शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
2
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
3
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
4
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
5
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
6
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
7
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
8
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
9
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
10
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
11
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
12
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
13
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
14
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
15
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
16
"बँक खात्यात ५ लाख आले, तरीही म्हणाला आणखी पैसे लागतील"; डॉ. आदिलच्या whatsApp चॅटमध्ये काय काय?
17
केरळ, यूपीसह अनेक राज्यात SIR ला आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मागितले उत्तर...
18
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
19
Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
20
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी आकडेवारीत कुपोषणाची सत्यता लपविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 01:33 IST

सरकारी यंत्रणांकडून आदिवासींच्या कुपोषणाचे सर्वेक्षण करताना सरकारी आकडेवारीतील सत्यता लपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप करतानाच मेळघाटात महान संस्थेच्या माध्यमातून अनेक सहकाऱ्यांनी एकत्रित काम करीत शासकीय यंत्रणांना जमले नाही ते काम केल्याचे प्रतिपादन डॉ. आशिष सातव यांनी केले आहे.

ठळक मुद्देआशिष सातव : वसंत पवार स्मृती पुरस्काराने सातव दाम्पत्याचा सन्मान

नाशिक : सरकारी यंत्रणांकडून आदिवासींच्या कुपोषणाचे सर्वेक्षण करताना सरकारी आकडेवारीतील सत्यता लपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप करतानाच मेळघाटात महान संस्थेच्या माध्यमातून अनेक सहकाऱ्यांनी एकत्रित काम करीत शासकीय यंत्रणांना जमले नाही ते काम केल्याचे प्रतिपादन डॉ. आशिष सातव यांनी केले आहे.नीलवसंत मेडिकल फाउंडेशन अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरतर्फे गुरुवारी (दि.११) योगदान सोहळ्यात माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या हस्ते डॉ. आशिष सातव आणि डॉ. कविता सातव दाम्पत्याचा ‘डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार २०१८’ प्रदान करून सन्मान करण्यात आला यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी माजीमंत्री विनायकदादा पाटील यांच्यासह के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, सरचिटणीस नीलिमा पवार, सचिव डॉ. सुनील ढिकले, शशिकांत जाधव, वसंत खैरनार आदी उपस्थित होते.डॉ. आशिष सातव म्हणाले, आदिवासींसाठी प्रामाणिकपणे काम करताना अ‍ॅट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल करण्याचे काम काही राजकीय व शासकीय यंत्रणेतील व्यक्तींनी केले. एकीकडे आपण चंद्रावर जात असताना दुसरीक डे आदिवासींचे कुपोषण देशातील वास्तविकतेचे दर्शन घडवित असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. कोट्यवधी रुपये खर्चूनही भारतात कुपोषण निर्मूलन होत नाही. त्यामुळे महान संस्थेच्या माध्यमातून मेळघाटातील उपोषण आणि त्याची वास्तविकता प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मांडल्याने २००५ मध्ये राजमाता जिजाऊ मशीनच्या माध्यमातून आदिवासींचे कुपोषण सर्वेक्षण होऊन सर्व आदिवासी भाग कुपोषित जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. अविनाश अहेर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. रमेश मंत्री यांनी केले. डॉ. प्राची पवार यांनी आभार मानले.रुग्णच आमचे देवस्थानमेळघाटातील वैद्यकीय सेवेच्या प्रवासाविषयी सांगताना महात्मा गांधीजी व विनोबा भावे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन जनसेवेचा मार्ग स्वीकारल्याचे सांगतानाच आता रुग्ण हेच देवस्थान आणि रुग्णसेवा पूजा बनल्याचे डॉ. आशिष सातव म्हणाले. तर आदिवासींच्या जीवन अज्ञान, अंधश्रद्धेने व्यापून टाकलेले असल्याने तेथे रुग्णसेवा करणे आव्हानात्मक होते; परंतु जसजसे उपचार सुरू केले तसतसे त्यांच्याशी आत्मियतेचे नाते निर्माण झाल्याचे डॉ. कविता सातव यांनी सांगितले.प्रत्येकाने स्वत:ची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडणे गरजेचे आहे. सैनिकांप्रमाणेच त्यांना लढण्यासाठी बळ देणाºया घटकाचा गौरव होणे आवश्यक असते. योगदान सोहळ्यातून डॉ. सातव दाम्पत्याच्या माध्यमातून मेळघाटात महान संस्थेच्या रुग्णसेवेत योगदान देणाºयांचाही सन्मान असल्याचे माजी मंत्री विनायकदादा पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिकdoctorडॉक्टर