शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

किमान वेतन कायद्यासाठी सीटू न्यायालयात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:25 IST

गेल्या आठ ते दहा वर्षांपासून राज्यातील ३२ विविध उद्योगांतील कामगारांच्या किमान वेतनाचा प्रश्न प्रलंबित असून, एक महिन्याच्या आत किमान वेतन कायद्यानुसार सुधारणा केली नाही तर राज्य सरकारच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्यात येईल, असा इशारा सीटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी पत्रकार परिषदेत दिला .

सातपूर : गेल्या आठ ते दहा वर्षांपासून राज्यातील ३२ विविध उद्योगांतील कामगारांच्या किमान वेतनाचा प्रश्न प्रलंबित असून, एक महिन्याच्या आत किमान वेतन कायद्यानुसार सुधारणा केली नाही तर राज्य सरकारच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्यात येईल, असा इशारा सीटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी पत्रकार परिषदेत दिला . सीटू भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. कराड यांनी सांगितले की, किमान वेतन कायदा १९४८ नुसार विविध उद्योगांतील कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी दर पाच वर्षांनी किमान वेतन दरात सुधारणा करण्याचे वैधानिक बंधन राज्य सरकारवर आहे, परंतु राज्य सरकार हे वैधानिक कर्तव्य गेल्या आठ ते दहा वर्षांपासून पार पडत नसल्याचे निदर्शनास आले आहे.  किमान वेतनाचे दर निश्चित करताना वेळोवेळी केलेल्या शिफारशी विचारात घेण्याचीही मागणी डॉ. कराड यांनी केली आहे. तसेच एक महिन्याच्या आत कामगारांचे किमान वेतन दरात सुधारणा करून तसे आदेश काढण्यात यावेत अन्यथा सीटू युनियनच्या माध्यमातून उच्च न्यायालयात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी सीताराम ठोंबरे, अण्णा सावंत, राजीव देशपांडे, संतोष कुलकर्णी आदी उपस्थित होते. सुमारे ३२ विविध उद्योगांतील कामगारांच्या किमान वेतनात सुधारणा झालेली नाही. किमान वेतन दरात सुधारणा केल्याने राज्य सरकारवर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. राज्य सरकारातील मंत्री, कामगार विभागाचे सचिव, कामगार आयुक्त आणि भांडवलदार यांचे साटेलोटे असल्याचा आरोप डॉ. कराड यांनी केला.

टॅग्स :MIDCएमआयडीसी