शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

देवळ्यात महिलेची सोन्याची चैन ओरबाडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 1:35 PM

खर्डे : गुंजाळनगर ता.देवळा येथील ताराबाई यशवंत कदम (६५) यांच्या गळ्यातील बारा ग्रॅमची सोन्याची पोत भर रस्त्यावरून एका दुचाकीस्वाराने ओरबाडून घेत पळ काढल्याने हे चोरीचे लोण ग्रामीण भागापर्यंत आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

खर्डे : गुंजाळनगर ता.देवळा येथील ताराबाई यशवंत कदम (६५) यांच्या गळ्यातील बारा ग्रॅमची सोन्याची पोत भर रस्त्यावरून एका दुचाकीस्वाराने ओरबाडून घेत पळ काढल्याने हे चोरीचे लोण ग्रामीण भागापर्यंत आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ताराबाई कदम या काल मंगळवार (१४) रोजी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान रस्त्यावरून जात असतांना दुचाकीस्वाराने गुंजाळनगरच्या भर रस्त्यावर गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडून पळ काढला. कदम यांनी व नागरिकांनी आरडाओरडा केला परंतु तोपर्यंत चोर पसार झाला. या घटनेमुळे महिलावर्गात घबराटीचे वातावरण आहे. सोन्याचे दागिने अंगावर घालून फिरणे धोकादायक असल्याने याबाबत काळजी घेणे गरजेचे झाले आहे. लग्नांमध्येही सोन्याचे दागिने जपून वापरले जावेत अन्यथा चोरांचे लक्ष तिकडेही वळू शकते. यापूर्वी ज्याच्या घरी लग्न त्याच्याच घरी चोरी झाल्याचा प्रकार गेल्या महिन्यात येथे झाला होता. तसेच रविवारच्या आठवडे बाजारात गर्दीचा फायदा घेवून मोबाईल चोरीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांत चिंता व्यक्त केली जात आहे. येथील आठवडे बाजार दर रविवारी भरतो. भाजीपाला खरेदी करण्याच्या नादात असलेल्यांचा व बाजारातील गर्दीचा हे चोरटे फायदा उठवतात व हातोहात मोबाईल पळवतात. पोलिसांनी या चोरांचा छडा लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.