शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
3
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
4
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
5
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
6
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
7
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
9
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
10
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
11
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
12
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
13
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
14
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
15
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
16
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
17
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
18
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
19
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
20
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  

महावितरणकडे ग्रामपंचायतीची भाडेपट्टी थकीत; तरी वीज केली खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 22:19 IST

कळवण : महावितरण कंपनीकडे ओतूर वीज उपकेंद्राच्या भाडेपट्टीपोटी ग्रामपंचायतीची नऊ लाख रुपये गेल्या अनेक दिवसांपासून थकबाकी आहे. पत्रव्यवहार करूनदेखील महावितरण थकबाकी भरत नाही. मात्र ग्रामपंचायतकडे महावितरणने वीज थकबाकीचे कारण देत पथदीप वीजपुरवठा खंडित केल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून गावात अंधार असल्यामुळे उत्सवात तरी गावात रात्रीचा वीजपुरवठा सुरळीत करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्देवीज पुरवठा खंडीत केल्याने गाव 8 दिवसापासून अंधारात

कळवण : महावितरण कंपनीकडे ओतूर वीज उपकेंद्राच्या भाडेपट्टीपोटी ग्रामपंचायतीची नऊ लाख रुपये गेल्या अनेक दिवसांपासून थकबाकी आहे. पत्रव्यवहार करूनदेखील महावितरण थकबाकी भरत नाही. मात्र ग्रामपंचायतकडे महावितरणने वीज थकबाकीचे कारण देत पथदीप वीजपुरवठा खंडित केल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून गावात अंधार असल्यामुळे उत्सवात तरी गावात रात्रीचा वीजपुरवठा सुरळीत करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.दरम्यान, महावितरणने सबस्टेशनची भाडेपट्टी सहा लाख रुपये ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जमा करून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. महावितरणने थकबाकी भरल्यानंतर ग्रामपंचायत लगेच थकबाकी भरण्यास तयार असल्यामुळे त्यांनी सहकार्याची भूमिका घ्यावी. महावितरणनेदेखील ग्रामपंचायतीची सहा लाख रुपये थकबाकी द्यावी; नाही तर वीज उपकेंद्राला टाळे ठोकू, असा इशारा दिगंबर पवार, ज्ञानेश्वर पवार यांनी दिला आहे.ओतूर ग्रामपंचायतीचे वीज बिल नऊ लाख रुपये थकल्याने महावितरण कंपनीने वसुलीच्या नावाखाली गणेशोत्सवाच्या कालावधीत पथदिपांचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून गाव अंधारात आहे. त्यामुळे गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव महावितरणमुळे ग्रामस्थांना अंधारात साजरा करावा लागला. ग्रामपंचायतीकडे पाणीपुरवठा योजनेची थकबाकी असून चालू महिन्याचे वीज बिल आठ हजार २०० रोख भरणा करून महावितरणने गावाला सहकार्य केल्यामुळे गावात पाणीपुरवठा सुरळीत आहे.मात्र पथदीप बंद असल्याने गावात रात्रभर अंधार असतो. त्यामुळे रात्री-अपरात्री ग्रामस्थांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. शेतात जाणेही कठीण झाले आहे. संपूर्ण रात्र गावात अंधार असल्याने गावात स्मशानशांतता पसरते. गावातील भटक्या कुत्र्यांची व सध्या पावसाळा असल्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्याची भीती वाढली आहे.अंधाराचा फायदा घेत चोरटेही सक्रिय होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांची अडचण ओळखून महावितरण कंपनीने तत्काळ ग्रामपंचायतीचा पथदीप वीजपुरवठा सुरळीत करून गावातील अंधार घालवावा, अशी मागणी सरपंच पार्वता गांगुर्डे, उपसरपंच मंगेश देसाई, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केली आहे.ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजनेचे नियमित वीज बिल भरले आहे. त्यामुळे गावाला पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. ग्रामपंचायतीकडे महावितरणची नऊ लाख रुपये थकबाकी आहे. महावितरण कंपनीकडे ग्रामपंचायतीची सबस्टेशनची भाडेपट्टी सहा लाख रुपये थकबाकी आहे. याबाबत नियमित पत्रव्यवहार केला आहे. थकबाकी मिळाल्यानंतर वीज बिल बाकीत भरणा केला जाईल.पार्वता गांगुर्डे, सरपंच, ओतूर.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतelectricityवीज