शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

शासकीय यंत्रणा सुस्तावली : कारवाई करणारे गेले कुठे, याचा सर्वांना प्रश्न पुन्हा प्रदूषित गोदामाई, तरी कुणा पर्वा नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:08 IST

दक्षिण गंगा गोदावरीचे पावित्र्य नष्ट होत चालले आहे. कचरा आणि मलजल घेत गोदामाई प्रवाहित होत असताना तिच्या या प्रदूषणकारी रूपाविषयी श्रद्धाळू व्यथित होत असून सरकारी यंत्रणा मात्र मूकपणे बघत आहेत.

ठळक मुद्देसारी यंत्रणाच सुस्तावलेली प्रदूषणकारी रूप खूपच विदारक यंत्रणा पुन्हा ढसाळ झाल्या

नाशिक : दक्षिण गंगा गोदावरीचे पावित्र्य नष्ट होत चालले आहे. कचरा आणि मलजल घेत गोदामाई प्रवाहित होत असताना तिच्या या प्रदूषणकारी रूपाविषयी श्रद्धाळू व्यथित होत असून सरकारी यंत्रणा मात्र मूकपणे बघत आहेत. गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीसाठी लढणारे आणि काही तरी केल्याचे आव आणणारे सारेच कुठे गेले, हे मात्र दिसत नाही. विशेषत: गोदावरी प्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील सुनावणी संपल्याने सारी यंत्रणाच सुस्तावलेली असून, गोदावरीवरील हिरवा थर असो की तपोवनात निर्माण होणारा फेस असो, त्याची दखल घेण्यास कोणीही तयार नाही.गोदावरी नदीचे वर्षानुवर्षे प्रदूषण वाढत आहे. धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या गोदावरीचे होत असलेले प्रदूषणकारी रूप खूपच विदारक होत आहे. गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा गेल्या काही वर्षांत पर्यावरणप्रेमींच्या आक्रमकतेने हा प्रश्न लक्षवेधी ठरला आणि न्यायालयात तो मांडला गेल्यानंतर न्यायालयाने काही सूचना केल्या त्यानुरूप काही उपाययोजना झाल्या. परंतु गोदावरी शंभर टक्के गोदा प्रदूषणमुक्त झालीच नाही किंबहुना जोपर्यंत न्यायालयात हे प्रकरण प्रविष्ट होते तोपर्यंत महापालिका, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, जलसंपदा विभाग तसेच पोलीस यंत्रणा, औद्योगिक विकास महामंडळ आणि राज्य शासन सारेच सजग होते. परंतु आता या खटल्याच्या निकालाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे यंत्रणा पुन्हा ढसाळ झाल्या आहेत.गेल्या काही महिन्यांपासून गोदावरी नदीवर हिरवा थर जमा झाला आहे. कुंभमेळ्यातील प्लॅस्टिक बंदी कागदावरच राहिली आहे. गोदाकाठी सर्व प्रकारची घाण-कचरा साचला आहे. निर्माल्य कलश भरून वाहत आहेत, परंतु ते उचलण्याची तसदी कोणी घेत नाही. नदीपात्रात कचरा टाकणाºयांवर गुन्हे दाखल करणारे पोलीस केव्हाच गायब झाले आहेत, तर सिक्युरिटी नावालाच आहेत. त्यामुळे आता गोदावरी विषयीची कळकळ आणि संवेदना संपली काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.गोदावरीने का पांघरली हिरवी शाल?गोदापात्रावर सध्या हिरव्या वनस्पती उगवल्या असून, त्यामुळेच प्रदूषण पुन्हा एकदा अधोरेखित होऊ लागले आहे. सध्या गोदावरी नदीचे पाणी प्रवाहित नाही. ते साचलेले किंवा तुंबलेले आहे. त्यातच प्रदूषणकारी घटकांची सतत भर पडत असल्याने अशाप्रकारच्या वनस्पती उगवल्या आहेत, असे तज्ज्ञांनी सांगितले. तथापि, यावर उपाय म्हणून महापालिका, जलसंपदा विभाग आणि जिल्हाधिकारी यांनी एकत्रितरीत्या पाणी प्रवाही करण्याचा प्रयत्न करावा, शक्य असल्यास पाणी सोडावे, अशी सूचनादेखील अभ्यासकांनी केली आहे.