बागायतदारांनी शेती औषधांच्या दुकानांमध्ये औषध खरेदीसाठी गर्दी करत असून, आर्थिक संकत गडद झाले आहे. सध्या औषधांच्या फवारणीशिवाय काहीच पर्यायनाही. त्यामुळे डावण्याचे प्रमाणबघून तज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषधाची मात्रा ठरवून फवारणी सुरू केलीआहे.कर्ज काढून फवारणीलासलगाव, टाकळी, कोटमगाव, खडक माळेगाव, उगाव, वनसगाव, सारोळे, नैताळे या भागातील द्राक्ष बागायतदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भागात दोन दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणाबरोबर काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामुळे फळकूज होण्याची भीती निर्माण झाली आहे. या वातावरणाचा फाटक बसला आहे. महागडी औषधे तसेच कर्जे काढून द्राक्षबागा जतन करून द्राक्षबागेवर औषध फवारणी सुरू आहे.द्राक्ष उत्पादक हे औषधांच्या फवारण्या करून बाग वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. हे ढगाळतसेच पावसाळी वातावरण द्राक्षबागांना नुकसानकारक ठरणार आहे. निर्यातक्षम द्राक्षांना आता मोठ्या प्रमाणात हानी पोहोचणार आहे. ढगाळ वातावरण जर असेच राहिले तर द्राक्ष उत्पादक मोठ्या आर्थिक संकटात सापडणार आहे. - संदीप ठोंबरे, द्राक्ष उत्पादक

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती