शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

चांगल्या स्मृतींनी जीवनात आनंद फुलतो : ब्रह्मकुमार रूपेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:44 IST

जीवनात आलेल्या आनंदी क्षणाच्या स्मृती वेळोवेळी ताज्या करत राहिल्याने जीवनात आनंद कायम टिकून राहतो. मनुष्य नैराश्याच्या गर्तेत बुडत नाही. ताणतणावापासून सुटका करून घेण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.

नाशिक : जीवनात आलेल्या आनंदी क्षणाच्या स्मृती वेळोवेळी ताज्या करत राहिल्याने जीवनात आनंद कायम टिकून राहतो. मनुष्य नैराश्याच्या गर्तेत बुडत नाही. ताणतणावापासून सुटका करून घेण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. चांगल्या स्मृती नेहमीच आनंद देतात, असे प्रतिपादन ब्रह्मकुमार रूपेश यांनी केले.गोदाकाठावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे २९वे पुष्प नाशिक वसंत व्याख्यानमालेत अर्जुनसिंग बग्गा स्मृती व्याख्यानात ‘खुशनुमा जिंदगी’ या विषयावर रूपेश बोलत होते. यावेळी ते म्हणाले, जीवनात दु:ख, कटू प्रसंग यावे, असे कोणालाही वाटत नाही; मात्र जीवनाचा तोदेखील एक भाग आहे. त्यामुळे आलेल्य कटू प्रसंगांना तसेच दु:खदायक घटनांना मानवाला वेळोवेळी सामोरे जावे लागतेच. मात्र त्या घटना मानवाने विसरणे गरजेचे असते, परंतु मनुष्याचे नेमके याविरुद्ध घडते. तो जीवनात घडणाऱ्या आनंदी बाबी, प्रसंग विसरून जातो आणि दु:खदायक वेदनादायी प्रसंगांना कवटाळून बसतो. त्यामुळे त्याचे जीवन निराशावादी बनत जाते. त्यानंतर ब्रह्मकुमारी गीतादीदी यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना सांगितले, भारतात जन्म घेणारे पुण्यात्मा आहेत. भारतभूमी अतुलनीय आहे. आपण आपल्या इच्छा, आकांक्षा नियंत्रणात ठेवल्या तर जीवनात अधिकाधिक आनंद प्राप्त होतो. कमाई करण्यासाठी गुंतवणूक करण्याची गरज आहे. दानशूर वृत्तीचा विकास कसा होईल, यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. जो जसा वागतो, तसेच त्याला फळ जीवनात मिळत असते, हे विसरून चालणार नाही. क्षमा हे माणसाचे सर्वात मोठे शस्त्र आहे. माणसाने क्षमाशील होण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक