शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

पर्यटनपुरक व्यवसायाला मिळणार शासकिय कर्ज; पर्यटनाला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 20:22 IST

सरकारच्या वतीने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून इच्छुकांना अर्थसहाय्यही उपलब्ध असल्याचे प्रतिपादन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सुनील काचे यांनी केले.

ठळक मुद्दे ५० हजारापासून तर पाच लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकतेराज्य शासनाच्या विविध महामंडळांच्या माध्यमातून गरजू प्रशिक्षणार्थ्यांना तसेच व्यवसाय इच्छेुकांना शासकीय क र्ज सुविधामहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून इच्छुकांना अर्थसहाय्यही उपलब्ध

नाशिक : सुशिक्षित बेरोजगार असलेल्या तरुणांना पर्यटन व्यवसायात रोजगाराला वाव आहे. ट्रॅव्हल्स व्यवसाय हा पर्यटनाला पूरक असा असून, या व्यवसायासाठी सरकारच्या वतीने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून इच्छुकांना अर्थसहाय्यही उपलब्ध असल्याचे प्रतिपादन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सुनील काचे यांनी केले.जागतिक पर्यटन दिनानिमित्त ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन आॅफ नाशिक व ईजी सोल्युशन अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पर्यटन : विकास व संधी’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी (दि.२७) मखमलाबाद रस्त्यावरील ग्रीन लॅन्ड रिसॉर्ट येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी पाहुणे म्हणून व्यासपीठावर पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे, महाराष्टÑ कौशल्य व उद्योजकता विकास संचलनालयाचे उपसंचालक सुनील सैंदाणे, सारंगखेड्याचे सरपंच जयपाल रावल उपस्थित होते. यावेळी काचे म्हणाले, राज्य शासनाच्या विविध महामंडळांच्या माध्यमातून गरजू प्रशिक्षणार्थ्यांना तसेच व्यवसाय इच्छेुकांना शासकीय क र्ज सुविधा उपलब्ध आहेत. याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, कर्ज प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन केले. लाभार्थ्यांना ५० हजारापासून तर पाच लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकते. याकरिता प्रकल्प अहवाल, व्यावसायिकता, प्रामाणिकपणा, जिद्द-चिकाटी आदिंची गरज असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, मुंडावरे यांनी राज्य पर्यटन महामंडळाकडून राज्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. ‘तान’चे दत्ता भालेराव यांनी ‘नाशिक : कृषी पर्यटनाच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांना पर्यटन अभ्यासक्रम, व्यक्तिमत्त्व विकास, संभाषण कौशल्य, पर्यटनाचे धडे देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरुणाईला योग्य दिशा दाखविल्यास बेरोजगारीला आळा बसेल, असे अकादमीचे प्रशिक्षक सागर धर्माधिकारी यांनी सांगितले. जयेश तळेगावकर यांनी वाइन पर्यटन याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी विविध राज्यांमधील पोशाख परिधान करून विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती.