शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचा प्रशासनावर अंकु श नाही : हर्षवर्धन पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:11 IST

पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्राने अनेक सत्तांतरे अनुभवली आहेत; परंतु सद्यस्थितीत राज्याची कोणत्याही क्षेत्रात प्रगती होत नसताना सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावरही अंकुश नसल्याने राज्य सैरावैरा झाल्याची टीका माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

नाशिक : पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्राने अनेक सत्तांतरे अनुभवली आहेत; परंतु सद्यस्थितीत राज्याची कोणत्याही क्षेत्रात प्रगती होत नसताना सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावरही अंकुश नसल्याने राज्य सैरावैरा झाल्याची टीका माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.नाशिक जिल्हा जैन सांस्कृतिक कला फाउंडेशन व श्री जैन सेवा कार्य समिती यांच्यातर्फे भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात बुधवारी (दि. २८) उद्घाटन झाले. व्यासपीठावर माजी आमदार जयप्रकाश छाजेड, नगरसेवक हेमलता पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, शांतीलाल दुग्गड, मोहनलाल लोढा, डॉ. विक्रम शाह आदी उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील म्हणाले, सध्याची राजकीय स्थिती पाहता महाराष्ट्रात राजकीय चित्र फारसे आशादायी नाही. स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या सत्ताधाºयांनी विरोधकांचा सन्मान करून देशातील लोकशाही सुदृढ केली. त्यामुळे जगभरात भारतीय लोकशाही सर्वात प्रबळ आहे. परंतु सध्याच्या सत्ताधाºयांनी संसदीय प्रोटोकॉल बुकचे कधी वाचनच केले नसल्याचे दिसते आहे. त्यामुळे सरकारचा प्रशासनावर वचक उरलेला नाही. विरोधी पक्षांना विश्वासात न घेता निर्णय घेत सत्ताधाºयांकडून त्यांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न होतो आहे.  हा राजकीय द्वेष पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय आहे. कदाचित सत्तेचे हे चक्र फिरते असल्याचा सध्याच्या सत्ताधाºयांना विसर पडला असल्याचा टोलाही हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला लगावला. दरम्यान, डॉ. विक्रम शाह यांच्या ‘जिनश्वर पूजा’ या पुस्तकाचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन गौतम सुराणा यांनी केले.काम ठप्प पडल्याने वाढले उंदीरमंत्रालयाची अवस्था अनेक दिवसांपासून बंद पडलेल्या घरासारखी झाली आहे. सरकारचे प्रशासनावर नियंत्रण उरले नसल्याने मंत्रालयात कोणतेही काम होत नसून अनेक दिवस फाईली पडून राहिल्यानेच मंत्रालयात उंदीर वाढल्याची बोचरी टीकाही हर्षवर्धन पाटील यांनी राज्य सरकारवर केली.ाजेड यांची खोचक टीकामाजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनीही राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता व्याख्यानमालेचा विषय ‘महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा’ असा ठेवण्याऐवजी ‘महाराष्ट्राच्या राजकारणाची दुर्दशा’ असा ठेवला असता तर तो अधिक संयुक्तिक ठरला असता, अशी खोचक टीका त्यांनी राज्य सरकारवर केली.

टॅग्स :Nashikनाशिक