शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

पूरग्रस्तांना भरपाई तत्काळ द्या

By admin | Updated: August 8, 2016 23:40 IST

राष्ट्रवादीची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

नाशिक : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्यात येऊन, नुकसानग्रस्तांना तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पेरणीसाठी मोफत बियाणे व खते पुरविण्यात यावीत आदि मागण्यांचे निवेदन सोमवारी (दि.८) राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना देण्यात आले.निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ यामुळे शेतकऱ्यांची ३/४ पिके वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीस सापडला आहे. यंदा नाशिक जिल्ह्यात काही तालुक्यांत अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात शेतीसह मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी दिरंगाई न करता सरसकट पंचनामे करून सरकारने शेतकऱ्यांना मदत देऊन दिलासा देणे गरजेचे आहे. पिके, पेरण्या वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना नावाने पतपुरवठा करणे आवश्यक आहे. याकरिता अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून सरकारने तातडीने शासकीय मदत उपलब्ध करून द्यावी. तसेच आवश्यक ती शासकीय मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसने केली आहे. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, माजी खासदार देवीदास पिंगळे, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे, दिलीप थेटे, नितीन मोहिते, अर्जुन टिळे, विष्णुपंत म्हैसधुणे, प्रेरणा बलकवडे, पंचायत समिती सभापती मंदाबाई निकम, महेश भामरे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)