शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

कांदा पिकात सोडल्या मेंढ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 15:53 IST

ब्राह्मणगाव : परतीच्या पावसाच्या फटक्याने वाढ न झाल्याने कांदे पिकात शेतकऱ्यांनी मेंढ्या सोडून आपला संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा फटका : वाढ न झाल्याने शेतकरी हतबल

ब्राह्मणगाव : परतीच्या पावसाच्या फटक्याने वाढ न झाल्याने कांदे पिकात शेतकऱ्यांनी मेंढ्या सोडून आपला संताप व्यक्त केला आहे. येथे परतीच्या पावसाचा परिणाम अद्याप पिकांवर पडत असून त्याचा फटका येथील कांदा उत्पादक शेतकरी देविदास गोपाळ अहिरे यांच्या अडीच एकर कांद्याला बसला आहे. कांदे पीक तीन महिन्याचे होऊनही त्याची वाढ होत नसल्याने शेवटी कंटाळून त्यांनी उभ्या पिकात मेंढ्या सोडून दिल्या. या अडीच एकर क्षेत्रात ९० हजार रु पये खर्च करून हाती एक रु पयाही उत्पन्न न आल्याने हताश होऊन त्यांनी कांदे पिकात मेंढ्यांना खाण्यासाठी सोडून दिल्या. येथे या वर्षी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मका, द्राक्ष, बाजरी, भाजीपाला, कांदा रोपे या सर्वच पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले. आज पाऊस बंद होऊन महिना उलटुन ही अद्याप पिकांवर त्याचा परिणाम व फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कांदा उत्पादक शेतकरी देविदास गोपाळ अहिरे यांच्या गट न. ८४७ मध्ये ९० हजार रु पये खर्च करून आडीच एकर कांदा लागवड केली. मात्र सदर कांद्यावर करपा रोग आल्याने कांद्याची वाढच झाली नाही.तीन महिने पूर्ण होऊनही कांद्याचे वाढ होत नसल्याने शेवटी कंटाळून त्यांनी उभ्या पिकात मेंढ्या चारून दिल्या. नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकºयांना मोठे आर्थिक संकटास तोंड द्यावे लागत असून नवीन सरकारच्या घोषणांकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक