शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

शासनाने बदलले वार्षिक पर्जन्यमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 00:34 IST

नाशिक : केंद्र सरकारने दुष्काळ जाहीर करण्याचे निकष निश्चित करताना प्रत्येक तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान गृहीत धरण्याची अट निश्चित केली आहे, मात्र गेल्या चौदा वर्षांपासून राज्यातील तालुकानिहाय पर्जन्यमान ‘जैसे थे’ असल्याने राज्य सरकारने यंदापासून पर्जन्यमानात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक : केंद्र सरकारने दुष्काळ जाहीर करण्याचे निकष निश्चित करताना प्रत्येक तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान गृहीत धरण्याची अट निश्चित केली आहे, मात्र गेल्या चौदा वर्षांपासून राज्यातील तालुकानिहाय पर्जन्यमान ‘जैसे थे’ असल्याने राज्य सरकारने यंदापासून पर्जन्यमानात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांच्या पर्जन्यमानात मोठी वाढ करण्यात आली तर जिल्ह्याच्या सरासरीमध्ये मात्र काही मिलीमीटरची घट दर्शविली आहे.गेल्या वर्षी राज्यात सर्वदूर सरासरीपेक्षाही अधिक पाऊस झाला. त्यामुळे काही ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत होती. परंतु केंद्र सरकारने दुष्काळाची व्याख्या ठरवितांना जे काही निकष ठरवून दिले आहेत ते पाहता अनेकदा राज्य सरकारची अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे राज्याच्या महसूूल व वन विभागाने राज्यातील तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान निश्चित करण्यात आले असून, यापूर्वी चौदा वर्षांपूर्वी सरासरी पर्जन्यमान निश्चित करण्यात आली होती. त्यात आता नव्याने बदल करण्यात आला आहे. हा बदल करताना सन १९६१ ते २०१० या काळात तालुकानिहाय झालेल्या पावसाची सरासरी विचारात घेण्यात आली आहे.पुण्याच्या मोसम विभागाने पर्जन्यमान निश्चित केले असून, यापुढे राज्य, जिल्हा व तालुकानिहाय सरासरी पर्जन्यमान नवीन निर्णयानुसार गृहीत धरण्यात यावे, असे शासनाचे आदेश आहेत.या बदलामध्ये पेठ, त्र्यंबक, इगतपुरी या पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यांच्या पर्जन्यमानात घट दाखविण्यात आली असून, कायमदुष्काळी म्हणून गणल्या गेलेल्या अन्य तालुक्यांच्या पर्जन्यमानात वाढ दर्शविण्यात आली आहे.

टॅग्स :Rainपाऊस