शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
3
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
4
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
5
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
6
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
7
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
8
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
9
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
10
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
11
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
12
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
13
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
14
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
15
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
16
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
17
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
18
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
19
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
20
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

गोदावरीला पूर, रस्त्यांवर तळी

By admin | Updated: July 15, 2017 00:26 IST

नाशिक : पुनर्वसू नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात पावसाने गुरुवारी (दि. १३) रात्रीपासून संततधार लावल्यानंतर चालू मोसमात गोदावरी नदीला पहिल्यांदा पूर आला.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पुनर्वसू नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात पावसाने गुरुवारी (दि. १३) रात्रीपासून संततधार लावल्यानंतर चालू मोसमात गोदावरी नदीला पहिल्यांदा पूर आला. नाशिककरांचे पूर मोजण्याचे परिमाण असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी जाऊन पोहोचले होते. शुक्रवारी (दि. १४) सकाळी पावसाचा जोर वाढल्याने शहरातील रस्त्यांवरही ठिकठिकाणी पाण्याची तळी साचून वाहतूक विस्कळीत झाली, तर पंचवटीतील मोरे मळा परिसरातील एका नाल्यातून शाळकरी मुलगा वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधकार्य सुरू केले. दमदार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होऊन सायंकाळपर्यंत ६२ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा जाऊन पोहोचला होता. दरम्यान, दिवसभर अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाने जनजीवनावर परिणाम झाला.आर्द्रा नक्षत्राच्या पावसानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. अधूनमधून पावसाचे शिडकावे होत असले तरी समाधानकारक पावसाची प्रतीक्षा होती. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, गुरुवारी (दि. १३) रात्री पावसाने संततधार लावली आणि शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेनंतर पावसाचा जोर वाढत गेल्याने रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी वाहू लागले. सकाळी ४८.०२ मि.मी. पावसाची नोंद झाली. गंगापूर व आळंदी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने नाल्यांद्वारे वाहून आलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीला पूरसदृश स्थिती निर्माण झाली. सकाळी १० वाजेनंतर गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागल्यानंतर महापालिकेच्या आपत्कालीन विभागामार्फत नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.  गोदाघाट परिसरातील व्यावसायिकांनीही आपापले साहित्य, टपऱ्या अन्यत्र नेण्यास सुरुवात केली. सुमारे ४५०० क्यूसेक इतका पाण्याचा प्रवाह असल्याने दुपारपर्यंत दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागले होते. गोदाघाटावर पार्क केलेली एक कारही वाहून जात असताना काही तरुणांनी दोरखंड लावून ती पुराच्या पाण्यातून ओढून काढली. दुपारच्या सुमारास मोरे मळा परिसरातील नाल्यातून एक शाळकरी मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली परंतु, अग्निशमन दलाने शोधकार्य सुरू ठेवूनही मुलाचा शोध लागलेला नव्हता. दरम्यान, मखमलाबादरोडवर झाड उन्मळून पडल्याने दोन वाहनांचे नुकसान झाले तर शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर पाण्याची तळी साचून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. महापालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ड्रेनेज व पावसाळी गटारीचे चेंबर मोकळे करत पाण्याचा निचरा केल्याचा दावा केला असला तरी सायंकाळपर्यंत अनेक भागात परिस्थिती ‘जैसे थे’ होती. दुपारनंतर मात्र, पावसाचा जोर कमी झाल्यानंतर परिस्थिती थोडीफार पूर्वपदावर येण्यास मदत झाली. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरात ३३ मि.मी. पावसाची नोंद झाली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातही पाणीसाठा ६२ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे.