शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने बदलले वार्षिक पर्जन्यमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 00:34 IST

नाशिक : केंद्र सरकारने दुष्काळ जाहीर करण्याचे निकष निश्चित करताना प्रत्येक तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान गृहीत धरण्याची अट निश्चित केली आहे, मात्र गेल्या चौदा वर्षांपासून राज्यातील तालुकानिहाय पर्जन्यमान ‘जैसे थे’ असल्याने राज्य सरकारने यंदापासून पर्जन्यमानात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक : केंद्र सरकारने दुष्काळ जाहीर करण्याचे निकष निश्चित करताना प्रत्येक तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान गृहीत धरण्याची अट निश्चित केली आहे, मात्र गेल्या चौदा वर्षांपासून राज्यातील तालुकानिहाय पर्जन्यमान ‘जैसे थे’ असल्याने राज्य सरकारने यंदापासून पर्जन्यमानात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांच्या पर्जन्यमानात मोठी वाढ करण्यात आली तर जिल्ह्याच्या सरासरीमध्ये मात्र काही मिलीमीटरची घट दर्शविली आहे.गेल्या वर्षी राज्यात सर्वदूर सरासरीपेक्षाही अधिक पाऊस झाला. त्यामुळे काही ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत होती. परंतु केंद्र सरकारने दुष्काळाची व्याख्या ठरवितांना जे काही निकष ठरवून दिले आहेत ते पाहता अनेकदा राज्य सरकारची अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे राज्याच्या महसूूल व वन विभागाने राज्यातील तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान निश्चित करण्यात आले असून, यापूर्वी चौदा वर्षांपूर्वी सरासरी पर्जन्यमान निश्चित करण्यात आली होती. त्यात आता नव्याने बदल करण्यात आला आहे. हा बदल करताना सन १९६१ ते २०१० या काळात तालुकानिहाय झालेल्या पावसाची सरासरी विचारात घेण्यात आली आहे.पुण्याच्या मोसम विभागाने पर्जन्यमान निश्चित केले असून, यापुढे राज्य, जिल्हा व तालुकानिहाय सरासरी पर्जन्यमान नवीन निर्णयानुसार गृहीत धरण्यात यावे, असे शासनाचे आदेश आहेत.या बदलामध्ये पेठ, त्र्यंबक, इगतपुरी या पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यांच्या पर्जन्यमानात घट दाखविण्यात आली असून, कायमदुष्काळी म्हणून गणल्या गेलेल्या अन्य तालुक्यांच्या पर्जन्यमानात वाढ दर्शविण्यात आली आहे.

टॅग्स :Rainपाऊस