शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कारखाना शेतकऱ्यांना द्या

By admin | Updated: March 22, 2016 23:37 IST

गिसाका : बचाव समितीची मागणी, विक्री प्रक्रिया चुकीची झाल्याचे मत

 ब्राह्मणगाव : गिरणा सहकारी साखर कारखाना ईडीमार्फत जप्त करण्यात आला असून, हा कारखाना शेतकऱ्यांकडे सुपुर्द करण्यात यावा, अशी मागणी गिसाका बचाव समितीचे सदस्य के. एन. अहिरे यांनी केली आहे.गिरणा सहकारी साखर कारखान्याची डीआरटी न्यायालयाच्या आदेशान्वये २०१०मध्ये विक्री करण्यात आली. त्यावेळी ज्या वित्तसंस्थांचे घेणे होते ते ११ कोटीपर्यंत होते. त्या वित्तसंस्था कोर्टात गेल्याने कारखाना अवसायनात निघाला व त्याचा लिलाव करण्यात आला. हा लिलाव करताना कालबाग असोसिएट (मुंबई) यांनी कारखान्याचे मूल्यांकन चुकीच्या पद्धतीने करून ३०० कोटींची मालमत्ता यात २८९ एकर जमीन, डिस्टलरी, पेट्रोलपंप, कारखान्याची सर्व सामग्री, प्रशस्त इमारती, ४५० कामगारांची वसाहत एवढी मालमत्ता असताना आर्मस्ट्रॉँग कंपनीने अतिशय अल्प मूल्यांकन करून २७ कोटी ५५ लाख रुपये एवढी किंमत निश्चित करून माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या बनावट तीन कंपन्यांनी निविदा भरून हा कारखाना ताब्यात घेतला. याबाबत गिसाका बचाव समितीने सन २०१४ मध्ये सर्वोच न्यायालयात दावा दाखल केला आहे. आज ही केस अंतिम टप्प्यात आहे.यासंबंधात लवकरच सामाजिक कार्यकर्त्या मेघा पाटकर व गिसाका बचाव समितीचे अध्यक्ष यशवंत बापू अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गिसाकावर सभासदांचा मेळावा घेऊन वेळ आल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच जाणकार वकिलांचा सल्ला घेऊन गिसाका बचाव समिती लवकरच आंदोलन उभारून गिसाका परत मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्याचा इशारा समिती सदस्य प्रा. के. एन. अहिरे यांनी दिला आहे. तसेच कामगारांनी आपली वसाहत सोडू नये, व ज्यांनी वसाहत सोडली आहे अशा सभासदांनी आपली वसाहत पुन्हा ताब्यात घेण्याचे आवाहन अहिरे यांनी केला आहे.ईडीने गिसाका जप्तीची कार्यवाही केल्याने सभासद व कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. सभासद व कामगारांमध्ये ‘अच्छे दिन’ येण्याची चाहूल लागली आहे. (वार्ताहर)