मालेगाव : येथील कॅम्प भागातील केशरी शिधा पत्रिकाधारकांना स्वस्त धान्य मिळावे, अशी मागणी जगदीश गोऱ्हे यांनी धान्य पुरवठा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. महागाईच्या वणव्यात होरपळत असलेल्या या शिधा पत्रिकाधारकांना गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून स्वस्त धान्य मिळत नसल्याचे आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या लाभार्थींना पूर्वी १० किलो गहू व ५ किलो तांदूळ दिला जात होता. त्यात कपात करण्यात येऊन प्रत्येक धारकाला ३.५ गहू व ३ किलो तांदूळ वाटप केले जात असल्याने त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे. त्यात हे धान्यही वेळेवर मिळत नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ येत आहे. सदर शिधापत्रिका धारकांना नियमित धान्य मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
केशरी शिधापत्रिकांवरील धान्य बंद
By admin | Updated: June 7, 2014 00:33 IST