शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

ग्रामपंचायत प्रशासनाकडून बोअरवेल

By admin | Updated: May 20, 2017 00:50 IST

ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर ग्रामपंचायतीतर्फे पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून बोअरवेल केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर ग्रामपंचायतीतर्फे पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून बोअरवेल केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. येथील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे पाणी कमी झाल्याने गेल्या १५ दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे गावातील नागरिकांनी व महिलावर्गाने कळवण तालुका भाजपा उपाध्यक्ष आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयावर गेल्या मंगळवारी संतप्त महिलांचा हंडा मोर्चा निघाला होता. याबाबतचे वृत्त दि. १७ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावेळी मोरे यांनी येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा देऊ असा इशारा दिला होता. त्याची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दोन दिवसात मार्गी लावला. सरपंच दादाजी सुर्यवंशी, दादा मोरे, अशोक देशमुख, रविकांत सोनवणे, मोतीराम पवार, मंगेश देसाई यांनी तातडीने बोअरवेल करून जलपरी बसवली आणि विधिवत पूजा करून पाणी काढले. गेल्या पंधरा दिवसांपासून ओतूर गावात चार दिवसाआड पाणी येत होते. गावात प्रथमच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते व हंडा मोर्चाही निघाला होता. ग्रामपंचायतीने शेजारील शेतकऱ्यांच्या विहिरीही अधिग्रहित केल्या आहेत. तरीही पुरेसा पाणीपुरवठा होत नव्हता. गेल्या आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसल्यामुळे विहिरींच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. असे असले तरी कायमस्वरूपी पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. यावेळी ग्रामसेवक पवार, शांताराम पवार, मंगेश देसाई, भास्कर चित्रे, किरण मालपुरे आदि उपस्थित होते़