शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
2
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
3
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
4
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
5
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
6
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
7
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
8
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
9
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
10
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
11
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
12
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
13
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
14
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
15
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
16
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
18
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
19
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
20
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!

शासनाचा निर्णय : सुमारे ३४ मद्यविक्रीच्या दुकानांना लाभ

By admin | Updated: May 31, 2017 00:54 IST

त्र्यंबक, दिंडोरी राज्यमार्ग महापालिकेकडे हस्तांतरित

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातून जाणाऱ्या राज्यमार्गावरील पाचशे मीटर अंतरावर असलेली मद्यविक्रीची दुकाने वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मद्यविक्रेत्यांच्या लॉबीपुढे अखेर शासन झुकले असून, शहरातून जाणारा डहाणू-त्र्यंबक-नाशिक हा ८ कि.मी लांबीचा तसेच नाशिक-दिंडोरी-वणी हा १०.७५० कि.मी. लांबीचा राज्य मार्ग महापालिकेकडे अवर्गीकृत (डिनोटीफाइड) करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे त्र्यंबक मार्गावरील सुमारे २५, तर दिंडोरी मार्गावरील सुमारे नऊ मद्यविक्रीच्या दुकानांचे शटर पुन्हा उघडण्यास मदत होणार आहे. राज्यमार्ग अवर्गीकृत करण्यास विरोध करणारी शिवसेना आता नेमकी काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागून असणार आहे. शहरातून जाणाऱ्या राज्यमार्गावरील पाचशे मीटर अंतरावर असलेली मद्यविक्रीची दुकाने वाचविण्यासाठी मद्यविक्रेत्यांच्या लॉबीकडून शासनस्तरावर जोरदार प्रयत्न सुरू होते. सदर रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासंबंधीचा ठराव जादा विषयाच्या माध्यमातून मागील दाराने घुसविण्याचा डावही आखला गेला होता. परंतु, तो फसला होता. दरम्यान, महापालिकेकडे महिनाभरापूर्वी राज्य शासनाने शहरातून जाणाऱ्या राज्य व राष्ट्रीय महामार्गांची माहिती मागविली होती. आयुक्तांनीही सदर मार्ग महापालिकेकडे हस्तांतरित करणे व्यवहार्य नसल्याची भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, मद्यविक्रेत्यांच्या लॉबीकडून शहरातील त्र्यंबकेश्वर ते डहाणू आणि दिंडोरीरोड या राज्य मार्गावरील दुकाने वाचविण्यासाठी धडपड सुरू होती. अखेर, शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने नाशिक विभागाच्या मुख्य अभियंत्याने दि. २५ एप्रिल २०१७ रोजी पाठविलेल्या प्रस्तावानुसार, त्र्यंबकेश्वर व दिंडोरी हे दोन राज्यमार्ग महापालिकेकडे अवर्गीकृत करण्यास मान्यता दिलेली आहे. शासन निर्णयानुसार, डहाणू-त्र्यंबक-नाशिक हा ८ कि.मी.चा राज्यमार्ग तसेच नाशिक-दिंडोरी-वणी हा १०.७५० कि.मी.चा राज्यमार्ग महापालिकेकडे अवर्गीकृत करण्यात आला आहे. त्यामुळे, सदर मार्ग महापालिकेकडे हस्तांतरित झाल्याने त्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे दायित्वही महापालिकेवर येऊन पडले आहे. शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्षशहरातून जाणारे राज्यमार्ग महापालिकेकडे अवर्गीकृत करण्यास शिवसेनेने यापूर्वीच विरोध दर्शविला आहे; मात्र सत्ताधारी भाजपाकडून कोणतीही भूमिका अधिकृतपणे स्पष्ट झालेली नव्हती, पालकमंत्र्यांनीही याबाबत तपासणी करूनच निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगत त्याबाबत संदिग्धता कायम ठेवली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्याने महिनाभरापूर्वीच सदर मार्गांचे अवगीकृत करणारा प्रस्ताव पाठविण्याबाबत दाखविलेली तत्परता आणि शासनानेही त्याची तितक्यात तत्परतेने घेतलेली दखल संशयाच्या घेऱ्यात अडकण्याबरोबरच चर्चेचाही विषय ठरली आहे. आता शिवसेना नेमकी काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून असणार आहे.