शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

शासनाची कर्जमाफी फसवी

By admin | Updated: July 11, 2017 23:27 IST

राजू शेट्टी : किसानमुक्ती यात्रेचे दिंडोरीत स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी : सरकार निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन विसरले असून, राज्यात दिलेली कर्जमाफी ही फसवी आहे. त्यातील अटी कुणालाही मान्य नसून सरकारने दिलेल्या शब्दप्रमाणे सरकट कर्जमाफी दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. किसानमुक्ती यात्रेनिमित्त कर्नाटक, पंजाब, आंध्र प्रदेश आदींसह सुमारे आठ राज्यातील सुमारे दीडशे ते दोनशे शेतकरी आपल्या तीस ते चाळीस वाहनांसह गुजरात राज्यात रवाना झाले.यावेळी दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड येथे आमदार नरहरी झिरवाळ यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी यात्रेचे स्वागत केले. त्यावेळी शेट्टी बोलत होते. ते म्हणाले, शेतकरीवर्गाने केलेला संप हा ऐतिहासिक होता. यशस्वी संपानंतर अपेक्षित असे परिणाम मिळायला हवे असताना तसे काही घडले नाही.यावेळी दत्तात्रय पाटील, गंगाधर निखाडे, संदीप जगताप, डॉ. अनिल सातपुते, हृषिकेश पडोळ, सदानंद शिवले, योगेश गोसावी, भास्कर भगरे, सोमनाथ जाधव, नितीन देशमुख आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते. यावेळी कवी संदीप जगताप त्यांनी संप काळात केलेल्या कवितांबद्दल राजू शेट्टी यांनी अभिनंदन करत दिल्ली जंतरमंतर येथील आंदोलनात सहभागी व्हावे व आपल्या कवितेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडाव्यात, असे सांगितले. यात्रेसमवेत मंदसौरमधील प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांच्या सहा प्रतिमा व अस्थिकलश आहेत. ही यात्रा मध्य प्रदेशातील मंदासौर येथून सुरू होऊन नाशिक जिल्ह्यातून गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणामार्गे दि. १८ जुलै रोजी दिल्ली येथे पोहचणार आहे. योगेंद्र यादव यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली व नाशिक जिल्ह्यातून शेतकरी आंदोलनाची सुरुवात यशस्वी झाली असून, आता सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्णच कराव्या लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.