शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

तीन भाविकांवर काळाचा घाला

By admin | Updated: September 13, 2015 23:47 IST

बापलेकीसह काकाचा मृत्यू : स्नान आटोपून जाताना रासेगावजवळ कारला अपघात

नाशिक : सिंहस्थ पर्वणीचे स्नान आटोपून सिल्वासाला परतणाऱ्या पारीख कुटुंबीयांच्या सॅन्ट्रो कारला रविवारी (दि़ १३) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास रासेगावजवळ भीषण अपघात झाला़ यामध्ये कारच्या पुढील सिटवर बसलेल्या तिघांचा मृत्यू झाला असून, पाठीमागे बसलेल्या महिलेसह तिची आठ वर्षांची मुलगी व कुटुंबातील एक सदस्य गंभीर जखमी झाले आहेत़ मयत व्यक्तींमध्ये श्रवणकुमार मांगीलाल पारीख (३२) त्यांची दहा वर्षांची मुलगी अंबिका ऊर्फ विकी पारीख (१०) व भाऊ गोविंदकुमार पारीख (३०, सर्व राहणार साई कॉम्प्लेक्स, एफ - १ / १०३, दादरा नगर हवेली, सिल्वासा) यांचा समावेश आहे़ जखमींवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ मूळचे राजस्थान व सध्या नोकरीनिमित्त सिल्वासा येथील श्रवणकुमार पारीख (३२), त्यांची पत्नी मंजुदेवी पारीख (३०), मुली अंबिका ऊर्फ विकी (१०) व अहेना पारीख (८), भाऊ गोविंदकुमार पारीख (३०) व नातेवाईक रामदेव पारीख (२७) हे सिंहस्थ स्नानासाठी सॅन्टो कारने (डीएन ०९, डी-०४१४) नाशिकला आले होते़ रविवारी स्नान आटोपून पारीख कुटुंबीय पेठरोडमार्गे सिल्वासा येथे जात होते़ रासेगावजवळून जात असताना पुढील दुचाकीला (एमएच ४१, अ‍े - ७३१०) वाचविण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या आयशरने (एमएच १५, सीएस ५२८५) सॅन्ट्रोला कट मारल्याने कार तीनदा उलटली़या अपघातात कार चालविणारे श्रवणकुमार, त्यांची मुलगी अंबिका व भाऊ गोविंदकुमार यांचा मृत्यू झाला, तर पत्नी मंजुदेवी, दुसरी मुलगी अहेना व नातेवाईक रामदेव हे गंभीर जखमी झाले़, तर दुचाकीचालक रवींद्र (रा़ कामटवाडे, अंबड) हे किरकोळ जखमी झाले असून, या सर्वांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ या अपघाताची दिंडोरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, आयशरचालक अनिल कर्डिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

 

त्र्यंबक-जव्हार मार्ग बंद

सिल्वासा येथे जाण्यासाठी त्र्यंबकेश्‍वर जव्हार हा जवळचा मार्ग आहे; मात्र हा मार्ग बंद असल्याने पारीख कुटुंबीयांनी पेठमार्गाचा वापर केला. त्यांनी गिरणारे मार्गाचा वापर का केला नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्र्यंबकेश्‍वरजवळील मार्गावरील बॅरिकेडिंगचा ससेमिरा चुकविण्यासाठी त्यांनी या मार्गाचा वापर केल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे.

कार्यकर्त्यांची धाव

अपघाताची घटना कळताच रासेगावचे योगेश थेटे बालाजी पवार, नाना थेटे, उमराळ्याचे माजी सरपंच संजय केदार, बालाजी ढगे, गणपत ढगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना कारच्या बाहेर काढले. त्याचवेळी दिंडोरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शुक्ला, हवालदार बोरसे, कपिले, कातड हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी १0८ च्या अँम्ब्युलन्सला फोन केला. तसेच सेक्टर अथर्व या कंपनीच्या अँम्ब्युलन्समधून गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठविले.