शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

शासनाचा प्रशासनावर अंकु श नाही : हर्षवर्धन पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:11 IST

पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्राने अनेक सत्तांतरे अनुभवली आहेत; परंतु सद्यस्थितीत राज्याची कोणत्याही क्षेत्रात प्रगती होत नसताना सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावरही अंकुश नसल्याने राज्य सैरावैरा झाल्याची टीका माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

नाशिक : पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्राने अनेक सत्तांतरे अनुभवली आहेत; परंतु सद्यस्थितीत राज्याची कोणत्याही क्षेत्रात प्रगती होत नसताना सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावरही अंकुश नसल्याने राज्य सैरावैरा झाल्याची टीका माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.नाशिक जिल्हा जैन सांस्कृतिक कला फाउंडेशन व श्री जैन सेवा कार्य समिती यांच्यातर्फे भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात बुधवारी (दि. २८) उद्घाटन झाले. व्यासपीठावर माजी आमदार जयप्रकाश छाजेड, नगरसेवक हेमलता पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, शांतीलाल दुग्गड, मोहनलाल लोढा, डॉ. विक्रम शाह आदी उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील म्हणाले, सध्याची राजकीय स्थिती पाहता महाराष्ट्रात राजकीय चित्र फारसे आशादायी नाही. स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या सत्ताधाºयांनी विरोधकांचा सन्मान करून देशातील लोकशाही सुदृढ केली. त्यामुळे जगभरात भारतीय लोकशाही सर्वात प्रबळ आहे. परंतु सध्याच्या सत्ताधाºयांनी संसदीय प्रोटोकॉल बुकचे कधी वाचनच केले नसल्याचे दिसते आहे. त्यामुळे सरकारचा प्रशासनावर वचक उरलेला नाही. विरोधी पक्षांना विश्वासात न घेता निर्णय घेत सत्ताधाºयांकडून त्यांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न होतो आहे.  हा राजकीय द्वेष पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय आहे. कदाचित सत्तेचे हे चक्र फिरते असल्याचा सध्याच्या सत्ताधाºयांना विसर पडला असल्याचा टोलाही हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला लगावला. दरम्यान, डॉ. विक्रम शाह यांच्या ‘जिनश्वर पूजा’ या पुस्तकाचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन गौतम सुराणा यांनी केले.काम ठप्प पडल्याने वाढले उंदीरमंत्रालयाची अवस्था अनेक दिवसांपासून बंद पडलेल्या घरासारखी झाली आहे. सरकारचे प्रशासनावर नियंत्रण उरले नसल्याने मंत्रालयात कोणतेही काम होत नसून अनेक दिवस फाईली पडून राहिल्यानेच मंत्रालयात उंदीर वाढल्याची बोचरी टीकाही हर्षवर्धन पाटील यांनी राज्य सरकारवर केली.ाजेड यांची खोचक टीकामाजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनीही राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता व्याख्यानमालेचा विषय ‘महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा’ असा ठेवण्याऐवजी ‘महाराष्ट्राच्या राजकारणाची दुर्दशा’ असा ठेवला असता तर तो अधिक संयुक्तिक ठरला असता, अशी खोचक टीका त्यांनी राज्य सरकारवर केली.

टॅग्स :Nashikनाशिक