शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत हायटेकसाठी ग्रामसेवकाची आडकाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:06 IST

ग्रामपंचायतींचा कारभार आता ‘हायटेक’ होत असल्याने या माध्यमातून गावागावांमध्ये आता ‘ग्लोबल व्हिलेज’ची सेवा सुरू झाली आहे. व्हीडीओ कॉन्फरन्सची सुविधादेखील पुढील काळात या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याचे चित्र असून, सरपंच ग्रामपंचायत कार्यालयातूनच थेट मंत्रालयाशी संपर्क साधणार असल्याने त्या दिशेने पावले उचलली जात असताना कळवण या आदिवासी तालुक्यातील धार्डेदिगर ग्रामपंचायत हायटेक करण्यासाठी चक्क ग्रामसेवकच आडकाठी करत असल्याची तक्रार उपसरपंच काशीनाथ बहिरम यांनी कळवण पंचायत समितीकडे केली आहे.

कळवण : ग्रामपंचायतींचा कारभार आता ‘हायटेक’ होत असल्याने या माध्यमातून गावागावांमध्ये आता ‘ग्लोबल व्हिलेज’ची सेवा सुरू झाली आहे. व्हीडीओ कॉन्फरन्सची सुविधादेखील पुढील काळात या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याचे चित्र असून, सरपंच ग्रामपंचायत कार्यालयातूनच थेट मंत्रालयाशी संपर्क साधणार असल्याने त्या दिशेने पावले उचलली जात असताना कळवण या आदिवासी तालुक्यातील धार्डेदिगर ग्रामपंचायत हायटेक करण्यासाठी चक्क ग्रामसेवकच आडकाठी करत असल्याची तक्रार उपसरपंच काशीनाथ बहिरम यांनी कळवण पंचायत समितीकडे केली आहे. ग्रामसेवकाच्या मनमानीमुळे धार्डेदिगर कार्यालय शोेचे बाहुले बनले आहे. धार्डेदिगर ग्रामपंचायत कार्यालयात कारभार हलविण्यात ग्रामसेवक राजी नसल्याने हायटेक सुविधांपासून ग्रामस्थांना वंचित रहाण्याची वेळ आली आहे. जुन्या ठिकाणांवरून ग्रामपंचायतीचे कामकाज सुरू असल्याने बहिरम यांनी गटविकासाधिकारी एम.डी. बहीरम यांच्याकडे तक्र ार दाखल केली आहे.पत्रव्यवहार नाहीजयदर येथून धार्डेदिगर ग्रामपंचायत कार्यालयासाठी आॅनलाइन केबल टाकण्याचे काम सुरू झाले असताना पाडगण (वरचापाडा) येथे काम थांबविण्यात आले. नाशिक येथील दूरसंचार कार्यालयाशी सदर कामासंदर्भात चौकशी केली असता, धार्डेदिगर ग्रामपंचायत कार्यालयांपर्यंत आॅनलाइन केबल टाकण्यासाठी ग्रामसेवकांचा पत्रव्यवहार नसल्याने काम पूर्ण करता येणार नसल्याचे संबधितांनी सांगितले.ग्रामपंचायत हायटेकचे फायदे ग्रामसभेचे कामकाज, यातील ठराव, सदस्य बैठक, प्रोसिडिंग बुकांची नोंद यासह दाखले, उतारेही तत्काळ मिळतात. ग्रामस्थांना उतारे, दाखले तत्काळ मिळतील व गाव इंटरनेटच्या माध्यमातून जिल्हा परिषदेशी जोडले जाईल. ग्रामस्थांची होणारी भटकंती यामुळे थांबणार असून, माहितीची देवाण-घेवाण करणे सोपे होते.