शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

चांगल्या स्मृतींनी जीवनात आनंद फुलतो : ब्रह्मकुमार रूपेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:44 IST

जीवनात आलेल्या आनंदी क्षणाच्या स्मृती वेळोवेळी ताज्या करत राहिल्याने जीवनात आनंद कायम टिकून राहतो. मनुष्य नैराश्याच्या गर्तेत बुडत नाही. ताणतणावापासून सुटका करून घेण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.

नाशिक : जीवनात आलेल्या आनंदी क्षणाच्या स्मृती वेळोवेळी ताज्या करत राहिल्याने जीवनात आनंद कायम टिकून राहतो. मनुष्य नैराश्याच्या गर्तेत बुडत नाही. ताणतणावापासून सुटका करून घेण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. चांगल्या स्मृती नेहमीच आनंद देतात, असे प्रतिपादन ब्रह्मकुमार रूपेश यांनी केले.गोदाकाठावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे २९वे पुष्प नाशिक वसंत व्याख्यानमालेत अर्जुनसिंग बग्गा स्मृती व्याख्यानात ‘खुशनुमा जिंदगी’ या विषयावर रूपेश बोलत होते. यावेळी ते म्हणाले, जीवनात दु:ख, कटू प्रसंग यावे, असे कोणालाही वाटत नाही; मात्र जीवनाचा तोदेखील एक भाग आहे. त्यामुळे आलेल्य कटू प्रसंगांना तसेच दु:खदायक घटनांना मानवाला वेळोवेळी सामोरे जावे लागतेच. मात्र त्या घटना मानवाने विसरणे गरजेचे असते, परंतु मनुष्याचे नेमके याविरुद्ध घडते. तो जीवनात घडणाऱ्या आनंदी बाबी, प्रसंग विसरून जातो आणि दु:खदायक वेदनादायी प्रसंगांना कवटाळून बसतो. त्यामुळे त्याचे जीवन निराशावादी बनत जाते. त्यानंतर ब्रह्मकुमारी गीतादीदी यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना सांगितले, भारतात जन्म घेणारे पुण्यात्मा आहेत. भारतभूमी अतुलनीय आहे. आपण आपल्या इच्छा, आकांक्षा नियंत्रणात ठेवल्या तर जीवनात अधिकाधिक आनंद प्राप्त होतो. कमाई करण्यासाठी गुंतवणूक करण्याची गरज आहे. दानशूर वृत्तीचा विकास कसा होईल, यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. जो जसा वागतो, तसेच त्याला फळ जीवनात मिळत असते, हे विसरून चालणार नाही. क्षमा हे माणसाचे सर्वात मोठे शस्त्र आहे. माणसाने क्षमाशील होण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक