शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष उत्पादक धास्तावले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 23:27 IST

पाटोदा : गेल्या तीन-चार दिवसांपासून पाटोदा आणि परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे द्राक्षबागांवर डावणी, भुरी आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले असून, बागा वाचविण्यासाठी महागडी औषध फवारणी करताना दिसत आहेत. ढगाळ वातावरणामुळे बुरशीनाशके व औषध फवारणीच्या खर्चातही वाढ झाली आहे. या वातावरणाचा रब्बी हंगामातील पिकांनादेखील मोठा फटका बसणार असल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देढगाळ वातावरणाचा फटका । भुरी, डावणी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता

गोरख घुसळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : गेल्या तीन-चार दिवसांपासून पाटोदा आणि परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे द्राक्षबागांवर डावणी, भुरी आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले असून, बागा वाचविण्यासाठी महागडी औषध फवारणी करताना दिसत आहेत. ढगाळ वातावरणामुळे बुरशीनाशके व औषध फवारणीच्या खर्चातही वाढ झाली आहे. या वातावरणाचा रब्बी हंगामातील पिकांनादेखील मोठा फटका बसणार असल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.आॅक्टोबर महिन्यात सुमारे पंचवीस-सव्वीस दिवस परतीच्या पावसाने थैमान घातल्याने संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला. मका, सोयाबीन, बाजरी ही पिके शेतात पाणी साचल्याने सडून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. या भागात मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन घेतले जात आहे.आॅक्टोबर महिन्यात छाटणी केलेल्या संपूर्ण द्राक्षबागा या पावसाने वाया गेल्या. द्राक्षबागांमध्ये पाणी साचल्याने घडकुज, डावणी, मूळकुज, अशामुळे या बागा धोक्यात आल्या. शेतकरीवर्गाने एकरी दोन ते पाच लाखापर्यंत खर्च करून बागा वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र संपूर्ण बागावाया गेल्याने शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडलाआहे. ज्या काही शेतकऱ्यांनी पाऊस उघडल्यानंतर उशिरा पंधरा दिवसांपासून छाटणी केली आहे अशा द्राक्षबागांना गोड बहार येऊन मोठ्या प्रमाणात घड येण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या थंडीने द्राक्षबागांना भुरी रोगाचा फटका बसण्यास सुरुवात झाली होती.त्यामुळे शेतकºयांनी बुरशीनाशके फवारणी करून रोग आटोक्यात आणले. चार-पाच दिवसांपासून थंडी पुन्हा गायब झाली असून, गेल्या तीन-चार दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होऊन ढगाळवातावरण निर्माण झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले असून, बागा वाचविण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून तीन ते चार वेळेस दिवसातून महागडी औषध फवारणी करावी लागत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.औषधांचा खर्च वाढलाढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागांवर डावणीचा प्रादुर्भाव व थ्रीप्सदेखील वाढले आहे तर मका पिकाची कापणी अंतिम टप्प्यात आली असल्याने मावा, तुडतुडे वाढले असल्याने त्याचाही परिणाम बागांवर झाला आहे. त्यामुळे बुरशीनाशकांच्या खर्चात वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बुरशीनाशकाच्या खर्चात तिपटीने वाढ झाली असल्याची माहिती शेतकºयांनी दिली. येत्या काही दिवसात डावणी आटोक्यात आणण्यासाठी खर्च होऊनही जर थंडी वाढली तर भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने पुन्हा बुरशीनाशकांचा व महागड्या औषधांचा खर्च वाढणार असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.माझी सुमारे पाच एकर बाग असून, द्राक्षबागा या पोंगा अवस्थेत असताना परतीचा पावसामुळे डावणी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. डावणीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महागडी औषध फवारणी व बुरशीनाशके फवारणी करावी लागत असल्याने खर्चात मोठी वाढ झाली आहे.- भाऊसाहेब ढोपरे, द्राक्ष उत्पादक, पाटोदाउशिरा छाटणी केल्यामुळे बागेला गोड बहार आला आहे. द्राक्षबागही सध्या चांगली आहे मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने द्राक्षबागांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे दिवसातून किमान चार वेळेस औषधे व बुरशीनाशके फवारणी करावी लागत असल्याने अडचणी वाढल्या आहे.-किरण बिडवे, द्राक्ष उत्पादक, पाटोदा

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी