शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

कामे पूर्ण केलेल्या ग्रामपंचायतींनाच नव्याने कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 01:40 IST

नाशिक : ग्रामपंचायतींची क्षमता नसतानाही अनेक कामे मंजूर केली जातात, परिणामी अनेक कामे वर्षांनुवर्षे रखडत असल्यामुळे यापुढे जुनी कामे ...

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा निर्णय । गटविकास अधिकाऱ्यांवर जबाबदारी

नाशिक : ग्रामपंचायतींची क्षमता नसतानाही अनेक कामे मंजूर केली जातात, परिणामी अनेक कामे वर्षांनुवर्षे रखडत असल्यामुळे यापुढे जुनी कामे पूर्ण केल्याशिवाय ग्रामपंचायतींना नवीन कामे मंजूर न करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. ग्रामपंचायतींना कामे मंजूर करण्यापूर्वी गटविकास अधिकाऱ्यांनी तशी खात्री केल्याशिवाय सक्षमता प्रमाणपत्र देऊ नये, असा ठरावही करण्यात आला.जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत आत्माराम कुंभार्डे यांनी सदरचा प्रश्न उपस्थित केला. ग्रामपंचायतींमार्फत करण्यात येणारी जनसुविधेची कामे जिल्हा नियोजन विकास समिती मंजूर करते व ग्रामपंचायत कामे करते. यात जिल्हा परिषदेचा काही संबंध नसला तरी, फक्त निधी वितरित जिल्हा परिषद करीत असल्याने सदरचा निधी खर्च न झाल्यास जिल्हा परिषदेच्या माथी खापर फुटते. सन २०१७-१८ मध्ये ग्रामपंचायतीने कामे न केल्यामुळे दहा कोटींचा निधी परत गेल्याने जिल्हा परिषदेची नाचक्की झाली असल्याचे कुंभार्डे यांनी सांगितले. अनेक ग्रामपंचायतींनी दोन कामे मंजूर असताना पुन्हा तिसरे कामही मंजूर झाले आहे. अशा ग्रामपंचायतींची आर्थिक सक्षमता नसतानाही निव्वळ कामे घेऊन रखडवली आहेत. अशा ग्रामपंचायतींना संबंधित गटविकास अधिकाºयांकडून सक्षमता प्रमाणपत्र दिले जाते, परंतु मागची कामे तपासली जात नसल्याचेही सभेत सांगितले. त्यामुळे यापुढे ज्या ग्रामपंचायतींनी पहिली दोन कामे पूर्ण केली नसतील तर त्यांना नवीन कामे दिली जाऊ नये, असा निर्णय घेण्यात आला व त्याची जबाबदारी गटविकास अधिकाºयांवर निश्चित करण्यात यावी, असा ठराव करण्यात आला.शिक्षकांची रिक्त पदे भरणारया सभेत महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर यांनी दोन दिवसांपूर्वी नांदगाव तालुक्यातील पांझण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या मागणीसाठी मोर्चा काढला. त्यामुळे शिक्षकांची रिक्त पदे का भरण्यात येत नाही, असा सवाल केला. यावर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी प्राथमिक शिक्षकांची ४४० पदे रिक्त असून, १४० मुख्याध्यापक व १९० पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नतीचा विषय येत्या आठवड्यात निकाली काढण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यावर शिक्षकांच्या पदांबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली असल्याची माहिती अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदgram panchayatग्राम पंचायत