शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कांदा पिकात सोडल्या मेंढ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 15:53 IST

ब्राह्मणगाव : परतीच्या पावसाच्या फटक्याने वाढ न झाल्याने कांदे पिकात शेतकऱ्यांनी मेंढ्या सोडून आपला संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा फटका : वाढ न झाल्याने शेतकरी हतबल

ब्राह्मणगाव : परतीच्या पावसाच्या फटक्याने वाढ न झाल्याने कांदे पिकात शेतकऱ्यांनी मेंढ्या सोडून आपला संताप व्यक्त केला आहे. येथे परतीच्या पावसाचा परिणाम अद्याप पिकांवर पडत असून त्याचा फटका येथील कांदा उत्पादक शेतकरी देविदास गोपाळ अहिरे यांच्या अडीच एकर कांद्याला बसला आहे. कांदे पीक तीन महिन्याचे होऊनही त्याची वाढ होत नसल्याने शेवटी कंटाळून त्यांनी उभ्या पिकात मेंढ्या सोडून दिल्या. या अडीच एकर क्षेत्रात ९० हजार रु पये खर्च करून हाती एक रु पयाही उत्पन्न न आल्याने हताश होऊन त्यांनी कांदे पिकात मेंढ्यांना खाण्यासाठी सोडून दिल्या. येथे या वर्षी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मका, द्राक्ष, बाजरी, भाजीपाला, कांदा रोपे या सर्वच पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले. आज पाऊस बंद होऊन महिना उलटुन ही अद्याप पिकांवर त्याचा परिणाम व फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कांदा उत्पादक शेतकरी देविदास गोपाळ अहिरे यांच्या गट न. ८४७ मध्ये ९० हजार रु पये खर्च करून आडीच एकर कांदा लागवड केली. मात्र सदर कांद्यावर करपा रोग आल्याने कांद्याची वाढच झाली नाही.तीन महिने पूर्ण होऊनही कांद्याचे वाढ होत नसल्याने शेवटी कंटाळून त्यांनी उभ्या पिकात मेंढ्या चारून दिल्या. नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकºयांना मोठे आर्थिक संकटास तोंड द्यावे लागत असून नवीन सरकारच्या घोषणांकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक