शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणकडे ग्रामपंचायतीची भाडेपट्टी थकीत; तरी वीज केली खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 22:19 IST

कळवण : महावितरण कंपनीकडे ओतूर वीज उपकेंद्राच्या भाडेपट्टीपोटी ग्रामपंचायतीची नऊ लाख रुपये गेल्या अनेक दिवसांपासून थकबाकी आहे. पत्रव्यवहार करूनदेखील महावितरण थकबाकी भरत नाही. मात्र ग्रामपंचायतकडे महावितरणने वीज थकबाकीचे कारण देत पथदीप वीजपुरवठा खंडित केल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून गावात अंधार असल्यामुळे उत्सवात तरी गावात रात्रीचा वीजपुरवठा सुरळीत करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्देवीज पुरवठा खंडीत केल्याने गाव 8 दिवसापासून अंधारात

कळवण : महावितरण कंपनीकडे ओतूर वीज उपकेंद्राच्या भाडेपट्टीपोटी ग्रामपंचायतीची नऊ लाख रुपये गेल्या अनेक दिवसांपासून थकबाकी आहे. पत्रव्यवहार करूनदेखील महावितरण थकबाकी भरत नाही. मात्र ग्रामपंचायतकडे महावितरणने वीज थकबाकीचे कारण देत पथदीप वीजपुरवठा खंडित केल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून गावात अंधार असल्यामुळे उत्सवात तरी गावात रात्रीचा वीजपुरवठा सुरळीत करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.दरम्यान, महावितरणने सबस्टेशनची भाडेपट्टी सहा लाख रुपये ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जमा करून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. महावितरणने थकबाकी भरल्यानंतर ग्रामपंचायत लगेच थकबाकी भरण्यास तयार असल्यामुळे त्यांनी सहकार्याची भूमिका घ्यावी. महावितरणनेदेखील ग्रामपंचायतीची सहा लाख रुपये थकबाकी द्यावी; नाही तर वीज उपकेंद्राला टाळे ठोकू, असा इशारा दिगंबर पवार, ज्ञानेश्वर पवार यांनी दिला आहे.ओतूर ग्रामपंचायतीचे वीज बिल नऊ लाख रुपये थकल्याने महावितरण कंपनीने वसुलीच्या नावाखाली गणेशोत्सवाच्या कालावधीत पथदिपांचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून गाव अंधारात आहे. त्यामुळे गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव महावितरणमुळे ग्रामस्थांना अंधारात साजरा करावा लागला. ग्रामपंचायतीकडे पाणीपुरवठा योजनेची थकबाकी असून चालू महिन्याचे वीज बिल आठ हजार २०० रोख भरणा करून महावितरणने गावाला सहकार्य केल्यामुळे गावात पाणीपुरवठा सुरळीत आहे.मात्र पथदीप बंद असल्याने गावात रात्रभर अंधार असतो. त्यामुळे रात्री-अपरात्री ग्रामस्थांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. शेतात जाणेही कठीण झाले आहे. संपूर्ण रात्र गावात अंधार असल्याने गावात स्मशानशांतता पसरते. गावातील भटक्या कुत्र्यांची व सध्या पावसाळा असल्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्याची भीती वाढली आहे.अंधाराचा फायदा घेत चोरटेही सक्रिय होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांची अडचण ओळखून महावितरण कंपनीने तत्काळ ग्रामपंचायतीचा पथदीप वीजपुरवठा सुरळीत करून गावातील अंधार घालवावा, अशी मागणी सरपंच पार्वता गांगुर्डे, उपसरपंच मंगेश देसाई, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केली आहे.ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजनेचे नियमित वीज बिल भरले आहे. त्यामुळे गावाला पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. ग्रामपंचायतीकडे महावितरणची नऊ लाख रुपये थकबाकी आहे. महावितरण कंपनीकडे ग्रामपंचायतीची सबस्टेशनची भाडेपट्टी सहा लाख रुपये थकबाकी आहे. याबाबत नियमित पत्रव्यवहार केला आहे. थकबाकी मिळाल्यानंतर वीज बिल बाकीत भरणा केला जाईल.पार्वता गांगुर्डे, सरपंच, ओतूर.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतelectricityवीज