शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

सरकार, उघड आता देवाचे द्वार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 17:16 IST

त्र्यंबकेश्वर : श्रावणमास सुरू होऊनही राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार मंदिरे खुली करीत नसल्याच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने साधू-महंतांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर रस्त्यावरच रूद्राभिषेक तसेच घंटा-शंखनाद करीत आंदोलन करण्यात आले. ह्यमंदिर बंद, उघडले बार, उद्धवा...धुंद तुझे सरकारह्ण असे फलक झळकावत व शासनाचा निषेध करीत यावेळी निदर्शने करण्यात आली. दरम्यान, त्र्यंबकेश्वर शहरात पोलिसांकडून संचारबंदी लागू करण्यात आली असून भाविकांना मंदिर परिसरात गर्दी करण्यास मनाई केली जात आहे.

त्र्यंबकेश्वर : श्रावणमास सुरू होऊनही राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार मंदिरे खुली करीत नसल्याच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने साधू-महंतांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर रस्त्यावरच रूद्राभिषेक तसेच घंटा-शंखनाद करीत आंदोलन करण्यात आले. ह्यमंदिर बंद, उघडले बार, उद्धवा...धुंद तुझे सरकारह्ण असे फलक झळकावत व शासनाचा निषेध करीत यावेळी निदर्शने करण्यात आली. दरम्यान, त्र्यंबकेश्वर शहरात पोलिसांकडून संचारबंदी लागू करण्यात आली असून भाविकांना मंदिर परिसरात गर्दी करण्यास मनाई केली जात आहे.कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून राज्यातील धार्मिक स्थळे बंद आहेत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना सर्व मंदिरे खुली करण्यात यावीत यासाठी भाजपाने यापूर्वी वारंवार आंदोलन केली आहेत. आता श्रावणमास सुरू झाल्याने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराचे दरवाजे भाविकांना खुले करण्यात यावेत, या मागणीसाठी भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंदिराच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यावरच ठाण मांडत रुद्राभिषेक करीत सरकारला सुबुद्धी सुचावी याकरीता त्र्यंबकराजाला प्रार्थना करण्यात आली. याचवेळी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. शंख व घंटानाद करीत सरकारचे मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात महिलावर्गही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाला होता. पंचायती आनंद अखाड्याचे सचिव तथा अखिल भारतीय अखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष श्रीमहंत शंकरानंद सरस्वती यांनी सांगितले, एकाच देशात काही राज्यात मंदिरे, धार्मिक स्थळे खुली आहेत तर महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे बंद आहेत. ही कुठली अराजकता आहे? सर्व लोक मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने मंदिर बंद केल्याचे सांगतात. त्यांचे पिताश्री कायम भगवे वस्त्र परिधान करून हिंदू धर्माचे समर्थन करत होते. पण उद्धव ठाकरे यांनी ऐन श्रावण महिन्यात देखील प्रार्थना स्थळे कोविडच्या नावाखाली बंद करून ठेवली आहेत, असे सांगत श्रीमहंत शंकरानंद सरस्वती यांनी संचारबंदीलाही आक्षेप घेतला. दरम्यान, पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी मंदिराबाहेर गर्दी केली होती. यावेळी पोलिसांनी बॅरिकेडींग केल्याने भाविक व पोलिसांत वादविवादाचेही प्रसंग पाहायला मिळाले. गावात संचारबंदी लागू केली असली तरी सर्व दुकाने सुरू होती.--------------------भारतातील अनेक राज्यातील धार्मिक स्थळे उघडली असतांना महाराष्ट्र सरकार धार्मिक, प्रार्थना स्थळे उघडण्यास परवानगी का देत नाही? बियर बार, दारू दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाते, मंदिरे नाही. हा अन्याय सहन केला जाणार नाही. श्रावण महिना म्हणजे हिंदू धर्मातील सर्वात जास्त सणावारांचा, व्रत वैकल्याचा महिना असतांना निदान श्रावण महिन्यात तरी मंदिर उघडेल अशी अपेक्षा होती. पण महाराष्ट्र सरकार हिंदुत्व विरोधी असल्याचे यातून स्पष्ट होते.- आचार्य तुषार भोसले, प्रमुख, भाजपा अध्यात्मिक आघाडी

टॅग्स :Nashikनाशिक