शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायतीत महिलांचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:23 IST

नाशिक तालुक्यातील चांदशी, पिंपळद, दरी आणि राहुरी या चार ग्रामपंचायतींच्या २८ सदस्यपदांसह चार थेट सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले.

गंगापूर : नाशिक तालुक्यातील चांदशी, पिंपळद, दरी आणि राहुरी या चार ग्रामपंचायतींच्या २८ सदस्यपदांसह चार थेट सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये प्रस्थापितांना मोठा धक्का बसून नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली. या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांचा बोलबाला दिसून आला. प्रथमच थेट जनतेतून सरपंचपदी निवडून आलेल्यांमध्ये चांदशी- साळूबाई विश्राम कचरे (अनु. जमाती स्री), दरी- अलका अंबादास गांगोडे (अनु. जमाती स्री), पिंपळद (ना.)- अलका भाऊसाहेब झोंबाड (अनु. जमाती), राहुरी- संगीत संपतराव घुगे (सर्वसाधारण) याप्रमाणे चारही ग्रामपंचायतीत थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून आले आहेत.चांदशी ग्रामपंचायतीत सदस्यपदी राहुल दौलत पाटील (ना. मा. प्रवर्ग), भगवान सदू धोंगडे (अनु. जमाती), अंजना नामदेव खराटे (अनु. जमाती स्री),परशराम हरी गारे (अनु. जमाती), म्हाळसाबाई हिरामण केंग (अनु. जमाती स्री), गोदावरी चैतन्य गायकर (सर्वसाधारण स्री), सोनाली योगेश कचरे (अनु. जमाती स्री), अरुण दगडू रोकडे (अनु. जाती), विमल हरीश गुळवे (सर्वसाधारण स्री) हे विजयी झाले. पिंपळद (ना.) ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून राजाराम नामदेव झोंबाड (अनु. जमाती), अरुण बालाजी खांडबहाले (सर्वसाधारण), साधना नितीन घोलप (सर्वसाधारण स्री), नारायण धर्मा पावडे (अनु. जमाती), गीता तानाजी चहाळे (अनु. जमाती स्री), संजय दशरथ पावडे (अनु. जमाती), संगीता अंकुश बेंडकुळे (अनु. जमाती स्री), निर्मला विलास कड (ना. मा. प्रवर्ग स्री), अश्विनी राजाराम झोंबाड (अनु. जमाती स्री), संजय भावका अनार्थे (सर्वसाधारण) गटातून निवडून आले आहेत.वर्चस्व : दिग्गजांनी गमावली पतनाशिक तालुक्यातील या चारही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पक्षीय चिन्हावर लढविल्या गेल्या नसल्याने कोणत्या पक्षाच्या ताब्यात सत्ता गेली याबाबत संभ्रमाचे चित्र आहे. असे असले तरी निकालाचा कल पाहिल्यास अनेक ग्रामपंचायतीत राजकीय उलथापालथ झाली आहे. मतमोजणीमध्ये अनेक दिग्गजांना आपली पत गमवावी लागली. तर काहींनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.निकालानंतर ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची मुक्त उधळण करीत जल्लोष केला गेला. सरपंचपदाचे उमेदवार पक्षाचे चिन्ह न घेता प्रथमच जनतेतून निवडून आल्याने ग्रामपंचायतीवर सत्ता नेमकी कुणाची, यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. नाशिकचे तहसीलदार अनिल दौंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी शांततेत पार पडली.या निवडणुकीवर लोकसभा अचारसंहितेचे सावट असल्याने अनेक ग्रामपंचायतींना विजयानंतर मिरवणूक काढता आली नाही; मात्र काही ठिकाणी मिरवणुकीद्वारे जल्लोष करण्यात आला.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतNashikनाशिक