शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायतीत महिलांचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:23 IST

नाशिक तालुक्यातील चांदशी, पिंपळद, दरी आणि राहुरी या चार ग्रामपंचायतींच्या २८ सदस्यपदांसह चार थेट सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले.

गंगापूर : नाशिक तालुक्यातील चांदशी, पिंपळद, दरी आणि राहुरी या चार ग्रामपंचायतींच्या २८ सदस्यपदांसह चार थेट सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये प्रस्थापितांना मोठा धक्का बसून नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली. या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांचा बोलबाला दिसून आला. प्रथमच थेट जनतेतून सरपंचपदी निवडून आलेल्यांमध्ये चांदशी- साळूबाई विश्राम कचरे (अनु. जमाती स्री), दरी- अलका अंबादास गांगोडे (अनु. जमाती स्री), पिंपळद (ना.)- अलका भाऊसाहेब झोंबाड (अनु. जमाती), राहुरी- संगीत संपतराव घुगे (सर्वसाधारण) याप्रमाणे चारही ग्रामपंचायतीत थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून आले आहेत.चांदशी ग्रामपंचायतीत सदस्यपदी राहुल दौलत पाटील (ना. मा. प्रवर्ग), भगवान सदू धोंगडे (अनु. जमाती), अंजना नामदेव खराटे (अनु. जमाती स्री),परशराम हरी गारे (अनु. जमाती), म्हाळसाबाई हिरामण केंग (अनु. जमाती स्री), गोदावरी चैतन्य गायकर (सर्वसाधारण स्री), सोनाली योगेश कचरे (अनु. जमाती स्री), अरुण दगडू रोकडे (अनु. जाती), विमल हरीश गुळवे (सर्वसाधारण स्री) हे विजयी झाले. पिंपळद (ना.) ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून राजाराम नामदेव झोंबाड (अनु. जमाती), अरुण बालाजी खांडबहाले (सर्वसाधारण), साधना नितीन घोलप (सर्वसाधारण स्री), नारायण धर्मा पावडे (अनु. जमाती), गीता तानाजी चहाळे (अनु. जमाती स्री), संजय दशरथ पावडे (अनु. जमाती), संगीता अंकुश बेंडकुळे (अनु. जमाती स्री), निर्मला विलास कड (ना. मा. प्रवर्ग स्री), अश्विनी राजाराम झोंबाड (अनु. जमाती स्री), संजय भावका अनार्थे (सर्वसाधारण) गटातून निवडून आले आहेत.वर्चस्व : दिग्गजांनी गमावली पतनाशिक तालुक्यातील या चारही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पक्षीय चिन्हावर लढविल्या गेल्या नसल्याने कोणत्या पक्षाच्या ताब्यात सत्ता गेली याबाबत संभ्रमाचे चित्र आहे. असे असले तरी निकालाचा कल पाहिल्यास अनेक ग्रामपंचायतीत राजकीय उलथापालथ झाली आहे. मतमोजणीमध्ये अनेक दिग्गजांना आपली पत गमवावी लागली. तर काहींनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.निकालानंतर ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची मुक्त उधळण करीत जल्लोष केला गेला. सरपंचपदाचे उमेदवार पक्षाचे चिन्ह न घेता प्रथमच जनतेतून निवडून आल्याने ग्रामपंचायतीवर सत्ता नेमकी कुणाची, यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. नाशिकचे तहसीलदार अनिल दौंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी शांततेत पार पडली.या निवडणुकीवर लोकसभा अचारसंहितेचे सावट असल्याने अनेक ग्रामपंचायतींना विजयानंतर मिरवणूक काढता आली नाही; मात्र काही ठिकाणी मिरवणुकीद्वारे जल्लोष करण्यात आला.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतNashikनाशिक