शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय महामंडळात नाशिकला ठेंगा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 23:58 IST

नाशिक : चार वर्षांपूर्वी राज्यातील सत्तांतरात व त्यातही नाशिकमधून तीन आमदार, एक खासदार निवडीत महत्त्वाची भूमिका बजावण्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाची सत्ता स्थापन करण्याचे श्रेय आपल्याकडे घेणाऱ्या जिल्ह्यातील कथित नेत्यांपैकी एकाचीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय महामंडळावर नियुक्ती न केल्याने सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह मित्रपक्ष शिवसेनेत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देभाजपासह सेनाही नाराज : इच्छुकांचा हिरमोड

नाशिक : चार वर्षांपूर्वी राज्यातील सत्तांतरात व त्यातही नाशिकमधून तीन आमदार, एक खासदार निवडीत महत्त्वाची भूमिका बजावण्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाची सत्ता स्थापन करण्याचे श्रेय आपल्याकडे घेणाऱ्या जिल्ह्यातील कथित नेत्यांपैकी एकाचीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय महामंडळावर नियुक्ती न केल्याने सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह मित्रपक्ष शिवसेनेत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.राज्यातील सत्तांतरानंतर जिल्ह्यातील राष्टÑवादी, कॉँग्रेसच्या अनेक नेत्या, कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्ष व शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर या दोन्ही पक्षांचे बळ वाढल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा-सेनेला त्याचा लाभ झाला. परिणामी जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, सहकारी संस्थांमध्ये सत्तांतर घडले. यात आजी-माजी आमदार, खासदार, पदाधिकाºयांनी किंगमेकरची भूमिका बजावल्यामुळे साहजिकच त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पक्षाकडून न्याय मिळेल, अशी आशा बांधण्यात आली. तर शहरातील तिन्ही आमदारांना अधूनमधून मंत्रिपदाचे स्वप्न पडून ते भंग होत असल्याचे पाहून त्यांच्या समर्थकांकडून शासकीय महामंडळाचा लालदिवा मिळणार असल्याचा छातीठोक दावा केला गेला तर माजी आमदारांनाही त्यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेऊन काही तरी पदरात पडेल, अशी अपेक्षा होती. त्यासाठी वरचेवर मुंबई वाºया करून फिल्ंिडगही लावण्यात येत होती. याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच जिल्हा बॅँक व अन्य सहकारी संस्था ताब्यात घेण्यासाठी परिश्रम घेणाºयांच्याही तोंडाला पाने पुसण्यात आली.या महामंडळांच्या नियुक्तीत सेनेला डावलल्याची भावना व्यक्त केली जात असली तरी,सेनेच्या पदरात जे काही पडले त्यातील काही महामंडळांच्या माध्यमातून नाशिकच्या सेना नेतृत्वाला न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती; परंतु त्यांच्याही पदरी निराशा पडली आहे.शासकीय महामंडळावरील नियुक्ती पाच वर्षांसाठी किंवा पुढील आदेश होईपर्यंत असली तरी, राज्यातील सत्तांतरानंतर नवीन सरकारकडून या नियुक्त्या रद्द करण्याचा प्रघात असल्यामुळे महामंडळांवरील नियुक्त्या औट घटकेच्या मानल्या जात आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्यातील २१ विविध शासकीय महामंडळांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली. त्यात नाशिक जिल्ह्यातील एकाही भाजपा-सेनेच्या पदाधिकारी, नेत्याचे नाव नसल्याने दोन्ही पक्षाच्या इच्छुकांचे चेहरे काळवंडले आहेत. खासगीत पक्षाने विश्वासघात केल्याचा आरोप करताना अनेकांनी शनिवारी मुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्षांकडे आपली नाराजीही बोलून दाखविल्याचे समजते.