शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

किमान वेतन कायद्यासाठी सीटू न्यायालयात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:25 IST

गेल्या आठ ते दहा वर्षांपासून राज्यातील ३२ विविध उद्योगांतील कामगारांच्या किमान वेतनाचा प्रश्न प्रलंबित असून, एक महिन्याच्या आत किमान वेतन कायद्यानुसार सुधारणा केली नाही तर राज्य सरकारच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्यात येईल, असा इशारा सीटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी पत्रकार परिषदेत दिला .

सातपूर : गेल्या आठ ते दहा वर्षांपासून राज्यातील ३२ विविध उद्योगांतील कामगारांच्या किमान वेतनाचा प्रश्न प्रलंबित असून, एक महिन्याच्या आत किमान वेतन कायद्यानुसार सुधारणा केली नाही तर राज्य सरकारच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्यात येईल, असा इशारा सीटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी पत्रकार परिषदेत दिला . सीटू भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. कराड यांनी सांगितले की, किमान वेतन कायदा १९४८ नुसार विविध उद्योगांतील कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी दर पाच वर्षांनी किमान वेतन दरात सुधारणा करण्याचे वैधानिक बंधन राज्य सरकारवर आहे, परंतु राज्य सरकार हे वैधानिक कर्तव्य गेल्या आठ ते दहा वर्षांपासून पार पडत नसल्याचे निदर्शनास आले आहे.  किमान वेतनाचे दर निश्चित करताना वेळोवेळी केलेल्या शिफारशी विचारात घेण्याचीही मागणी डॉ. कराड यांनी केली आहे. तसेच एक महिन्याच्या आत कामगारांचे किमान वेतन दरात सुधारणा करून तसे आदेश काढण्यात यावेत अन्यथा सीटू युनियनच्या माध्यमातून उच्च न्यायालयात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी सीताराम ठोंबरे, अण्णा सावंत, राजीव देशपांडे, संतोष कुलकर्णी आदी उपस्थित होते. सुमारे ३२ विविध उद्योगांतील कामगारांच्या किमान वेतनात सुधारणा झालेली नाही. किमान वेतन दरात सुधारणा केल्याने राज्य सरकारवर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. राज्य सरकारातील मंत्री, कामगार विभागाचे सचिव, कामगार आयुक्त आणि भांडवलदार यांचे साटेलोटे असल्याचा आरोप डॉ. कराड यांनी केला.

टॅग्स :MIDCएमआयडीसी