शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

कांदा, लसणाच्या नवीन वाणाला सरकारची मान्यता- पी.के. गुप्ता : चितेगाव राष्ट्रीय बागवानी अनुसंधान केंद्रात मार्गदर्शन शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 13:27 IST

कसबे-सुकेणे: - चांगली गुणवत्ता असणारे कांदा व लसुण यांचे बीज राष्ट्रीय बागवानी प्रतिष्ठानने विकसित केले असून यात कांद्याचे सोळा तर लसणाचे सोळा वाण आहेत. यातील १० कांदा वाण व लसणाच्या ६ वाणाला भारत सरकारने मान्यता दिली आहे ,असे प्रतिपादन एनएचआरडीएफचे संचालक डॉ पी. के. गुप्ता यांनी केले.

कसबे-सुकेणे: - चांगली गुणवत्ता असणारे कांदा व लसुण यांचे बीज राष्ट्रीय बागवानी प्रतिष्ठानने विकसित केले असून यात कांद्याचे सोळा तर लसणाचे सोळा वाण आहेत. यातील १० कांदा वाण व लसणाच्या ६ वाणाला भारत सरकारने मान्यता दिली आहे ,असे प्रतिपादन एनएचआरडीएफचे संचालक डॉ पी. के. गुप्ता यांनी केले. निफाड तालुक्यातील चितेगाव येथील कांदा,लसूण आणि बटाटा उत्पादक शेतकºयांसाठी दोन दिवसीय मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ.गुप्ता यांनी ही माहिती दिली . एच आर डी एफ अर्थात राष्ट्रीय बागवानी अनुसंधान आणि विकास प्रतिष्ठान या संस्थेला ४० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी द्राक्ष निर्यायदार संघाचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे होते. व्यासपीठावर नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील, संजय होळकर, यू. बी. पांडे., डॉ.एस. आर. भोंडे उपस्थित होते. यावेळी गुप्ता पुढे म्हणाले की, या शिबिराचा शेतकºयांनी फायदा करून घ्यावा आणि कांदा,लसूण व बटाटा या पिकांचे उत्पादन दुपटीने कसे वाढेल असा प्रयत्न करावा राजस्थानात पाण्याची कमतरता असल्याने कांद्याची गुणवत्ता मिळत नाही. त्यामुळे तिथे लाल कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी शेतकºयांना अशाच प्रकारचे शिबीर घेतले जाणार असल्याचे सांगितले आणि एखाद्या पिकाला भाव मिळाल्यावर सर्वच शेतकरी तेच पीक घेतात असे न करता वेगवेगळी पिके घ्यावीत असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील म्हणाले की, गेल्या २२ महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकरी तोट्यात कांदा विकत आहे . आता जो भाव कांद्याला मिळतोय तो परतीच्या पावसात इतर ठिकाणचा कांदा खराब झाल्याने माल शिल्लक नसल्याने भेटतो आहे असे स्पस्ट केले. यावेळी यु बी पांडे म्हणाले की, कांद्याचे भाव पडले त्यावर उपाययोजना करताना त्यावेळी ही संस्था स्थापन करण्यात आली. यापुढे लाल कांदाही साठवता येईल अशा प्रकारचे वाण विकसित केले आहे. उत्तर भारतात लाल कांद्याला चांगली पसंती आहे, राजस्थानमध्ये १८ हजार क्षेत्रावर कांदा पीक घेतले जाते असे ते म्हणाले. अध्यक्षीय मनोगतात जगन्नाथ खापरे यांनी रासायनिक खतामुळे जमीन खराब झाली असून सेंद्रिय खते वापरून शेती करावी असे आवाहन केले . या शिबिराला महाराष्ट्रासह राजस्थानातून आलेल्या २०० पेक्षा अधिक शेतकºयांनी सहभाग घेतला . चितेगाव केंद्राचे आर के सिंग यांनी सूत्रसंचालन केले तर शिल्पा फासे यांनी आभार मानले.

टॅग्स :Nashikनाशिक