शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

शासनाने बदलले वार्षिक पर्जन्यमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 00:34 IST

नाशिक : केंद्र सरकारने दुष्काळ जाहीर करण्याचे निकष निश्चित करताना प्रत्येक तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान गृहीत धरण्याची अट निश्चित केली आहे, मात्र गेल्या चौदा वर्षांपासून राज्यातील तालुकानिहाय पर्जन्यमान ‘जैसे थे’ असल्याने राज्य सरकारने यंदापासून पर्जन्यमानात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक : केंद्र सरकारने दुष्काळ जाहीर करण्याचे निकष निश्चित करताना प्रत्येक तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान गृहीत धरण्याची अट निश्चित केली आहे, मात्र गेल्या चौदा वर्षांपासून राज्यातील तालुकानिहाय पर्जन्यमान ‘जैसे थे’ असल्याने राज्य सरकारने यंदापासून पर्जन्यमानात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांच्या पर्जन्यमानात मोठी वाढ करण्यात आली तर जिल्ह्याच्या सरासरीमध्ये मात्र काही मिलीमीटरची घट दर्शविली आहे.गेल्या वर्षी राज्यात सर्वदूर सरासरीपेक्षाही अधिक पाऊस झाला. त्यामुळे काही ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत होती. परंतु केंद्र सरकारने दुष्काळाची व्याख्या ठरवितांना जे काही निकष ठरवून दिले आहेत ते पाहता अनेकदा राज्य सरकारची अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे राज्याच्या महसूूल व वन विभागाने राज्यातील तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान निश्चित करण्यात आले असून, यापूर्वी चौदा वर्षांपूर्वी सरासरी पर्जन्यमान निश्चित करण्यात आली होती. त्यात आता नव्याने बदल करण्यात आला आहे. हा बदल करताना सन १९६१ ते २०१० या काळात तालुकानिहाय झालेल्या पावसाची सरासरी विचारात घेण्यात आली आहे.पुण्याच्या मोसम विभागाने पर्जन्यमान निश्चित केले असून, यापुढे राज्य, जिल्हा व तालुकानिहाय सरासरी पर्जन्यमान नवीन निर्णयानुसार गृहीत धरण्यात यावे, असे शासनाचे आदेश आहेत.या बदलामध्ये पेठ, त्र्यंबक, इगतपुरी या पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यांच्या पर्जन्यमानात घट दाखविण्यात आली असून, कायमदुष्काळी म्हणून गणल्या गेलेल्या अन्य तालुक्यांच्या पर्जन्यमानात वाढ दर्शविण्यात आली आहे.

टॅग्स :Rainपाऊस