शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांमध्ये ‘शून्य अपघात’ ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:19 IST

उद्योग क्षेत्राच्या विकासात सुरक्षिततेचे नियम हादेखील महत्त्वाचा भाग आहे. त्यात जागरूकता व प्रशिक्षणाच्या माध्यमातून कामगारांना प्रशिक्षित केल्यास अपघातांचे ...

उद्योग क्षेत्राच्या विकासात सुरक्षिततेचे नियम हादेखील महत्त्वाचा भाग आहे. त्यात जागरूकता व प्रशिक्षणाच्या माध्यमातून कामगारांना प्रशिक्षित केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदतच होईल. उत्पादनाबरोबरच कामगारांच्या सुरक्षिततेला महत्त्व आवश्यक आहे. कारखान्यात नियमांची काटेकोर अंमलबजावणी होत आहे की नाही त्यासाठी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय विभाग लक्ष ठेवून आहे. या विभागामार्फत जनजागृतीसाठीचे विविध उपक्रम राबविले जातात. त्याचप्रमाणे दुर्दैवाने कारखान्यात अपघात झाल्यास, जीवितहानी अथवा एखाद्या कामगाराला अपंगत्व आल्यास त्या कामगाराला नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. मयत कामगाराच्या वारसास आर्थिक मदत, सानुग्रह अनुदान आणि नोकरी मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केला जातो. कायद्याचे उल्लंघन आणि हलगर्जीपणा केल्याचे आढळून आल्यास कारखाना मालकावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हाही दाखल केला जातो.

प्रत्येक कारखान्यात कारखाना अधिनियम १९४८ व महाराष्ट्र कारखाने अधिनियम १९६३ नुसार नियमप्रमाणे सुरक्षा साधने, आग विरोधक यंत्रणा, फायर हैड्रन्ट, फायर बकेट, फायर फायटिंग यंत्रणा उभारणे बंधनकारक आहे. नियमाप्रमाणे कामगारांना, सुरक्षा रक्षकांना, व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांना सुरक्षेसंदर्भात प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. मोठ्या उद्योगात सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन केले जाते. धोकादायक आणि रासायनिक उद्योगांमध्ये अपघातांचे प्रमाण अधिक असते. कारखान्यात गंभीर अपघात झाल्यास त्याची माहिती विहित नमुन्यात व वेळेत संचालनालयास कळविणे कायद्यानुसार बंधनकारक आहे, तर अपघाताची माहिती लपविणे गुन्हा समजला जातो. पूर्वी पॉवरप्रेस मशीनवर अपघातांचे प्रमाण खूप होते. कामगारांना प्रशिक्षित करून, तसेच त्यात ऑटोमेशन आणल्याने अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. रासायनिक आणि अतिधोकादायक कारखान्यात

वेळोवेळी कार्यशाळेचे आयोजन, प्रशिक्षण कार्यक्रम घेऊन जनजागृती केली जात आहे. त्यामुळे मागील वर्षी अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे.

-एम. आर. पाटील, सहसंचालक औद्योगिक सुरक्षा नाशिक विभाग

(फोटो ०५ पाटील)