शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पत्रिका वाटप टाळून केला  लग्नाचा सुवर्ण महोत्सव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:17 IST

लग्नसोहळा किंवा कोणत्याही कार्यक्रमाच्या पत्रिका वाटप करणे तसेच धावपळ पर्यावरणच्या दृष्टीने सोयीचे नाही. ‘लोकमत’ने त्या पार्श्वभूमीवर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिकमधील ज्येष्ठ नागरिक अशोक रामचंद्र देशमुख यांचा लग्नाचा सुवर्ण महोत्सव व मधुकर लक्ष्मण बर्वे यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याची निमंत्रण पत्रिका न वाटता आप्तस्वकीयांना सोशल मीडियावरूनच कळविण्यात आले तसेच पत्रिका वाटप टाळा असे आवाहन करण्यात आले.

नाशिक : लग्नसोहळा किंवा कोणत्याही कार्यक्रमाच्या पत्रिका वाटप करणे तसेच धावपळ पर्यावरणच्या दृष्टीने सोयीचे नाही. ‘लोकमत’ने त्या पार्श्वभूमीवर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिकमधील ज्येष्ठ नागरिक अशोक रामचंद्र देशमुख यांचा लग्नाचा सुवर्ण महोत्सव व मधुकर लक्ष्मण बर्वे यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याची निमंत्रण पत्रिका न वाटता आप्तस्वकीयांना सोशल मीडियावरूनच कळविण्यात आले तसेच पत्रिका वाटप टाळा  असे आवाहन करण्यात आले.  आणि त्यानुसार सोहळाही पार  पडला.  लग्नपत्रिका वाटताना अनेकदा अपघात घडण्याचे प्रकार घडतात. ते टाळण्यासाठी पत्रिका वाटप करण्यापेक्षा अलीकडे सोशल मीडियासारखे माध्यम वाढत असताना त्याचा वापर करून घेतला पाहिजे. पत्रिका न छापणे म्हणजे वृक्षतोड टाळण्यासारखे असून, हे पर्यावरणस्नेहीदेखील आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात समाज जागृतीची भूमिका बजावत सात दिवस मालिकेतून प्रबोधनदेखील केले होते. त्यातून प्रेरणा घेऊन अशोक व वसुंधरा देशमुख यांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस त्यानिमित्ताने पुन्हा एकदा विवाह सोहळा करण्याचे नियोजन करण्यात आले. रवींद्रनाथ विद्यालयातील शिक्षिका अनुराधा देशमुख-बर्वे व तसेच बीएसएनएलमधील उपमंडल अभियंता प्रसाद बर्वे यांच्या पुढाकाराने पत्रिका टाळून सर्व मित्रपरिवाराला व्हॉट्सअ‍ॅप व अन्य सोशल मीडियावरून निमंत्रणे पाठविण्यात आली आणि त्यानुसार कार्यक्रम झाला.  या सोहळ्यास उपस्थित नागरिकांना देशमुख बर्वे परिवाराच्या वतीने वृक्षलागवड, मुलींचे शिक्षण या विषयावर प्रबोधनाची घोषवाक्ये असलेल्या अडीचशे कापडी पिशव्या भेट देण्यात आल्या.

टॅग्स :Nashikनाशिक