शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

कामे पूर्ण केलेल्या ग्रामपंचायतींनाच नव्याने कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 01:40 IST

नाशिक : ग्रामपंचायतींची क्षमता नसतानाही अनेक कामे मंजूर केली जातात, परिणामी अनेक कामे वर्षांनुवर्षे रखडत असल्यामुळे यापुढे जुनी कामे ...

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा निर्णय । गटविकास अधिकाऱ्यांवर जबाबदारी

नाशिक : ग्रामपंचायतींची क्षमता नसतानाही अनेक कामे मंजूर केली जातात, परिणामी अनेक कामे वर्षांनुवर्षे रखडत असल्यामुळे यापुढे जुनी कामे पूर्ण केल्याशिवाय ग्रामपंचायतींना नवीन कामे मंजूर न करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. ग्रामपंचायतींना कामे मंजूर करण्यापूर्वी गटविकास अधिकाऱ्यांनी तशी खात्री केल्याशिवाय सक्षमता प्रमाणपत्र देऊ नये, असा ठरावही करण्यात आला.जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत आत्माराम कुंभार्डे यांनी सदरचा प्रश्न उपस्थित केला. ग्रामपंचायतींमार्फत करण्यात येणारी जनसुविधेची कामे जिल्हा नियोजन विकास समिती मंजूर करते व ग्रामपंचायत कामे करते. यात जिल्हा परिषदेचा काही संबंध नसला तरी, फक्त निधी वितरित जिल्हा परिषद करीत असल्याने सदरचा निधी खर्च न झाल्यास जिल्हा परिषदेच्या माथी खापर फुटते. सन २०१७-१८ मध्ये ग्रामपंचायतीने कामे न केल्यामुळे दहा कोटींचा निधी परत गेल्याने जिल्हा परिषदेची नाचक्की झाली असल्याचे कुंभार्डे यांनी सांगितले. अनेक ग्रामपंचायतींनी दोन कामे मंजूर असताना पुन्हा तिसरे कामही मंजूर झाले आहे. अशा ग्रामपंचायतींची आर्थिक सक्षमता नसतानाही निव्वळ कामे घेऊन रखडवली आहेत. अशा ग्रामपंचायतींना संबंधित गटविकास अधिकाºयांकडून सक्षमता प्रमाणपत्र दिले जाते, परंतु मागची कामे तपासली जात नसल्याचेही सभेत सांगितले. त्यामुळे यापुढे ज्या ग्रामपंचायतींनी पहिली दोन कामे पूर्ण केली नसतील तर त्यांना नवीन कामे दिली जाऊ नये, असा निर्णय घेण्यात आला व त्याची जबाबदारी गटविकास अधिकाºयांवर निश्चित करण्यात यावी, असा ठराव करण्यात आला.शिक्षकांची रिक्त पदे भरणारया सभेत महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर यांनी दोन दिवसांपूर्वी नांदगाव तालुक्यातील पांझण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या मागणीसाठी मोर्चा काढला. त्यामुळे शिक्षकांची रिक्त पदे का भरण्यात येत नाही, असा सवाल केला. यावर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी प्राथमिक शिक्षकांची ४४० पदे रिक्त असून, १४० मुख्याध्यापक व १९० पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नतीचा विषय येत्या आठवड्यात निकाली काढण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यावर शिक्षकांच्या पदांबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली असल्याची माहिती अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदgram panchayatग्राम पंचायत