शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

लॉकडाऊनच्या काळात संबळ वाजंत्रीला ‘अच्छे दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:18 IST

जळगाव निंबायती :  (अमोल अहिरे )जगभरात आलेल्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरात तब्बल अडीच महिन्यांहून अधिक काळ ताळेबंद लागल्याने जवळपास सर्वच व्यवसायांवर याचा परिणाम झाला.

जळगाव निंबायती :  (अमोल अहिरे )जगभरात आलेल्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरात तब्बल अडीच महिन्यांहून अधिक काळ ताळेबंद लागल्याने जवळपास सर्वच व्यवसायांवर याचा परिणाम झाला.लग्नसराईलादेखील कोरोनाचा फटका बसला. छोटेखानी लग्न समारंभ करण्याचे शासनाचे आदेश असल्याने ऐन लग्नसराईच्या हंगामात लॉन्स, मंगल कार्यालय संचालक, वाजंत्री, घोडेवाले, आचारी, वाढपी, पुरोहित आदी यासंबंधी व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. मात्र सध्या होत असलेल्या छोटेखानी लग्नसोहळ्यासाठी कमी खर्चीक पारंपरिक संबळ वाजंत्रीला लोकांची विशेष पसंती मिळत आहे. यामुळे संबळ वादकांना सध्या तरी ‘अच्छे दिन’ आले आहेत. अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात प्रशासनाने जाहीर केलेल्या नवीन नियमावलीप्रमाणे लग्न सोहळ्यासाठी दोन्ही बाजूंकडील जेमतेम पन्नास सगेसोयरे वºहाडी मंडळींना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. शिवाय शारीरिक अंतराचा नियम पाळून आणि उपस्थितांनी चेहऱ्यावर मास्क लावून अतिशय साध्या पद्धतीने लग्न सोहळ्याचा प्रवास सध्या सुरू झालेला आहे. अशा पार्श्वभूमीवर लग्नात वरातीसाठी केवळ चार वादकांचे पथक असलेल्या पारंपरिक संबळ वाजंत्रीला सुगीचे दिवस आले आहेत. या वाजंत्री व्यवसायावर पोटापाण्यासाठी अवलंबून असणाºया वादकांना नाइलाजाने अन्य व्यवसाय, शेती, मजुरी किंवा अगदी मिळेल ते काम करण्याची वेळ आली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छोटेखानी लग्नसोहळ्यासाठी केवळ चार वादक असलेल्या संबळ वाजंत्रीला लोकांची मागणी वाढत आहे.--------------------काही वर्षापूर्वी लग्नसोहळा म्हटले की सनई-चौघडे, संबळ वाजंत्री या पारंपारिक साधनांनाच विशेष पसंती मिळत असे. लग्न म्हटले की, वाजंत्रीशिवाय शोभा नाही, असा काहीसा समज आहे.लग्नसराईच्या काळातील केलेली कमाई या वादकांना वर्षभर पुरत असे. मात्र गेल्या काही वर्षांपासून लग्नाचा थाट बदलला. लग्नात वºहाडी मंडळींची संख्या लक्षणीय वाढू लागली.लग्नाच्या वरातीसाठी आलेल्या आधुनिक बॅण्ड, बेंजो, डीजेच्या दणदणाटात ही पारंपरिक वाद्य आणि वाजंत्री प्रकार काळाच्या ओघात लोप पावल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती.--------------------संबळ वाजंत्रीचा आमचा पारंपरिक व्यवसाय असून, गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून उदरनिर्वाहासाठी आमचा परिवार या व्यवसायात आहे. संबळवादक, सूर व दोन पिपाणीवादक असे चार वादकांचे पथक असून, एका लग्नाची सुपारी सहा ते सात हजार रुपये असते. बॅण्ड व डिजेच्या तुलनेत संबळ कमी खर्चीक वाजंत्री आहे. यामुळे लोकांची मागणी वाढत आहे. या कलेची जोपासना होण्याच्या उद्देशाने आम्ही आमच्या मुलांनादेखील ही वाद्ये शिकविण्याचा प्रयत्न करीत आहोत.- दिनकर अहिरेसंबळवादक, चोंडी जळगाव

टॅग्स :Nashikनाशिक