शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

कारखाना शेतकऱ्यांना द्या

By admin | Updated: March 22, 2016 23:37 IST

गिसाका : बचाव समितीची मागणी, विक्री प्रक्रिया चुकीची झाल्याचे मत

 ब्राह्मणगाव : गिरणा सहकारी साखर कारखाना ईडीमार्फत जप्त करण्यात आला असून, हा कारखाना शेतकऱ्यांकडे सुपुर्द करण्यात यावा, अशी मागणी गिसाका बचाव समितीचे सदस्य के. एन. अहिरे यांनी केली आहे.गिरणा सहकारी साखर कारखान्याची डीआरटी न्यायालयाच्या आदेशान्वये २०१०मध्ये विक्री करण्यात आली. त्यावेळी ज्या वित्तसंस्थांचे घेणे होते ते ११ कोटीपर्यंत होते. त्या वित्तसंस्था कोर्टात गेल्याने कारखाना अवसायनात निघाला व त्याचा लिलाव करण्यात आला. हा लिलाव करताना कालबाग असोसिएट (मुंबई) यांनी कारखान्याचे मूल्यांकन चुकीच्या पद्धतीने करून ३०० कोटींची मालमत्ता यात २८९ एकर जमीन, डिस्टलरी, पेट्रोलपंप, कारखान्याची सर्व सामग्री, प्रशस्त इमारती, ४५० कामगारांची वसाहत एवढी मालमत्ता असताना आर्मस्ट्रॉँग कंपनीने अतिशय अल्प मूल्यांकन करून २७ कोटी ५५ लाख रुपये एवढी किंमत निश्चित करून माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या बनावट तीन कंपन्यांनी निविदा भरून हा कारखाना ताब्यात घेतला. याबाबत गिसाका बचाव समितीने सन २०१४ मध्ये सर्वोच न्यायालयात दावा दाखल केला आहे. आज ही केस अंतिम टप्प्यात आहे.यासंबंधात लवकरच सामाजिक कार्यकर्त्या मेघा पाटकर व गिसाका बचाव समितीचे अध्यक्ष यशवंत बापू अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गिसाकावर सभासदांचा मेळावा घेऊन वेळ आल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच जाणकार वकिलांचा सल्ला घेऊन गिसाका बचाव समिती लवकरच आंदोलन उभारून गिसाका परत मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्याचा इशारा समिती सदस्य प्रा. के. एन. अहिरे यांनी दिला आहे. तसेच कामगारांनी आपली वसाहत सोडू नये, व ज्यांनी वसाहत सोडली आहे अशा सभासदांनी आपली वसाहत पुन्हा ताब्यात घेण्याचे आवाहन अहिरे यांनी केला आहे.ईडीने गिसाका जप्तीची कार्यवाही केल्याने सभासद व कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. सभासद व कामगारांमध्ये ‘अच्छे दिन’ येण्याची चाहूल लागली आहे. (वार्ताहर)