शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शासनाची कर्जमाफी फसवी

By admin | Updated: July 11, 2017 23:27 IST

राजू शेट्टी : किसानमुक्ती यात्रेचे दिंडोरीत स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी : सरकार निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन विसरले असून, राज्यात दिलेली कर्जमाफी ही फसवी आहे. त्यातील अटी कुणालाही मान्य नसून सरकारने दिलेल्या शब्दप्रमाणे सरकट कर्जमाफी दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. किसानमुक्ती यात्रेनिमित्त कर्नाटक, पंजाब, आंध्र प्रदेश आदींसह सुमारे आठ राज्यातील सुमारे दीडशे ते दोनशे शेतकरी आपल्या तीस ते चाळीस वाहनांसह गुजरात राज्यात रवाना झाले.यावेळी दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड येथे आमदार नरहरी झिरवाळ यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी यात्रेचे स्वागत केले. त्यावेळी शेट्टी बोलत होते. ते म्हणाले, शेतकरीवर्गाने केलेला संप हा ऐतिहासिक होता. यशस्वी संपानंतर अपेक्षित असे परिणाम मिळायला हवे असताना तसे काही घडले नाही.यावेळी दत्तात्रय पाटील, गंगाधर निखाडे, संदीप जगताप, डॉ. अनिल सातपुते, हृषिकेश पडोळ, सदानंद शिवले, योगेश गोसावी, भास्कर भगरे, सोमनाथ जाधव, नितीन देशमुख आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते. यावेळी कवी संदीप जगताप त्यांनी संप काळात केलेल्या कवितांबद्दल राजू शेट्टी यांनी अभिनंदन करत दिल्ली जंतरमंतर येथील आंदोलनात सहभागी व्हावे व आपल्या कवितेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडाव्यात, असे सांगितले. यात्रेसमवेत मंदसौरमधील प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांच्या सहा प्रतिमा व अस्थिकलश आहेत. ही यात्रा मध्य प्रदेशातील मंदासौर येथून सुरू होऊन नाशिक जिल्ह्यातून गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणामार्गे दि. १८ जुलै रोजी दिल्ली येथे पोहचणार आहे. योगेंद्र यादव यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली व नाशिक जिल्ह्यातून शेतकरी आंदोलनाची सुरुवात यशस्वी झाली असून, आता सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्णच कराव्या लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.