शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
4
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
5
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
6
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
7
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
8
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
9
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
10
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
11
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
12
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
13
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
14
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
15
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
16
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
17
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
18
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
20
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा

द्राक्षावर आधारित उद्योग आले संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 01:32 IST

संपूर्ण जिल्ह्यात द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना तीन ते चार वर्षांपासून अनेक प्रकारच्या अस्मानी व सुलतानी संकटांनी जेरीस आणल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. विविध बँका तसेच सोसायट्यांकडून कर्ज घेऊन उभ्या केलेल्या बागेतील द्राक्षांना कोराेनामुळे बाजारपेठ उपलब्ध नसल्याने कवडीमोल भावात विकण्याची वेळ आल्यामुळे   पीकपद्धतीत बदल करावा की काय या विंवचनेत सापडलेल्या उत्पादकांमुळे द्राक्ष पिकांवर आधारित उद्योग-धंदे परतण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

ठळक मुद्देउत्पादक चिंतित : अस्मानी, सुलतानी संकटांची मालिका सुरूच

लखमापूर : संपूर्ण जिल्ह्यात द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना तीन ते चार वर्षांपासून अनेक प्रकारच्या अस्मानी व सुलतानी संकटांनी जेरीस आणल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. विविध बँका तसेच सोसायट्यांकडून कर्ज घेऊन उभ्या केलेल्या बागेतील द्राक्षांना कोराेनामुळे बाजारपेठ उपलब्ध नसल्याने कवडीमोल भावात विकण्याची वेळ आल्यामुळे   पीकपद्धतीत बदल करावा की काय या विंवचनेत सापडलेल्या उत्पादकांमुळे द्राक्ष पिकांवर आधारित उद्योग-धंदे परतण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील  तीन ते चार हंगामापासून द्राक्षे पिकांने बळीराजांला कोणत्याही स्वरूपाची साथ दिली नाही. जवळचे होते नव्हते ते भांडवल खर्च करूनही हातात एक नवा पैसाही मिळाला नाही. त्यात विविध बँका, सोसायटी, पतसंस्था व इतर ठिकाणाहून घेतलेल्या कर्जाची परत फेड करायची कशी? घरगाडा  हाकायचा  कसा ? कर्ज घ्यावे तरी किती? ज्या शेतीच्या जोरावर कर्ज घेतले, तीच शेती तोट्यात आल्यानंतर ते घेतलेले कर्ज फेडावे कसे अशा नानाविध  प्रकारच्या प्रश्नांनी  द्राक्ष पंढरीतील बळीराजा हतबल झाला आहे. आता या ग्रहणातून  मुक्त होण्यासाठी शेतकरी  शेती पद्धतीमध्ये बदल करण्याच्या विचारात असल्याचे दिसून येत आहे. जर शेतकरी वर्गाने शेतीपद्धतीमध्ये बदल केला तर द्राक्षे पिकांवर अवलंबून असणारे व्यवसाय त्यात बेदाणा, वाइन प्रकल्प आदींवर  मोठा परिणाम होण्याची भीती शेतकरी वर्गाला वाटत आहे.वाइन उद्योगाला उतरती कळा चार पाच वर्षांपूर्वी वाईन उद्योगाला सुगीचे दिवस होते. परंतु सध्या द्राक्षे पिकाला लागलेली घरघर पाहता फक्त बोटावर मोजण्याइतके वाईन प्रकल्प सध्या सुरु  आहेत. वाईन ग्रेप्सचा  माल पूर्णपणे उचलला जात नाही. काही माल तसाच शिल्लक राहतो व उरलेल्या मालाचे करायचे काय? त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागतो. यामुळे बरेच शेतकरी वाईन उद्योगाला माल देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे वाईन उद्योगाला सध्या उतरती कळा लागली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती