शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ५०० लाभार्थ्यांना भोवला शासनाचा हलगर्जीपणा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 23:58 IST

नाशिक : राज्य शासनाने १०० टक्के अनुदानित तत्त्वावर शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा मागील वर्षी कालावधी संपल्यानंतर त्या जागी ११९ दिवस कोणत्याही विमा कंपनीची नियुक्ती न केल्याने या काळात राज्यातील सुमारे ४०० ते ५०० शेतकऱ्यांचे अपघात घडले. शासनाच्या केवळ हलगर्जीपणामुळे संबंधित शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याने त्यांना या योजनेचा लाभ मिळेल का? असा प्रश्न आता शेतकऱ्यांत उपस्थित होत आहे.

ठळक मुद्दे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ११९ दिवस खंडित

नाशिक : राज्य शासनाने १०० टक्के अनुदानित तत्त्वावर शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा मागील वर्षी कालावधी संपल्यानंतर त्या जागी ११९ दिवस कोणत्याही विमा कंपनीची नियुक्ती न केल्याने या काळात राज्यातील सुमारे ४०० ते ५०० शेतकऱ्यांचे अपघात घडले. शासनाच्या केवळ हलगर्जीपणामुळे संबंधित शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याने त्यांना या योजनेचा लाभ मिळेल का? असा प्रश्न आता शेतकऱ्यांत उपस्थित होत आहे.राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्ता अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणाने होणाऱ्या अपघातांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो अथवा अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीच्या अपघातामुळे कुटुंब अडचणीत येते. अशा अपघातग्रस्त कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी राज्यातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद असलेले शेतकरी व नोंद नसलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील एक सदस्य अशा १० ते ७५ वयोगटातील दोन जणांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार दि. १० डिसेंबर २०१९ ते ९ डिसेंबर २०२० असा पहिल्या वर्षाचा टप्पा होता. या कालावधीसाठी युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीची तसेच जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रायव्हेट लिमिटेड या विमा सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु योजनेचा कालावधी संपल्यानंतर दि. १० डिसेंबर २०२० ते ६ एप्रिल २०२१ या ११९ दिवसांपर्यंत शासनाने कोणत्याही विमा कंपनीची नियुक्ती केली नाही. त्यानंतर दि. ८ मार्च २०२१ च्या प्रशासकीय मान्यतेनुसार व दि. २४ मार्च २०२१ च्या वित्तीय मान्यतेनुसार दि. ७ एप्रिल २०२१ ते ६ एप्रिल २०२२ या कालावधीसाठी सुधारित स्वरूपातील गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना जाहीर करण्यात आली. या कालावधीसाठी विमा कंपनीची जबाबदारी पुन्हा युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीकडे तर विमा सल्लागार म्हणून मे. ॲक्झिलियम इन्शुरन्स ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मागील वर्षाचा कालावधी व आता नव्याने जाहीर करण्यात आलेला कालावधी यामधील ११९ दिवसांच्या खंडित कालावधीत पुण्याच्या सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात सुमारे ४०० ते ५०० शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये अपघाताच्या घटना घडल्या असून, अनेकांचे मृत्यूही झाले आहेत. शासनाने नव्याने आदेश काढताना केलेला हलगर्जीपणा किंवा दुर्लक्षामुळे हे शेतकरी विमा योजनेच्या संरक्षणापासून अथवा भरपाईपासून वंचित राहिलेले आहेत. त्या शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना क्लेम मंजूर करुन न्याय देण्यात यावा, असे साकडे अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे घातले आहे.अपघातग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना सुरू केलेली आहे. ही योजना अखंडित ठेवताना शासनाच्याच दुर्लक्षामुळे ११९ दिवसांचा खंड पडला आहे. यादरम्यान राज्यात जे अपघात घडले, त्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत क्लेम मंजूर करून मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा.- प्रभाकर बेलोटे, शेतकरी, पंचाळे, ता. सिन्नर

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार