शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गोदाकाठी पाच तास वीजपुरवठा मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 15:18 IST

सायखेडा : नांदूरमधमेश्वर धरणात सुरळीत पाणी पोहचून धरण पाण्याने भरत नाही तोपर्यंत गोदाकाठ भागातील २२ तास बंद असलेला वीज पुरवठामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. जनावरांना चारा, पाणी देता येत नाही. पिण्याचे पाणी भरता येत नाही त्यामुळे किमान पाच तास सुरु करावा यासाठी शेतक-यांनी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन किमान पाच तास वीजपुरवठा सुरु करण्याची मागणी खेडकर यांनी मान्य केली असून पाच तास वीजपुरवठा सुरु करणार असल्याचे सांगितले.

सायखेडा : नांदूरमधमेश्वर धरणात सुरळीत पाणी पोहचून धरण पाण्याने भरत नाही तोपर्यंत गोदाकाठ भागातील २२ तास बंद असलेला वीज पुरवठामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. जनावरांना चारा, पाणी देता येत नाही. पिण्याचे पाणी भरता येत नाही त्यामुळे किमान पाच तास सुरु करावा यासाठी शेतक-यांनी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन किमान पाच तास वीजपुरवठा सुरु करण्याची मागणी खेडकर यांनी मान्य केली असून पाच तास वीजपुरवठा सुरु करणार असल्याचे सांगितले.उपजिल्हाधिका-यांना भेटलेल्या शिष्टमंडळात खासदार हेमंत गोडसे, आमदार अनिल कदम , आमदार योगेश घोलप यांच्यासह शेतक-यांचा समावेश होता. दारणा, वालदेवी, मुकणे, गंगापुर धरणातून दोन हजार क्युसेस पाणी नादुरमध्यमेश्वर धरणात सोडल्याने पाणी सुरळीत जावे , डाव्या आणि उजव्या कालव्याला पाणी पुरवठा करण्यात येत नाही तो पर्यंत नदीकाठच्या विहिरीचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. २४ तासात अवघा दोन तास वीजपुरवठा चालू ठेवला जात आहे. दोन तासात जनावरांच्या चाºयाला पाणी देऊ शकत नाही , पिण्याच्या पाण्याचा टाक्या भरणे होत नाही. त्यामुळे किमान पाच ते सहा तास वीजपुरवठा द्यावा अशी मागणी शेतकºयांनी केली होती. शेताच्या बांधाजवळून गोदावरी खळखळ वाहते, मुबलक पाणी आहे, मात्र वीज पुरवठा खंडित असल्याने शेतात उभे असलेल्या पिकांना शेतकरी पाणी देऊ शकत नव्हते, जनावरांच्या चाºयाला पाणी नसल्याने हिरवा चारा सुकू लागले होते. दोन तासात घरातील वीज पंपापासून पाईपलाईन द्वारे टाक्या, घरापर्यंत पाणी जायला वेळ लागत होता पाणी पोहचत नाही, तोच वीज पुरवठा खंडित होत असे. अशा परिस्थितीत किमान ५ ते ६ तास वीज पुरवठा सुरु ठेवावा अशी मागणी शेतकºयांनी केली होती. खेडकर यांनी पाच तास वीज पुरवठा सुरु ठेवण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :Nashikनाशिक