शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
3
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
4
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
5
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
6
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
7
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
8
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
9
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
10
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
11
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
12
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
13
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
14
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
15
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
16
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
17
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
18
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
19
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
20
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

नामसंकीर्तनासाठी द्या सशर्त परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 16:40 IST

कीर्तनकारांची मागणी : वारकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

ठळक मुद्दे तीन महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये कुठल्याही गावात कीर्तन सप्ताह नाही.

नायगाव : संपूर्ण देशासह राज्यात सर्वच क्षेत्रातील व्यवहार सुरळीत करण्यासाठी शासन परवानगी देत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भजन, कीर्तन व प्रवचनास शासनाने परवानगी देण्याची मागणी ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले व शिवानंद महाराज भालेराव यांनी केली आहे.पाचव्या लॉकडाऊन नंतर देशासह राज्यात सध्या सर्वच क्षेत्रातील उद्योग-धंदे शासनाच्या नियम व अटींचे पालन करून हळूहळू सुरळीत होत आहे. त्याच धर्तीवर कोरोनामुळे इतिहासात प्रथमच कुलूप बंद झालेले देवालयेही सध्या काही अटींवर भाविकांसाठी उघडली गेली आहेत. सध्या देशासह महाराष्ट्रामध्ये शासनाने लग्नविधी, अंत्ययात्रांकरीता तसेच हॉटेल व्यवसायिकांना पार्सल सुविधोसाठी परवानगी दिलेली आहे. मात्र वारकऱ्यांना नामसंकीर्तनास मनाई आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून भजन, प्रवचन, कीर्तन बंद आहे. शासनाने भजन-कीर्तन, प्रवचन सुरू करण्यासाठी सशर्त परवानगी द्यावी अशी मागणी ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांनी केली आहे. सर्व वारकरी शासनांच्या सर्व नियमांचे पालन करून नामसंकीर्तन करतील. त्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जाईल. सध्या हा पंढरपूर कडे जाणा-या वारीचा काळ असून महाराष्ट्रातील लाखो वारक-यांना सध्या घरीच राहून नामस्मरण करण्याची वेळ आलेली आहे. गावांमध्ये स्थानिक मंदिरांमध्ये शासनाने त्यांना भजन-कीर्तन करण्याची परवानगी द्यावी. तीन महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये कुठल्याही गावात कीर्तन सप्ताह झालेला नाही. हजारो कीर्तनकार सध्या आपापल्या घरीच बसून आहेत. त्यामुळे असंख्य कीर्तनकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने कीर्तनकारांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी वारक-यांमधून होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक