शहरं
Join us  
Trending Stories
1
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
2
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
3
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
4
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
5
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
6
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
7
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
8
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
9
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
10
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
11
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
12
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
13
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
14
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
15
पाक हेर ज्योती व ओडिशाच्या यूट्यूबरच्या संबंधाची चौकशी
16
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
17
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
18
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
19
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
20
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी

By admin | Updated: August 7, 2016 23:51 IST

पालकमंत्री : खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी

नाशिक : सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, लासलगाव बाजार समितीच्या प्रकरणाची चौकशी करून गुन्हे मागे घेतले जातील. शासन निर्णयानुसारच लिलावप्रक्रिया राबविणे व्यापाऱ्यांवर बंधनकारक असून व्यापारीवर्गाचे आडमुठे धोरण खपवून घेतले जाणार नाही असे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.शासकीय विश्रामगृहावर अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीसाठी महाजन आले असता निफाड तालुक्यातील लासलगाव बाजार समितीच्या सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली. अहमदनगरसह इतर जिल्ह्यांच्या धर्तीवर नाशिक जिल्ह्यांमधील बाजार समित्यांमध्ये लिलावप्रक्रिया राबविली जावी या मागणीसाठी लासलगाव बाजार समिती परिसरात शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. यावेळी पोलिसांनी लाठीमार करून आंदोलन मोडून काढळ्याने शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे व तत्काळ सर्व बाजार समित्यांमधील कामकाज सुरळीत करून अहमदनगरच्या धर्तीवर लिलावाची प्रक्रिया राबविणे व्यापाऱ्यांवर बंधनकारक करावे अशी मागणी जमलेल्या शेतकऱ्यांनी महाजन यांच्याकडे केली आहे. यावेळी नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील, बाबासाहेब गुजर, राजाभाऊ दरेकर, रमेश शिंदे, प्रमोद गायकवाड आदिंसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बाजार समिती प्रशासनाकडून पाठराखणलासलगाव बाजार समितीमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व शेतकरी वेठीस धरल्यानंतर कोणीही व्यापारी, समितीचे पदाधिकारी चर्चेसाठी आले नाही. त्यानंतर संध्याकाळी शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला, तर प्रवेशद्वार बंद करून घेण्यात आले. व्यापाऱ्यांच्या आडमुठे धोरणाला बाजार समित्यांच्या प्रशासनकडून साथ मिळत असल्याचा आरोपही यावेळी शेतकऱ्यांनी महाजन यांच्याशी बोलताना केला. आडतमुक्तीचा शासनाचा निर्णय व्यापाऱ्यांना मान्य नसल्यामुळे ते लिलावप्रक्रिया खोळंबून शेतकऱ्यांची पिळवणूक करत असल्याने नानासाहेब पाटील यांनी सांगितले.